Author: अनंत पांगारकर
संगमनेर- संगमनेर नगर परिषदेने राबवलेला घनकचरा व्यवस्थापनाचा यशस्वी प्रकल्प आता देशातील इतर राज्यांसाठी आदर्श ठरत आहे. याच यशस्वी मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी आंध्र प्रदेशातील एका विशेष टीमने नुकतीच संगमनेर येथील कचरा डेपोला भेट दिली. या टीमने कचरा वर्गीकरण, खत निर्मिती आणि वीज निर्मिती प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. तत्कालीन मुख्याधिकारी सचिन बांगर व राहुल वाघ, तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पासाठी मोठे काम करण्यात आले होते. तर सध्याचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी या प्रकल्पाला आणखी चालना दिली. संगमनेर नगर परिषद शहरातून जमा होणाऱ्या कचऱ्याचे ओला, सुका आणि घातक कचऱ्यामध्ये वर्गीकरण करते. या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत आणि वीज तयार…
संगमनेर:- संगमनेर तालुक्यातील निमोण सोनेवाडी गावातील अवैध धंदे आणि बेकायदेशीर स्टोन क्रेशरच्या विरोधात सुरू असलेले उपोषण अखेर राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर सोमवारी मागे घेण्यात आले आहे. या प्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश थोरात यांनी प्रशासनाला दिले आहेत. निमोण सोनेवाडी ग्रामसभेने १२ सप्टेंबर २०२२ आणि २७ मे २०२५ रोजी गावात कोणत्याही स्टोन क्रेशरला परवानगी न देण्याचा ठराव केला होता. मात्र, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी खोट्या मासिक मीटिंग्ज दाखवून जनतेची फसवणूक केली. याविरोधात भागवत बाबूराव सांगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचायत समितीसमोर सात दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. प्रशासनाचे या रास्त मागणीकडे दुर्लक्ष होत असताना, बाळासाहेब थोरात…
संगमनेर – दरवर्षीप्रमाणे यंदाही मेनरोड शिवसेना शाखा क्र. ११ च्या वतीने गणेशोत्सव २०२५ च्या निमित्ताने भव्य गणेश उत्सव गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी, संगमनेर शहरातील सर्व गणेश मंडळांचे स्वागत आणि गौरव करण्यात येणार आहे. उद्योगपती ओंकारनाथजी व माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ हा स्वागत सत्कार आणि पारितोषिक वितरण सोहळा गणेश विसर्जन मिरवणुकीत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मानाचे गणपती मंडळ तसेच इतर सर्व मंडळांना त्यांच्या उत्कृष्ट देखावे, भव्य मूर्ती आणि शिस्तबद्ध मिरवणुकीसाठी सन्मानित केले जाईल. या सोहळ्यात अनेक आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. यामध्ये, उत्कृष्ट मूर्ती, भव्य मूर्ती, उत्कृष्ट देखावा, भव्य देखावा, भव्य लायटिंग आणि भव्य मिरवणूक यांसाठी मंडळांना…
(टीप: हे सामान्य राशीभविष्य आहे. तुमच्या वैयक्तिक कुंडलीवर आधारित राशीभविष्य वेगळे असू शकते. तुमचा दिवस शुभ असो!) मेष (Aries) : आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील आणि वरिष्ठ तुमच्या कार्याचे कौतुक करतील. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवल्याने मन शांत होईल. वृषभ (Taurus) : आज तुम्हाला तुमच्या कामात थोडे लक्ष द्यावे लागेल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना घाई करू नका. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, पण खर्च जपून करा. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. मिथुन (Gemini) : आज तुमच्या संवादाच्या कौशल्यामुळे तुमची अनेक कामे मार्गी लागतील. नवीन लोकांशी संपर्क साधण्यासाठी दिवस…
संगमनेर- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहायक भास्कर खेमनर यांनी आमदार हल्ला प्रकरणातील त्यांचे नाव समोर आल्यानंतर एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले असून, हे थोरातांना बदनाम करण्यासाठी रचलेले राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. नेमकं काय म्हटलंय निवेदनात?- खेमनर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार हल्ला प्रकरणातील आरोपी प्रसाद गुंजाळ याने त्यांना २२ ते २५ तारखेदरम्यान एक-दोन वेळा फोन केला होता. ‘साहेब कुठे भेटतील?’ एवढीच विचारणा त्याने केली होती. या १५-२० सेकंदाच्या फोनव्यतिरिक्त आरोपीसोबत त्यांचे आजवर कोणतेही बोलणे झालेले नाही. खेमनर पुढे म्हणतात की, त्यांना दररोज…
