Author: अनंत पांगारकर

Maharashtra sanvad news By Anant Pangarkar संगमनेर – कोरोना महामारीमुळे रखडलेल्या पोलिसांच्या बदल्यांना काही दिवसांपूर्वी मुहूर्त लाभला. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी महत्त्वाची शाखा असलेल्या एलसीबीसह जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यातील दीर्घकाळ वतनदार बनलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. बदल्या करताना बहुतांशी वतनदारांना चांगले काम करतील या आशेने मनाजोगे पोलीस ठाणे देखील दिले. मात्र संगमनेर शहर पोलीस ठाण्यासह उपविभागातील अनेक कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी अद्यापही हजर झालेले नाहीत. मनाप्रमाणे बदली होऊनही नव्या नियुक्तीच्या ठिकाणी जाण्यास इच्छुक नसलेल्या कर्मचाऱ्यांना शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी तातडीने मुक्त करण्याची आवश्यकता आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांना नव्या नियुक्तीच्या ठिकाणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली असून अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. त्यांच्या नावामुळे जिल्ह्याचा मान मोठा होणार असल्याचेही ते म्हणाले. चौंडी (ता.जामखेड) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार गोपीचंद…

Read More

डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी… शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद! महाराष्ट्र संवाद न्यूज निळवंडे, निळवंडे धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा व ऐतिहासिक आहे. निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, धरणामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरणाऱ्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची प्रथम चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज निब्रळ येथे यशस्वीरित्या पार पडली. यावेळी महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण ‍विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: शहरातील नासिक-पुणे महामार्गावर असलेल्या जोर्वे नाका येथे रविवारी रात्री झालेल्या हाणामारी आणि दंगल प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या वीसवर गेली आहे. यातील सोळा आरोपींना मंगळवारी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर उर्वरित आरोपींना न्यायालयाने बुधवारी पाच जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. रविवारी रात्री जोर्वे नाका येथे झालेल्या वादातून काही नागरिकांवर प्राणघात हल्ल्याचा प्रयत्न झाला. धारदार शस्त्राचा वापर करत दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला. गुन्हेगारांनी थेट कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत अशांतता निर्माण केल्याने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. यामुळे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : संगमनेर वकील संघाचे विद्यमान अध्यक्ष ॲड. उदयसिंह जगन्नाथ ढोमसे पाटील यांना ‘एशिया इंटरनॅशनल रिसर्च युनिव्हर्सिटी बेंगलोर’ यांच्या वतीने देण्यात येणारी मानाची डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे. डॉक्टरेट मिळवणारे संगमनेर वकील संघाचे ते पाहिले वकील ठरले. ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील यांना कुलगुरू डॉ. अरुणकुमार, न्यायमूर्ती हरिदास व मान्यवरांच्या उपस्थितीत बंगलोर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाने त्यांना “स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक स्थित्यंतरे” या विषयावरील लेखनासाठी डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले. ढोमसे यांचा वकीलीबरोबर, पत्रकारितेतील अनुभव (Master In Journalism, Master In Political Science पदव्या) शेती विषयक वृत्तपत्रांचे योगदान तसेच दुग्ध उत्पादन वाढीबाबत त्यांनी पुणे विद्यापीठाकडे…

Read More

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३१ मे २०२३ रोजी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी होत आहे. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण ‍विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. धरण लाभक्षेत्र परिसरातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून पाण्यासाठी असलेली प्रतिक्षा संपणार आहे. निळवंडे प्रकल्प नेमका काय आहे ? त्याच्या वैशिष्ट्याविषयी माहिती देणारा लेख… महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील १८२ गावांमधील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : ‘संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सुरू असताना, साखर आयुक्तांकडे तातडीची बैठक घेऊन श्री गणेश सहकारी साखर कारखाना हा विखे पाटील कारखान्याला पाच वर्षे कराराने चालवायला देणे हा शेतकरी, सभासद आणि कामगारांशी विश्वासघात आहे. यापूर्वी दहा वर्ष गणेश सहकारी साखर कारखाना हा विखे पाटील कारखान्याच्या ताब्यात होता, त्याच काळात गणेश कारखाना संकटात सापडला, त्यांना दहा वर्षात जे जमले नाही ते पाच वर्षात काय जमणार? मुळात हा करार कारखाना चालवण्यासाठी नाही तर कारखाना कायमचा बंद करण्यासाठी केलेला आहे, सत्तेचा हा गैरवापर गणेश परिसरातील सभासद व शेतकरी सहन करणार नाही’, असा घणाघात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. थोरात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर, शहरातील जोर्वे नाका भागात झालेल्या किरकोळ कारणावरील हाणामारीचे रूपांतर प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत जाऊन पोहोचले. या हल्ल्यात तब्बल आठ जण जखमी झाल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी जिल्हा पोलिसांनी दिवस-रात्र घरपकड करत 16 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयाने 2 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. रविवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून जोर्वे नाका भागांमध्ये जोर्वे येथील नागरिकांवर धारदार शास्त्रांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रकार झाला. यात सुनील पोपट थोरात, तन्मय राजेश दिघे, पुंडलिक पोपट दिघे, विजय मंजाबापू थोरात, अजय भिमाजी थोरात, जितेंद्र कैलास…

Read More

कारखान्याच्या प्रगतीत कामगारांचे महत्त्वपूर्ण योगदान संगमनेर तालुक्यात सर्वांना सन्मानाची वागणूक महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्शावर संगमनेर तालुक्याचा सहकार वाटचाल करत असून आज सहकाराचे आदर्शवत मॉडेल हा तालुका ठरला आहे. कारखान्याच्या विकासात कामगारांचेही महत्त्वपूर्ण योगदान असून तालुक्यात शेतकरी, कामगार, युवक, महिला, सर्वसामान्य नागरिक यांच्यासह सर्वांना सन्मान दिला जात असून तालुक्यातील वातावरण हे एक परिवारासारखे आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा महसूल व कृषिमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 29 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर, येथील मालपाणी उद्योग समूहाच्या पुढाकाराने केंद्र सरकार पुरस्कृत ‘भविष्य निर्वाह निधी आपल्या दारात’ हा उपक्रम संगमनेरमध्ये झाला. जनता दरबार स्वरूपाच्या या उपक्रमामध्ये अनेकांच्या भविष्य निर्वाह निधीच्या आणि निवृत्त वेतनाशी संबंधित समस्यांची सोडवणूक झाल्याने कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू सफल झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. भविष्य निर्वाह निधीच्या नगर विभागाचे वरिष्ठ अधिकारी व त्यांचे सहकारी मालपाणी इंडस्ट्रियल पार्कच्या शिवशक्ती सभागृहामध्ये सोमवारी (ता.29) दिवसभर लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यामध्ये अंमलबजावणी अधिकारी अमित आहुजा, दीपक चौधरी, समन्वयक अन्वर खान आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे महेश धनके यांचा समावेश होता. मालपाणी उद्योग समूहाचे मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक शिवाजी आहेर यांच्यासह कारखान्याचे…

Read More