Author: अनंत पांगारकर
मंगळवार १७ डिसेंबर | अनंत पांगारकर संगमनेर – संगमनेर शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था ढासळत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. दोन तासाच्या अंतरात संगमनेर बस स्थानकावर दोन प्रवासी महिलांच्या जवळील दीडशे ग्रॅम पेक्षा अधिक वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोकड रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार सोमवारी संध्याकाळी समोर आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात लता शरद घुगे (रा. सायखेडा, निफाड) व शुभांगी रवींद्र कासार (रा. खराडी, पुणे) या दोन्ही महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दागिने चोरीचे स्वतंत्र दोन गुन्हे भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार नोंदविण्यात आले आहेत. संगमनेर शहरातील दागिने चोरीच्या घटना लक्षात घेता अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस…
सोमवार १६ डिसेंबर विशेष प्रतिनिधी | मुंबई महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात आल्यामुळे महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे. गेल्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या अनेकांना डच्चू देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा सुरू आहे. मंत्रीपद न मिळाल्याने महायुतीतील तिन्ही पक्षाचे नेते नाराज आहे. या नाराजांची मनधरणी करून त्यांची समजूत कशी काढायची, त्यांना शांत कसे करायचे याचं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर आहे. नाराज असलेल्या या दिग्गज नेत्यांना अडीच वर्षानंतर खांदेपालट झाल्यावर संधी मिळणार की पक्षातील आणखी कुठली मोठी जबाबदारी मिळणार यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. महायुतीच्या…
सोमवार १६ डिसेंबर अहिल्यानगर – गरजू महिलां व मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. योजने अंतर्गत महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि चालविण्यासाठी इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांनी या योजनेच्या लाभासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्लॉट क्र.४/५/३, जिव्हाळा हाऊस, खोडदे यांची इमारत, वंदे मातरम कॉलनी, कल्याण रोड, अहिल्यानगर येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.
सोमवार १६ डिसेंबर अहिल्यानगर – जिल्ह्यात १९ ते २४ डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताहांतर्गत ‘प्रशासन गाव की ओर’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा आणि नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आदी उपस्थित होते. तर जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. सालीमठ म्हणाले, कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करावे. विविध महामंडळांनी लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्यावा. नाविन्यपूर्ण कल्पना वापरून नागरिकांना विविध सेवा सुलभपणे उपलब्ध करून द्याव्यात. गाव कचरामुक्त किंवा…
सोमवार १६ डिसेंबर नागपूर – बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार अपेक्षित चर्चा सभागृहात झाली पाहिजे. संविधानाचा अपमान करणारा व्यक्ती मनोरुग्ण होता. विरोधी पक्षाने राजकारण न करता अशा घटना घडू नयेत यासाठी चांगल्या सूचना मांडाव्यात, अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्तावादरम्यान सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र…
बीड व परभणीच्या घटनांवर राज्यातील जनतेत तीव्र संताप, सरकारने उत्तर द्यावे… माजी मंत्री रविंद्र चव्हाणांच्या बंगल्यावर ९ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी तरुणाला किडनॅप करून अत्याचार. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधीपक्ष आक्रमक, ईव्हीएम व बीड, परभणीतील मुद्द्यांवर विधानभवनच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी. सोमवार १६ डिसेंबर नागपूर – अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परभणी व बीडमधील घटनांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संविधानाची विटंबना व सरपंचाची निघृण हत्या या दोन्ही घटना भाजपा सरकार आल्यानंतर घडल्या आहेत. परभणीत एका आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. या घटना अत्यंत गंभीर असून आंबेडकरी अनुयायी व राज्यातील जनतेत प्रचंड संताप आहे. सरकारने या मुद्द्यांवर उत्तर द्यायची तयारी दाखवावी, अशी मागणी महाराष्ट्र…
सोमवार १६ डिसेंबर रविवारी संध्याकाळी महायुतीच्या सरकारमधील ३९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मंत्रीपद न मिळाल्याने नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पक्षांतर्गत नव्या वादाला तोंड फुटले आहे. सुरुवातीलाच मंत्रिपदावरून आमदारांमधील खदखद बाहेर आली आहे. भोंडेकर म्हणाले, मला भाजपातील पक्षप्रवेशासाठी नक्कीच देवेंद्र फडणवीसांचा आग्रह होता. मलाही ते नेते म्हणून आवडतात. परंतु माझ्यावर पक्षांतराचा डाग लागू नये म्हणून मी जुन्या शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पश्चातापाची वेळ आल्यासारखे वाटतं. इथं शिवसेना काहीच नाही, आम्ही आमच्या ताकदीवर आहोत. एवढे मोठे पद असताना अशी परिस्थिती येते तेव्हा नक्कीच मनात तसं वाटतं. मागच्या अडीच वर्षापूर्वी १० अपक्ष…
सोमवार १६ डिसेंबर संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यात सन २०२४-२५ या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या १,८०,९११ साखर पोत्यांचे पूजन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी बोलताना थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करताना तालुक्याचे हृदय म्हणून काम केले आहे. भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर साखर कारखान्यासह अमृत उद्योग समूहातील सर्व सहकारी संस्थांची वाटचाल सुरू आहे. उच्चांकी भाव देण्याची परंपरा कारखान्याने कायम जपली असून चालू हंगामातही १० लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त…
सोमवार १६ डिसेंबर – नागपूर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत काँग्रेसवर हल्लाबोल करताना घराणेशाही मोडून काढण्याचा संकल्प केला होता. दुसरीकडे राज्यात काँग्रेसची वाताहात करणाऱ्या महायुतीने आपल्या मंत्रिमंडळावर घराणेशाहीचा ठसा उमटविला असल्याचे दिसत आहे. ३९ मंत्र्यांच्या यादीत बहुतांश मंत्री घराणेशाहीतून आले असल्याचे दिसते. रविवारी नागपूरमधील राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात ३९ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह ही संख्या ४२ वर गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारमध्ये चेहऱ्यांना संधी दिली असली तरी मंत्रिमंडळात या मंत्रिमंडळात आपल्याच पंतप्रधान मोदींच्या संकल्पाला तडा देत मंत्रिमंडळात घराणेशाहीतील मंत्र्यांची वर्णी लावली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत…
सोमवार १६ डिसेंबर सासऱ्याला निवृत्तीनंतर मिळालेले पैसे आपल्या नावावर करावे तसेच एक एकर जमीन आपल्या नावावर करावी, या मागणीसाठी सुनेने आणि तिच्या नातेवाईकांनी खोटा गुन्हा दाखल करत दिलेल्या त्रासाला वैतागून नैराश्य आलेल्या सासऱ्याने विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचा दुर्दैवी प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे. भाऊसाहेब ब्राम्हणे असे दुर्दैवी सासऱ्याचे नाव आहे. याबाबत भाऊसाहेब ब्राम्हणे यांची पत्नी लताबाई ब्राम्हणे (रा. चिंचोलीफाटा, ता. राहुरी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपले पती हे ए.डी.सी.सी. बँकेत नोकरीला होते. २०१६ साली ते सेवानिवृत्त झाले. मुलगा विशाल याचा विवाह १३ वर्षांपूर्वी चंद्रकांत ओहोळ (रा. फत्याबाद, ता. श्रीरामपूर) यांची मुलगी वर्षा…
