Author: अनंत पांगारकर
मेष (Aries)- आज तुम्हाला मानसिक शांती आणि आनंद मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये असलेले नाते अधिक घट्ट होईल. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. वृषभ (Taurus)- आज तुम्ही शांत आणि आत्मविश्वासाने कामाला सुरुवात कराल. तुमचे छुपे शत्रू किंवा विरोधक तुमच्याशी स्पर्धा करू शकणार नाहीत, ज्यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या समर्पणाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रमोशन मिळू शकते. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहांचा आशीर्वाद मिळेल. मिथुन (Gemini)- आज तुम्ही कौटुंबिक बाबींमध्ये व्यस्त असाल, परंतु तुम्ही उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत शोधण्यास देखील सक्षम असाल. तुमची…
संगमनेर: सकल मराठा समाज, शहर आणि तालुका यांच्या वतीने मंगळवारी (९ सप्टेंबर) संगीता वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी संगमनेर शहर पोलीस स्टेशनला निवेदन दिले जाणार आहे. मराठा समाजातील महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा निषेध करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाणार आहे. मोठ्या संख्येने मराठा समाजातील महिला आणि पुरुष हे निवेदन देणार आहे. संगीता वानखेडे यांनी केलेल्या मराठा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह विधानांमुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या विधानांचा निषेध करत, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. या निवेदनानंतर पोलीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल…
संगमनेर: गणेश विसर्जनाच्या दिवशी संगमनेरच्या पठार भागातील साकुर मध्ये दोन सख्या चुलत बहिणींनी आत्महत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच त्या पाठोपाठ संगमनेर शहराला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाह केलेल्या एका दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही घटना शहरातील इंदिरानगर परिसरातील जय जवान चौकात घडली. या दुर्दैवी घटनेत वैष्णवी संजय खांबेकर (वय २२) आणि तिचा पती कुलदीप सुनील अडांगळे (वय ३५) यांचा अंत झाला. वैष्णवी आणि कुलदीप यांचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघेही जय जवान चौकातील घरात राहत होते. या संदर्भात अद्याप पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाली…
संगमनेर- नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि वडनेर दुमाला येथे बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय आयुष आणि 10 वर्षीय सारंग या दोन निष्पाप मुलांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच, आमदार सत्यजीत तांबे यांनी बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘बिबट्या नसबंदी कायदा’ लागू करण्याची जोरदार मागणी केली आहे. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने या मागणीचा पाठपुरावा केला असून, ही लढाई बिबट्यांविरोधात नसून शेतकऱ्यांच्या आणि माणसांच्या जगण्याच्या हक्कासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. आमदार तांबे यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या मुलांचा असाच बळी जात राहणार का? बिबट्याच्या हल्ल्यात नाशिकच्या वडनेर दुमाला येथील 3 वर्षीय आयुषच्या मृत्यूनंतर त्याच्या आईचा आक्रोश आजही डोळ्यासमोर आहे आणि कालच सिन्नर…
संगमनेर – सहकाराचे आदर्श मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, १२ सप्टेंबर ते रविवार, १४ सप्टेंबर २०२५ या काळात आयोजित करण्यात आल्या आहेत. या सभा काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत. स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर आधारित या संस्थांनी संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या संस्थांमुळे शेतकरी, उत्पादक, नागरिक, महिला, व्यापारी आणि कामगार अशा सर्वांचा विकास झाला असून तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. या सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावरील नवीन प्रशासकीय…