संगमनेर – राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, संगमनेर शहरातही मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाच्या आरतीतून गणेशभक्ती दिसू लागली आहे. शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शमी महागणपतीची आरती आमदार सत्यजीत तांबे व मैथिली तांबे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आमदार तांबे यांनी संगमनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली. आरती सोहळ्याला मोठ्या संख्येने संगमनेरकर आणि भाविकांनी उपस्थिती लावली होती. यानंतर आमदार तांबे यांनी शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी अनेक नागरिकांच्या आग्रहामुळे आमदार तांबे यांनी शहरातील घरोघरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि आरतीमध्ये सहभाग घेतला. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा…
संगमनेर- प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ यांच्याशी झालेले आमचे सर्व आर्थिक व्यवहार हे व्यक्तीगत आहेत. या व्यवहारामध्ये आमदार अमोल खताळ यांचा कोणताही संबंध नाही. मात्र राजकीय हेतूने त्यांची बदनामी करण्यासाठी आमच्या आर्थिक व्यवहारांचा कोणताही उपयोग राजकारणासाठी करु नये, अन्यथा आम्हालाही कायदेशीर मार्ग अवलंबावे लागतील, असा इशारा प्रसाद गुंजाळ यांच्याशी आर्थिक व्यवहार केलेले रविंद्र ज्ञानदेव देशमुख यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रविंद्र ज्ञानदेव देशमुख यांनी म्हटले आहे की, प्रसाद गुंजाळ हे शेअर ट्रेडींगचा व्यवसाय करत होते. मागील २० वर्षापासून त्यांची आणि माझी मैत्री आणि घनिष्ठ संबंध राहिले. सप्टेंबर २०२३ मध्ये प्रसाद गुंजाळ शेअर ट्रेडींगच्या व्यवसायात आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांना…
संगमनेर, अहिल्यानगर – आमदार अमोल खताळ यांना मारहाण करणारा आरोपी प्रसाद गुंजाळ पोलीस कोठडीत असतानाच आता त्याच्या आईने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमुळे या हल्ला प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. अनिता आप्पासाहेब गुंजाळ यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये आमदार अमोल खताळ, संदेश देशमुख व इतरांच्याविरोधात तक्रार केली आहे. ही तक्रार आपल्या मुलाची आर्थिक फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी आहे. या घटनेचा राजकारणाशी कोणताही संबंध नसून, घटनेचे राजकारण झाले तर आम्हाला न्याय मिळणार नाही. हे केवळ आर्थिक फसवणुकीतून घडले असल्याचे गुंजाळ यांनी स्पष्ट केले आहे. अनिता गुंजाळ यांच्या तक्रार अर्जानुसार, त्यांचा मुलगा प्रसाद गुंजाळ आणि आमदार खताळ हे अनेक वर्षांपासून मित्र आहेत.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – माजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा राजकारण्यांवर जोरदार टीका केली आहे. राजकारण्यांना धार्मिक कार्यांपासून दूर ठेवावे कारण ते जिथे जातात तिथे ‘आग लावतात’, असे ते म्हणाले. नागपूरमधील महानुभाव पंथ परिषदेत बोलताना गडकरींनी धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकारणावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. गडकरी म्हणाले की, धार्मिक कार्य, सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य वेगवेगळी आहेत. राजकारणी जिथे जिथे जातात, तिथे ते आग लावल्याशिवाय निघत नाहीत. धर्माला सत्तेत आणल्यास समाजाचे नुकसान होते, असा इशारा त्यांनी दिला. धर्म हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे, मात्र काही राजकारणी त्याचा गैरवापर करतात. यामुळे विकास आणि रोजगारासारखे महत्त्वाचे मुद्दे मागे पडतात,…
संगमनेर / अकोले – अकोले तालुक्यात ‘हनीट्रॅप’चा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामध्ये एका 38 वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सापळा रचून एका आरोपी महिलेला रंगेहाथ पकडले आहे. या हनीट्रॅपमध्ये अनेक जण अडकले असल्याची शक्यता असून, संबंधित महिलांनी अनेक पुरुषांना धमकावून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खंडणी उकळली आहे. यामुळे काही जण कर्जबाजारी झाल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे, या टोळीने खंडणीसाठी अल्पवयीन मुलींचाही वापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पीडित व्यक्तीने अकोले पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्याची ओळख संगमनेर येथील कविता विधाते हिच्याशी झाली.…
