Author: अनंत पांगारकर
मुंबई, दि. ९ एप्रिल – महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. त्यानुसार, शासनाचे महत्वाचे ऑनलाइन सेवा पोर्टल, ‘आपले सरकार’, येत्या १० एप्रिल २०२५ (गुरुवार) ते १४ एप्रिल २०२५ (सोमवार) या पाच दिवसांच्या कालावधीत तात्पुरते बंद राहणार आहे. या काळात पोर्टलवर पूर्वनियोजित देखभाल आणि तांत्रिक सुधारणांचे काम केले जाणार आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘आपले सरकार’ पोर्टलच्या हार्डवेअरमध्ये सुधारणा करणे आणि प्रणाली अद्ययावत करणे आवश्यक आहे. यामुळे पोर्टलची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल आणि नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळू शकेल. हे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी १० एप्रिल ते १४ एप्रिल या दरम्यान पोर्टलवरील सर्व…
कोल्हापूर, दि.९ एप्रिल – राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करणारा प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावर आज, ९ एप्रिल रोजी निर्णय येणार आहे. न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. १२ एप्रिल रोजी कोरटकरची न्यायालयीन कोठडी संपणार असून, त्यापूर्वी न्यायालय त्याला जामीन देणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्यावतीने वकील असीम सरोदे यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले होते की, कोरटकरने पहिल्यांदा कॉल केल्यावर सावंत यांनी तो कट केला. दुसऱ्यांदा कॉल केल्यावर वेगळी भाषा वापरल्याने सावंत यांनी संभाषण रेकॉर्ड केले. मात्र, कोरटकरने पोलिसांना…
मुंबई, दि. ८ एप्रिल – विशेष प्रतिनिधी राज्याच्या नव्या वाळू रेती धोरणाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. सध्या राज्यात सुरू असलेली वाळूची डेपो पद्धती बंद करण्यात येणार असून सध्या सुरू असलेल्या डेपो येथील वाळू संपल्यावर बंद करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात घरकुल उभारण्यासाठी पाच ब्रास वाळू विनामूल्य देण्यात येईल तसंच प्रत्येक वाळू डेपोत दहा टक्के आरक्षण घरकुलासाठी असेल, असं जाहीर करण्यात आलंय. खाडीपात्रासाठी तीन वर्षांसाठी आणि नदीपात्रासाठी दोन वर्षांसाठी अशा लिलाव पद्धतीने वाळू उपसा करण्यास परवानगी देण्यात येईल. सरकारी विविध इमारतींच्या बांधकामामध्ये एम सँड म्हणजे कृत्रिम वाळूचा वापर केला जाईल. तसंच पुढील कॅबिनेटमध्ये नैसर्गिक वाळू देण्याचं…
मुंबई, दि. ८ एप्रिल विशेष – प्रतिनिधी राज ठाकरे आणि मनसेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे तिरस्कार पसरवत असून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. उत्तर भारतीय विकाससेना नामक पक्षाच्या सुनील शुल्कांनी ही याचिका दाखल केली आहे. सुनील शुक्ला मुंबईचेच रहिवासी असून त्यांच्या पक्षाच्या कार्यालयावर गेल्या वर्षी मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. दरम्यान या शुक्लाचा बोलवता धनी हा भारतीय जनता पक्ष असल्याचा आरोप मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदिप देशपांडे यांनी केला आहे. उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे हिंसेला पाठिंबा देत असल्याचा आरोप सुनील शुक्लाने केला आहे. राज ठाकरेंविरोधात…
संगमनेर, दि. ८ एप्रिल – प्रतिनिधी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीने चांगलाच वेग घेतला आहे. उद्या (९ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने आज दिवसभर इच्छुकांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत विरोधकांनी देखील सक्रिय सहभाग दर्शविला असून, विद्यमान संचालकांनीही आपले अर्ज भरले आहेत. उद्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून आणखी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, दाखल झालेल्या अर्जांची छाननी ११ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीत राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि…
संगमनेर, दि. ८ एप्रिल – प्रतिनिधी तालुक्यातील अंभोरे गावातील वीज, पाणी आणि रस्त्यांसारख्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी अंभोरे ग्रामस्थांना दिला. अंभोरे येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली. या वेळी सप्ताह समितीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी गावातील गंभीर वीज, पाणी व रस्त्यांच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. खताळ म्हणाले, अंभोरे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आपण नेहमीच तत्पर राहू. आध्यात्मिक, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील विविध विकासकामे लवकरच पूर्ण केली जातील. या कार्यक्रमाला संपत गोविंद खेमनर, अनिल शिवराम खेमनर,…
मुंबई, दि. ८ एप्रिल – प्रतिनिधी मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाच्या निर्णयांची माहिती दिली. या निर्णयांमध्ये राज्यातील विकासकामांना गती देणे, झोपडपट्टी पुनर्वसन अधिक प्रभावी करणे आणि नागरिकांच्या सोयीसाठी विविध धोरणे निश्चित करणे यावर भर देण्यात आला आहे. बैठकीतील प्रमुख निर्णय खालीलप्रमाणे… * विकास प्राधिकरणांना शासकीय जमिनी हस्तांतरित: नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणांना हस्तांतरित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळे या प्रदेशांमधील विकास कामांना मोठी चालना मिळणार आहे. (नगर विकास) * राज्याचे नवीन वाळू-रेती निर्गती धोरण जाहीर: राज्याचे वाळू-रेती निर्गती धोरण-२०२५ जाहीर करण्यात आले आहे. (महसूल) *…
पुणे, दि. ७ एप्रिल पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिघी पोलिसांनी मोशीतील एका दगडाच्या खाणीत एका व्यक्तीचा हात, पाय आणि मुंडक नसलेला मृतदेह शोधून काढला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारावर अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृतदेहाची ओळख पटली असून सीताराम ढाले असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते जेसीबी चालक होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सीताराम ढाले २९ मार्च रोजी घरातून कामासाठी निघाले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते मोशीतील दगडाच्या खाणीच्या दिशेने जाताना दिसले होते. मात्र, ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने ३१ मार्च रोजी भोसरी पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची…
संगमनेर, दि. ७ एप्रिल – विलास गुंजाळ शिर्डीहून साईबाबांचे दर्शन घेऊन नारायणगावकडे परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला सायंकाळी सहाच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर डोळासणे उड्डाणपुलाजवळ एका ट्रकने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत नारायणगाव येथील सचिन पांडुरंग दरेकर या साईभक्ताचा जागीच मृत्यू झाला, तर आशा नागनाथ दराडे (वय ५५) आणि अश्विनी शिवाजी बोराडे (वय ४५) या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. दोघीही नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाविक (एम एच १४ जी यु २६४४) क्रमांकाच्या टेम्पोमधून शिर्डीहून दर्शनानंतर आपल्या गावी परतत होते. डोळासणे उड्डाणपुलाच्या उतारावर, रस्त्याच्या कडेला पाणी पिण्यासाठी टेम्पो थांबला असताना, नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या (एम एच १५…
मुंबई, दि. ७ एप्रिल – विशेष प्रतिनिधी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला होता. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र रिव्हॉल्वरवर अक्षयचे फिंगरप्रिन्टस आढळले नाहीत, असे फॉरेन्सिक अहवालात समोर आला होता. यानंतर आता अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. मात्र पोलिसांनी बनावट चकमकीत मुलाची हत्या केल्याचा आरोप करत अक्षय शिंदेच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर…
