Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेरमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ क्लिपवरून राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, यात आता महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस आणि नाराजी उघडपणे समोर आली आहे. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्याकडून बोलताना अनावधानाने झालेल्या एका किरकोळ भाषिक चुकीचे विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर राजकीय भांडवल केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संगमनेर उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपली आक्रमक भूमिका मांडत, ज्येष्ठ महिला नेत्यावर चिखलफेक होत असतानाही काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकारी गप्प का, असा जळजळीत सवाल उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाविषयी कतारी यांनी विरोधकांच्या बेछूट आरोपांचा तीव्र शब्दांत निषेध केला. ते…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळातील पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्रक जारी करत विरोधकांच्या आरोपांना अत्यंत जळजळीत आणि चोख उत्तर दिले आहे. राजकीय फायद्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन एखाद्याच्या संस्कारांवर प्रश्न उपस्थित करणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत, ज्यांना कसलेही भान नाही अशा विरोधकांच्या प्रश्नांना आपण उत्तर देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचे हे पत्र सध्या राजकीय वर्तुळात आणि समाज माध्यमांवर विशेष चर्चेत आले आहे. आपली भूमिका मांडताना दुर्गाताई तांबे म्हणाल्या की,…

Read More

शनिवार, ११ जुलै २०२६ चे राशिभविष्य मेष ♈ आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आशादायक आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन आला आहे. नवीन योजना आखण्यासाठी किंवा नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. मनामध्ये अनेक दिवसांपासून असलेली एखादी इच्छा आज पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाला दाद मिळेल आणि वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल. आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यशस्वी होतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांतता नांदेल, तसेच जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. आरोग्याची साथ उत्तम लाभेल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहाल. वृषभ ♉ आजचा दिवस तुम्हाला संमिश्र फळे देणारा ठरेल. आर्थिक व्यवहार करताना किंवा कुठेही गुंतवणूक…

Read More

मुंबई:  सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना ‘भाडे के तट्टू’ किंवा ‘बघून घेईन’ अशा धमक्या देणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभत नाही आणि ‘देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्र नाही’ हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.  मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या कथित भ्रष्टाचारावर आणि शेतकरी विरोधी धोरणांवर कडक शब्दांत आक्षेप घेतला. हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ‘कुत्रे’ किंवा ‘भाड्याचे तट्टू’ यांसारखे शब्द शोभा देत नाहीत, कारण ही टपोरी लोकांची भाषा आहे. लोकशाहीत सरकारच्या कामावर प्रश्न विचारण्याचा जनतेला आणि विरोधी पक्षांना पूर्ण अधिकार आहे. काँग्रेस पक्षाने मिसिंग लिंकच्या कामातील कथित भ्रष्टाचाराची पोलखोल करून फडणवीसांना ‘डिझास्टर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहरात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी सांडपाणी साचले असून, पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्यांमध्ये हे दूषित पाणी मिसळून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने तात्काळ नियमित पाणी तपासणी करून शुद्ध पाणीपुरवठा करावा, अन्यथा संगमनेरकरांच्या आरोग्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा थेट आणि आक्रमक इशारा शिवसेनेच्या (शिंदे गट) एकमेव विरोधी नगरसेविका साक्षी विनोद सूर्यवंशी यांनी नगरपालिका प्रशासनाला दिला आहे. शहरातील गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना यासंबंधीचे निवेदन देत तातडीने युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सूर्यवंशी यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता संगमनेर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे होणार का, याकडे संपूर्ण…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी मान-सन्मान वाढवणारा आणि उत्तम ठरेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल आणि रखडलेली कामे पुन्हा वेगाने सुरू होतील. आपल्या मतांविषयी तुम्ही आग्रही राहाल. मात्र, आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेताना घाईगडबड करणे टाळावे, अन्यथा खर्चात अनावश्यक वाढ होऊ शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. वृषभ – आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस अत्यंत लाभदायी ठरेल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने कठीण कामे सुलभ होतील आणि काही नवीन मोठे प्रकल्प तुमच्या हाती येण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. आरोग्याच्या बाबतीत काही जुन्या तक्रारी उद्भवू शकतात, त्यामुळे खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या आणि कामाचा ताण टाळा. मिथुन – गेल्या अनेक दिवसांपासून चालत…

Read More

संगमनेर: आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश येण्याची चिन्हे असून संगमनेर येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्याबाबत परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुंबईत पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत आमदार तांबे यांनी परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन संगमनेर आणि अकोले परिसरासाठी नव्या निकषांनुसार स्वतंत्र आरटीओ कार्यालय मंजूर करण्याची मागणी केली. यावर तातडीने कार्यवाही करत परिवहन मंत्र्यांनी नव्या शासन अध्यादेशातील निकषांच्या आधारे संगमनेरसाठीचा प्रस्ताव सकारात्मकरीत्या तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. संगमनेर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक मुख्य व्यापारी, शैक्षणिक आणि वाहतूक केंद्र असल्याने येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाहनांची खरेदी-विक्री होते. मात्र, सध्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: निळवंडे धरणातून संगमनेर शहरासाठी राबविण्यात आलेली ऐतिहासिक थेट पाईपलाईन योजना पूर्णपणे यशस्वी झाली असून शहरवासीयांना दररोज स्वच्छ व मुबलक पाणी मिळत आहे. असे असताना २००९ च्या योजनेबाबत २०२६ मध्ये विधानसभेत अत्यंत खोटे, चुकीचे आणि अपूर्ण माहितीच्या आधारे आरोप करून संगमनेर शहर व तालुक्याची राज्यात बदनामी करण्याचे काम येथील नवीन लोकप्रतिनिधी करत आहेत. पालिका निवडणुकीत घरातील उमेदवारासह सर्वच जागांवर सपाटून मार खाल्ल्यामुळे आलेल्या वैफल्यग्रस्ततेतूनच हे आरोप केले जात असून, राज्य शासनाने जाहीर केलेल्या चौकशीचे आम्ही स्वागतच करतो. या चौकशीतून ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन तोंडाच्या वाफा दवडणारे विरोधक तोंडघाशी पडतील, अशी घणाघाती टीका माजी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: संगमनेर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेची नगर विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि दोन महिन्यांत दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत केली. आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, खताळ यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे या गंभीर प्रकरणावर सभागृहात जोरदार आवाज उठवला होता. आमदार खताळ यांनी सभागृहात सांगितले की, जून २००९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पाणीपुरवठा योजनेच्या निविदेला तब्बल ६९ टक्के वाढीव दराने मंजुरी देण्यात आली होती. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढीव दराने निविदा मंजूर होण्याचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाइन संगमनेर: तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरु असलेल्या अखंडित भीज पावसामुळे ग्रामीण भागाला मोठा तडाखा बसला आहे. या सातत्यपूर्ण पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरांचे आणि शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील सावरगावतळ येथे तर बुधवारी सकाळी तीन शेतकऱ्यांची राहती घरे कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सावरगावतळ येथील वयोवृद्ध शेतकरी कारभारी दशरथ थिटमे, दादाभाऊ एकनाथ नेहे आणि भाऊसाहेब विठोबा नेहे या तिघांच्या घरांच्या भिंती बुधवारी सकाळी अचानक कोसळल्या. यामध्ये घरांचे अतोनात नुकसान झाले असून कुटुंबे उघड्यावर आली आहेत. मात्र, अचानक ओढवलेल्या या संकटामुळे या सर्व कुटुंबांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागले असून, त्यांच्यासमोर आता सुरक्षित निवाऱ्याचा…

Read More