Author: अनंत पांगारकर
बुधवार, दि. १२ जून २०२४ लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या प्रदेश काँग्रेसच्या सचिवाला निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. प्रदेश काँग्रेस सचीव प्रशांत गावंडे यांच्यावर ही कारवाई प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने करण्यात आली असून त्यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले आहे. बुधवारी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी पटोले यांच्या आदेशावरून गावंडे यांच्यावर कारवाईचे आदेश काढले आहे.
बुधवार दिनांक १२ जून २०२४ संगमनेरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) कलम ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. विशाल संपत बोऱ्हाडे (रा. माधवनगर, राजापूर रस्ता, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून तो पसार झाला आहे. या संदर्भात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी (दि. ११) गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीची आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तिच्या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा विशाल बोऱ्हाडे याने गैरफायदा घेतला. मुलीला त्याच्या घरी घेऊन जात त्याने तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने शारीरिक अत्याचार केले. ४ जून संध्याकाळी…
बुधवार दिनांक १२ जून २०२४ जमिनीच्या खरेदी व्यवहारापोटी शिवसेनेच्या शहरप्रमुखांकडून २५ लाख रुपये घेऊन त्या बदल्यात करून दिलेले साठेखत रद्द न करता अथवा घेतलेले पैसे परत न देता त्याच जमिनीची परस्पर दुसऱ्याला विक्री करत फसवणूक केल्याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते (वय ४९ वर्ष, रा. भूषणनगर, केडगाव, अहमदनगर) यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. सातपुते यांच्या तक्रारीवरून नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात अंकुशराव जयवंतराव नागरे, जालिंदर जयवंतराव नागरे, गजेंद्र बाळासाहेब नागरे, शांताबाई बाळासाहेब नागरे, कविता संजय फुंदे व राजकुमार अंकुशराव नागरे (सर्व रा. संगम जळगाव, ता. गेवराई, जि. बीड) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचे…
मंगळवार, दिनांक ११ जून २०२४ नगर जिल्ह्यासह जिल्ह्यातून आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांची संख्या मोठी असल्याने दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, राहण्याची व्यवस्था, फिरते स्वच्छतागृह आदी सारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे तसेच याबाबत काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. आषाढी वारीच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, संत निळोबाराय पालखीचे अध्यक्ष अशोकराव सावंत, मानाच्या पालख्यांचे तसेच जिल्ह्यातील दिंड्यांचे प्रमुख उपस्थित होते. सालीमठ म्हणाले, पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील अनेक दिंड्या…
मंगळवार, दिनांक ११ जून २०२४ सरकारने आम्ही दिलेल्या व्याख्येनुसार सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करत मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान त्यांनी उपचारासाठी नकार दिला असल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मोठा लढा उभारत शासनाला या संबंधीचा अध्यादेश काढण्यास भाग पाडले होते मात्र या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याने जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. शनिवारपासून अंतरवली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता. मंगळवारी आरोग्य विभागाचे पथक वैद्यकीय तपासणीसाठी उपोषण स्थळी आले होते. तपासणीअंती जरांगे यांचा बीपी, शुगर कमी झाल्याने त्यांना वैद्यकीय उपचारांची…
मंगळवार, दिनांक ११ जून २०२४ मंगळवारी झालेल्या पावसाने संगमनेर शहराला चांगलेच झोडपून काढले. तासाभरापेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या या पावसामुळे शहरातील बहुतांशी रस्त्यावर सर्वत्र पाण्याचे नाले प्रवाहित होऊन रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. नवीन नगर रस्त्यावर गुडघाभरापेक्षा अधिक उंचीने पाणी वाहताना दिसत होते. शनिवारी झालेल्या पावसामुळे संगमनेरात शेतीच्या कामाला वेग आला असताना मंगळवारी देखील पावसाने संगमनेरात जोरदार हजेरी लावली. मंगळवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात वातावरणात उकाडा जाणवत होता. सायंकाळी पावणे चारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टीला सुरुवात झाली. विशेष म्हणजे जोरदार पडणाऱ्या पावसामुळे नेहमीप्रमाणे शहरातील नाल्यांची दूरवस्था पुन्हा एकदा उघडी पडली होती. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची एकच…
मंगळवार, दि.११ जून लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या नाम साधर्म्यामुळे आणि चिन्हांच्या साधर्म्यामुळे पक्षीय उमेदवारांना मोठा फटका बसल्याचे समोर आले असताना आता नाशिक शिक्षक मतदार संघात नामसाधर्म्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मोठा ट्विस्ट बघावयास मिळाला. नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराच्या धोका टाळण्यासाठी प्रमुख उमेदवार प्रयत्नशील झाले आहेत. उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी केवळ दोन दिवसांचा वेळ असल्याने नाशिक शिक्षक मतदार संघात मोठ्या राजकीय घडामोडी बघावयास मिळत आहे. महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार किशोर दराडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे यांच्या नावाशी नामसाधर्म्यामुळे असलेल्या दोन अपक्ष उमेदवारांनी मंगळवारी निवडणुकीतून माघार घेतली. नाशिक…
मंगळवार, ११ जून २०२४ पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरिपाच्या पेरणीला लागला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा करा तसेच बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सर्व विभागीय आयुक्तांना दिले. सोमवारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीसाठी महसूल, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पवार यांनी पहिल्याच पावसात पुण्यात उद्भवलेल्या परिस्थितीची दखल घेत महापालिकेने याबाबत त्वरित आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. राज्यात काही भागात १०० मिलिमीटर अथवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडला आहे. अशा परिस्थितीत वापसा आल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरण्याचे नियोजन करावे यासाठी, कृषी विभागाच्या समन्वयाने जनजागृती केली…
मंगळवार, ११ जून २०२४ राष्ट्रपती भवनात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील ‘रालोआ’ सरकारचा शपथविधी सुरू असताना दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये वैष्णवदेवी दर्शनाला निघालेल्या भक्तांच्या गाडीवर अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्यात १० हिंदू भाविक ठार झाले आणि ३३ जण जखमी झाले. या रक्तपाताची जबाबदारी केंद्रातील चौकडीवर म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या जोडीला असलेल्या चंद्राबाबू नायडू, नितेश कुमार तिच्यावर असल्याची टीका ठाकरे गटाने केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे की, काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यावर येथे सर्व काही ठीकठाक असल्याचा निर्वाळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देत होते. प्रत्यक्षात काश्मीरमधील हालत अधिक नाजूक होताना दिसत…
मंगळवार, दिनांक ११ जून २०२४ नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी उद्या बुधवारचा (१२ जून) अंतिम दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. नगर जिल्ह्यातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भाजपाच्या विवेक कोल्हे आणि डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्यापैकी कोणाची माघार होते की दोघेही महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरतात हे देखील स्पष्ट होणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्जाची छाननी पार पडली. ३८ उमेदवारांनी दाखल केलेल्या ५३ उमेदवारी अर्ज पैकी ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर निवडणूक आयोगाच्या निकषानुसार अमोल बाळासाहेब दराडे आणि सारांश महेंद्र भावसार या इच्छुकांचे वय ३० वर्षापेक्षा कमी असल्याने दोघांचे उमेदवारी अर्ज…
