Author: अनंत पांगारकर
मंगळवार, १३ ऑगस्ट अडीच वर्षांचा असलेला नगराध्यक्षांचा कालावधी आता पुन्हा पाच वर्षांवर करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून अन्य महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. 👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) : ✅ विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार. १४९ कोटीस मान्यता. ✅ मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय. लाखो नागरिकांना लाभ. ✅ डेक्कन कॉलेज,…
मंगळवार १३ ऑगस्ट दहावीच्या परीक्षेचे रिसीट काढण्यासाठी साकुर गावात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बळजबरी करून साकुरच्या रुबाब पान शॉप मध्ये तिच्यावर अत्याचार बलात्कार केल्यानंतर या मुलीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार चार महिन्यांपूर्वी समोर आला होता. यातील मुख्य आरोपीला सहाय्य करणाऱ्या चौथ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना सुमारे चार महिन्यांनी यश आले आहे. विजय शिवाजी खेमनर (वय २९ वर्ष रा. हिरेवाडी, साकुर) असे पोलिसांनी पकडलेल्या चौथ्या आरोपीचे नाव असून त्याला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटना उघडकीस आल्यापासून हा आरोपी फरार होता. दहावीत शिकणारी मुलगी परीक्षेचे रिसीट आणण्यासाठी साकुर गावात आली होती. यावेळी आरोपी…
मंगळवार, १३ ऑगस्ट विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. सोळा पोलीस निरीक्षकांसह अकरा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दहा पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी संध्याकाळी बदल्यांचे हे आदेश काढले. नव्या बदल्यांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेला नवे पोलीस निरीक्षक मिळाले असून या शाखेचा पदभार आता नितीन चव्हाण यांच्याकडे सोपविला जाणार आहे. तर जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेल्या आणि अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या उपोषणानंतर चर्चेत आलेल्या एलसीबीमध्ये (स्थानिक गुन्हे शाखा) मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फेरबदलांमध्ये या शाखेत बदल होण्याची चिन्हे होती, मात्र या शाखेचा कार्यभार अद्यापही…
सोमवार, १२ ऑगस्ट प्रशासकीय कालावधीत संगमनेर नगर परिषदेने पाणीपट्टी व इतर करांमध्ये केलेली दरवाढ मागे घ्यावी, यासाठी काँग्रेसच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. वाढ मागे न घेतल्यास आंदोलनाचादेखील इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांचे परिणाम सर्वसामान्य माणसांना भोगावे लागत आहे. चुकीच्या धोरणामुळे देशात बेरोजगारी, व महागाई वाढली असेल सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा स्थितीत गेल्या अडीच वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये नगरपरिषदेने अन्यायकारक पद्धतीने पाणीपट्टी व अन्य करांमध्ये मोठी वाढ केली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, माजी नगरसेवक शैलेश कलंत्री, नितीन अभंग, किशोर पवार, गजेंद्र अभंग,…
सोमवार, १२ ऑगस्ट ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशभर सुरू असलेल्या “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत सोमवारी संगमनेर मध्ये नगर परिषदेच्यावतीने मोटार सायकल रॅली काढण्यात आली. तसेच यादरम्यान मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती देण्यात आली आहे. अभियानाचा एक भाग असलेली मोटरसायकल रॅली नगरपरिषद प्रांगणातून सोमवारी काढण्यात आली. नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेत या रॅलीत सहभाग नोंदविला. नगरपरिषदेतून सुरू झालेली रॅली बाजारपेठ, सय्यद बाबा चौक, मेन रोड, चावडी, बस स्टॅन्ड, गणेश नगर, अकोले बायपास या मार्गाने पुन्हा नगरपरिषद सांगण्यात आली. तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला. मोटारसायकल रॅलीमध्ये उपमुख्याधिकारी संजय पेखळे, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद…
सोमवार, १२ ऑगस्ट संगमनेर शहरालगत असलेल्या म्हाळुंगी नदीवरील राजापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीट करण्याचे काम पूर्ण होऊन पंधरा-वीस दिवसांचा अवधी उलटला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीला पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचे मोठे हाल होत आहे. दूरच्या असलेल्या पर्यायी रस्त्याचा त्यांना वापर करावा लागत आहे. संगमनेर गावठाणातील शाळेतील मुलांना जायला-यायला त्रास होत असून मेडिकव्हर हॉस्पिटल पासून ये-जा करावी लागत आहे. या परिसरातील नागरिकांना देखील त्रास होत आहे. सदरचा रस्ता हा संगमनेर (संग्रामनगर)-ढोलेवाडी-राजापूरला जोडला गेलेल्या ब्रिजचा असल्याने व त्याचे काम पूर्णत्वास गेल्याने संबंधितांनी याकडे लक्ष घालत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी…
सोमवार, १२ ऑगस्ट अहमदनगर :- २६ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणातून सोमवारी दुपारी तीन वाजता पाणीसाठा नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने २ हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. त्यामुळे मुळा नदीकाठच्या गावांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केले आहे. आजघडीला धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार लोअर गाईड व अप्पर गाईड कर्व्हनुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे सोमवारी (१२ ऑगस्ट) नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रातील चल मालमत्ता, चीजवस्तु, वाहने, पशुधन, शेती अवजारे व इतर…
सोमवार, १२ ऑगस्ट लग्नानंतर अवघ्या दोन-तीन महिन्यातच पती-पत्नीने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील साकुरमध्ये घडला आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला असून घारगाव पोलिसांनी दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरमध्ये आणले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून प्रथम दर्शनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा कयास असून पोलीस या दाम्पत्याने आत्महत्या का केली, की अन्य काही प्रकार आहे याचा शोध घेत आहे. वैभव दत्तात्रय आमले (वय २३ वर्ष) आणि स्नेहा वैभव आमले (वय २० वर्ष) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या नवदांपत्याचे नाव असून साकुरच्या मुळा नदीजवळ मांगमळीत रविवारी (११ ऑगस्ट) रात्री काही ग्रामस्थांना त्यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या…
सोमवार ११ ऑगस्ट | अहमदनगर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज केलेल्या महिलांनी अर्जामध्ये नमूद केलेला बँक खाते क्रमांक आधारकार्डला संलग्न असणे आवश्यक आहे. ज्या महिलांनी योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज केलेले आहेत त्यांनी आपला बँक खाते क्रमांक स्वतःच्या आधारकार्डला तात्काळ संलग्न करून घ्यावा. बँक खाते क्रमांक संलग्न झाला आहे याची खात्री करावी. तसेच ज्या महिलांना मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभासाठी अर्ज करावयाचे आहेत त्यांनी अर्जामध्ये जो बँक खाते क्रमांक नमूद करणार आहे तो बँक खाते क्रमांक आधारकार्डला सलग्न आहे, याची खात्री करूनच तो बँक खाते क्रमांक ऑनलाइन अर्जामध्ये नमूद करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य…
रविवार, ११ ऑगस्ट मुंबईतील काही जणांना माज आला आहे, तो माज उतरवयाचे औषध मराठ्यांजवळ आहे. महाराष्ट्रातले जेवढे-जेवढे माजलेले वळू आहेत, त्यांना कात्रजचा घाट दाखवू. त्यांनी मला घेरायचं ठरवलं आहे, पण आपण त्यांच्या छाताडावर पाय ठेवून पुढे जाऊ, असा निर्धार व्यक्त करत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली रविवारी पुण्यात आली. सोमवारी ही रॅली अहमदनगर मध्ये येत आहे. या रॅलीला सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत असून कात्रजमध्ये जरांगे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. जरांगे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मला साथ द्या, मागे हटू नका,…