संगमनेर – जगातील सर्व दुःख मलाच आहे असे अनेक जण समजून जीवन दुखी करतात. दुःख विसरा हसत रहा. शोधले तर प्रत्येक ठिकाणी आनंद आहे. व्यंग हे प्रत्येक ठिकाणी आहे. ते शोधण्याची कला अरविंद गाडेकर यांना असून त्यांच्या “मनातलं पानावर” हे पुस्तक वाचकांना आनंद देईल आणि जीवनातील दु:ख विसरून आनंदी राहण्यास मदत करेल, असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी व्यक्त केला आहे. व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांच्या “मनातलं पानावर” या पुस्तकाचे प्रकाशन संगमनेर येथे सह्याद्री महाविद्यालयाच्या के. बी. दादा सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते, तर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, श्रीमती सुवर्णाताई मालपाणी, अनिल देशपांडे,…
मुंबई- राज्यात यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी राज्यभरात विसर्जन मिरवणुका मोठ्या जल्लोषात पार पडल्या. मात्र, काही ठिकाणी गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या दुर्दैवी घटनांमुळे १८ जणांचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये तिघांचा मृत्यू- नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान विविध घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. आनंदवल्ली येथे गोदावरी नदीत प्रवीण शांताराम चव्हाण या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. दुसरीकडे, बोरगड येथे चंदर नथू माळेकर (वय २९) यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सिन्नर शहरालगतच्या सरदवाडी धरणातही ओमप्रकाश सुंदरलाल लिल्हारे (वय ४०) यांचा बुडून मृत्यू झाला. धुळे, मीरा भाईंदर आणि मुंबईत दुर्घटना- धुळे जिल्ह्यात गणपती विसर्जन करून दुचाकीवरून परतणाऱ्या शुभम सांगवी…
मेष (Aries)- आर्थिक बाबतीत आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्हाला अनपेक्षित धनलाभ किंवा उत्पन्न वाढवण्याची संधी मिळू शकते. कौटुंबिक जीवनात मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा गैरसमज होण्याची शक्यता आहे. वृषभ (Taurus)- आज तुम्हाला नवीन कल्पना किंवा प्रकल्प सुरू करण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. हा दिवस शिकण्यासाठी आणि स्वतःच्या विकासासाठी चांगला आहे. नातेसंबंधांमध्ये, मोकळेपणाने संवाद साधा आणि तुमच्या भावना व्यक्त करा. मिथुन (Gemini)- तुमच्या व्यावसायिक जीवनात प्रगती दिसून येईल. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल, ज्यामुळे तुम्हाला पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. आरोग्याकडे लक्ष द्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. कर्क (Cancer)- आजचा दिवस सामाजिक कामांसाठी आणि लोकांशी संपर्क साधण्यासाठी उत्तम आहे.…
संगमनेर- यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाच्या सोमेश्वर गणेश मंडळाच्या आरतीवरून निर्माण झालेल्या वादावर मंडळाचे मार्गदर्शक कृष्णराव (आप्पासाहेब) खरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमदार अमोल खताळ यांनी मानपत्रावरून नाराजी व्यक्त करत मिरवणुकीतून निघून जाण्याचा निर्णय घेतल्याने हा वाद समोर आला होता. रंगारगल्लीतील १३० वर्षांची परंपरा असलेल्या सोमेश्वर मंडळाची विसर्जन मिरवणूक यंदा चर्चेचा विषय ठरली. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत आमदार झालेले अमोल खताळ आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे दोघेही आरतीसाठी उपस्थित होते. संभाव्य वाद टाळण्यासाठी मंडळाने दोन्ही नेत्यांसाठी स्वतंत्र आरतीच्या ताटांची व्यवस्था केली होती. दरम्यान सोमेश्वर मंडळाचे मार्गदर्शक आप्पासाहेब खरे यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, आरती व्यवस्थित पार पडली. मात्र, त्यानंतर…
श्रीरामपूर – गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा कुजलेला मृतदेह पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील एका बंद आणि पडक्या खोलीत आढळला आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात शोककळा पसरली असून, मोठी खळबळ उडाली आहे. महेश डोरले (वय अंदाजे २५) असे मृत तरुणाचे नाव असून, तो गोंधवणी रोड, वॉर्ड नं. १ येथील रहिवासी होता. ५ जुलैपासून महेश अचानक बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे ६ जुलै रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते, पण त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर, दोन महिन्यांनी त्याचा मृतदेह पाटबंधारे विभागाच्या वसाहतीमधील एका पडक्या खोलीत आढळला. गणेश विसर्जन…
