Author: अनंत पांगारकर
संगमनेर दि. २ फेब्रुवारी – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही कर्तुत्वान माणसे असतात. कर्तुत्वाला भाषेची गरज नसून प्रामाणिकपणे कष्ट करा. कारण फसवून मिळालेले यश हे आयुष्यभर अपमान करत असते. नम्रतेने जग जिंकता येते, असे सांगताना अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने गुणवत्तेबरोबर परिपूर्ण विद्यार्थी घडवले असल्याचे गौरवोद्गार, लेखक तथा उद्योजक शरद तांदळे यांनी काढले आहे. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर विश्वस्त डॉ सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख, ॲड. आर. बी.सोनवणे, लक्ष्मणराव कुटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मेधाचे समन्वयक प्राचार्य डॉ. एम. ए.…
संगमनेर दि. २ फेब्रुवारी – प्रख्यात लेखक असलेल्या शरद तांदळे यांनी आज रामाच्या काळात ‘रावण राजा राक्षसांचा’ कादंबरी लिहिली आहे. आगामी बळी या पुस्तकाचे ते लेखन करत असून ‘बळी’देखील क्रांतिकारक पुस्तक असेल असा विश्वास राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त करत मेधा महोत्सवाच्या आनंद पर्वाचे सुरुवात झाल्याची घोषणा केली. संगमनेर मध्ये रविवारी अमृतवाहिनी कॉलेजच्या प्रांगणात बहुचर्चित ठरलेल्या मेधा महोत्सव २०२५ ला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. मेधा महोत्सवाचे पहिले पुष्प प्रख्यात लेखक, मेकॅनिकल इंजिनियर असलेले उद्योजक शरद तांदळे यांनी गुंफले. यावेळी थोरात यांच्यासह माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य…
संगमनेर दि. २ फेब्रुवारी – प्रत्येक तरुणांमध्ये काही सुप्त गुण दडलेले असतात. सुप्त गुणांच्या रूपाने प्रत्येकामध्ये दडलेला हा राजहंस आपल्याला माहित नसतो. त्यामुळे बऱ्याचदा तो माहिती करून देण्यासाठी मेधा महोत्सवाचा खूप उपयोग होत असतो. असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार व जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे यांनी केले. संगमनेरमध्ये रविवारी दोन दिवस चालणाऱ्या आणि तरुण-तरुणींसाठी आकर्षण ठरलेल्या मेधा महोत्सव २०२५ ला प्रारंभ झाला. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात अध्यक्षस्थानी होते. प्रख्यात उद्योजक व लेखक शरद तांदळे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त शरयू देशमुख आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉ. तांबे म्हणाले, अनेक दिवस ज्या उत्सव,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक दि. – २ रविवारी पहाटे नाशिक-गुजरात महामार्गावरील सापुतारा घाटामध्ये खासगी लक्झरी बस दोनशे फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज (रविवार) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून यात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १५ जण गंभीर जखमी असून ४२ प्रवासी किरकोळ जखमी आहेत. तसेच हा अपघात इतका भीषण होता की बस दरीत कोसळल्याने बसचे दोन तुकडे झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु असून जखमींना रुग्णालयात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नितेश राणे यांना महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय व बंदरे यामध्ये खूप काम करण्याचा वाव आहे. ज्या विभागाचे मंत्रीपद मिळाले आहे तिथे कामगिरी करून दाखवा. नको त्या भानगडीत पडण्यापेक्षा त्यावर लक्ष दिले तर उत्तम होईल. अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी भाजपाचे मंत्री नितेश राणे यांना सुनावले आहेत. मंत्री राणे यांनी ‘परीक्षेला बसताना बुरख्यावर बंदी आणावी, त्याने कॉपी करण्याचे प्रमाण कमी होईल’, अशी हास्यास्पद मागणी केली होती. मात्र राणे यांची ही मागणी फेटाळत राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सामाजिक भान राखले असल्याचे सांगत रूपवते यांनी हे सरकार जाणीवपूर्वक दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न…
शहाणा होईल तो माणूस कसला, अशी बोली म्हण आहे. मरणासाठी तो कुठल्याही संकटाची तमा बाळगत नसतो. वाईच्या मांढरादेवीच्या गडावर घसरून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संकटाची तमा जे बाळगत नाहीत, त्यांना काही सांगून डोकं चालवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. याने मरण आलंच तर आदळआपट करायची आणि गप्प बसायचं. प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभ मेळ्यात चेंगरून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या प्रति असंच म्हणता येईल. सारासार विचार करणारा माणूस तिथे मरायला जाणार नाही. ज्याला श्रध्देचं ठिकाण मानलं जातं तिथेच अशा घटना घडतात. मात्र श्रध्दा म्हणून कोणी कोणाला वाचवायला येत नाही. पवित्र स्नान केल्याने पापं धुवून निघतात आणि मोक्ष मिळतो, असं मानायच्या ठिकाणी ३० जण मोक्षाला गेले. असा मोक्ष…
अहिल्यानगर दि. १ – जिल्ह्यातील १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जिल्हा प्रशासनाकडे रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहे. या रुग्णवाहिकांचे वाटप राज्याचे जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी (१ फेब्रुवारी) करण्यात आले. यांची होती उपस्थिती… जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार मोनिका राजळे, अमोल खताळ, विठ्ठल लंघे, काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते. १९ रुग्णवाहिका… अहिल्यानगर जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत एकुण ११५ प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर असून त्यापैकी १०२ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत…
अहिल्यानगर दि.१- जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगस्नेही वातावरणासाठी सुपा व अहिल्यानगर औद्योगिक वसाहत क्षेत्राच्या हद्दीतील अतिक्रमणे तातडीने काढण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले. शनिवारी (१ फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सुपा व पारनेर औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नांबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री विखे बोलत होते. बैठकीस आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, पारनेरचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत चिंचकर, तहसिलदार श्रीमती गायत्री सौंदणे आदी उपस्थित होते. पालकमंत्री विखे म्हणाले, जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये अधिकाधिक उद्योग येऊन जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याला शासनामार्फत प्राधान्य देण्यात येत आहे. सुपा व…
संगमनेर दि. १ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या मुंबईतील कार्यक्रमात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचे विश्लेषण करत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दरम्यान थोरात यांचा पराभव करून संगमनेरमधून निवडून आलेल्या आमदार अमोल खताळ यांनी राज ठाकरे यांना या संदर्भात आपल्या एक्स अकाउंटवर उत्तर देताना संगमनेरमध्ये आमंत्रित केले आहे. निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच ठाकरे यांनी निकालाबाबत व्यक्त केलेली शंका संगमनेरमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकांना थोरात यांचा पराभव अनपेक्षित असाच होता. मात्र थोरात यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या कार्यकाळात या मतदारसंघात केलेली कामे जनतेसमोर असताना देखील थोरात यांनी चाळीस वर्षात काय केले असा प्रश्न…
संगमनेर दि. १ – संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळेस ७० हजारपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा झालेला पराभव हे राज्यातील मोठे आश्चर्य असल्याचे मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासह राज्यातील विधानसभा निवडणूक निकालावर शंका व्यक्त केली जात असतानाच संगमनेर विधानसभेचा निकाल हा जनतेला न पटणारा आणि अनपेक्षित असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. मुंबई येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या चारच महिन्यात विधानसभेत असा निकाल कसा लागू शकतो. हा मोठा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. महाराष्ट्रातून सलग…
