Author: अनंत पांगारकर
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. आर्थिक बाजू भक्कम राहील, परंतु नको त्या गोष्टींवर खर्च करणे टाळावे. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली कामे आज गतीने पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होईल. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला मोलाचे ठरेल. रखडलेले धन परत मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक नियोजन नीट…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक मोठी कारवाई करत ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या एका खाजगी इसमाला रंगेहात पकडले आहे. मंडळ अधिकाऱ्याच्या नावाने ही लाच मागण्यात आली होती. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपीविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नाशिक एसीबीच्या पथकाने ही धडक कारवाई केली. नितीन किसन खर्डे (वय २९ वर्षे, रा. चंदनापुरी झोळे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आलेल्या खाजगी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली खांडवी यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर जाणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा स्पष्ट सूचना आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालखी मार्गावरील सुविधा, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छता व सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. राज्य शासनाच्या माध्यमातून पालखी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून, त्याद्वारे सर्व आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार खताळ यांनी दिले. बैठकीनंतर त्यांनी नाशिक आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: डोंगराच्या कुशीत वेल्हाळे परिसरातील अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय प्रांगणात नवनिर्मित आंतरराष्ट्रीय आकाराच्या ‘लोकनेते बाळासाहेब थोरात फुटबॉल मैदाना’चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. राज्याचे माजी महसूल व शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते या मैदानाचा लोकार्पण सोहळा पार पडला. जागतिक स्तरावर कमालीची लोकप्रियता असलेला फुटबॉल खेळ संगमनेरच्या मातीत रुजावा आणि येथून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत, अशी अपेक्षा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केली. या मैदानावर आता प्रत्येक रविवारी ‘संगमनेर संडे लीग’ अंतर्गत फुटबॉल सामन्यांचे आयोजन केले जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी खेळाडूंना मेडल…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: महाराष्ट्रात माहितीचा अधिकार (RTI) कायद्यांतर्गत माहिती मागवणे आता सर्वसामान्य नागरिकांसाठी महाग झाले आहे. राज्य शासनाने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करत नवे नियम १२ जून २०२६ पासून संपूर्ण राज्यात लागू केले आहेत. या नव्या नियमांनुसार अर्ज प्रक्रियेपासून ते कागदपत्रांच्या प्रती मिळविण्यापर्यंतच्या सर्वच शुल्कात मोठी वाढ करण्यात आली असून, अर्जदारांना आता खिसा अधिक रिकामा करावा लागणार आहे. नवीन नियमांनुसार माहिती मिळवण्यासाठी केला जाणारा पहिला अधिकृत अर्ज आता १० रुपयांऐवजी ३० रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावून करावा लागणार आहे. याशिवाय, आतापर्यंत माहिती मागण्याचे कारण देणे बंधनकारक नसताना, नव्या नियमात अर्जदाराने माहिती मागण्यामागचे नेमके कारण स्पष्ट…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि धावपळीचा राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेल्या परिश्रमांचे योग्य फळ मिळेल, ज्यामुळे तुमचे मन आनंदी होईल. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आजचा काळ अनुकूल आहे. किरकोळ कारणांमुळे तुमचे लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्या आणि वडिलांच्या सल्ल्याचा मान ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नवनवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामाच्या निमित्ताने एखादा प्रवास घडून येण्याची दाट शक्यता आहे. नवीन व्यावसायिक प्रकल्पांची सुरुवात करण्यासाठी आजचा काळ अत्यंत शुभ आणि प्रगतीकारक ठरेल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल, कारण आगामी काळात कठोर परिश्रमांची आवश्यकता भासणार आहे. मिथुन: आर्थिक आघाडीवर आज नशीब तुमची पूर्ण साथ देईल.…
मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीच्या सहा खासदारांनी नुकताच शिंदे सेनेत प्रवेश करून जनतेचा आणि महाविकास आघाडीचा घोर विश्वासघात केला आहे. या राजकीय पक्षांतराच्या आणि संधीसाधूपणाच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) राज्यभरात तीव्र निदर्शने करणार असल्याची घोषणा पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केली आहे. माकपच्या सर्व शाखा जनतेला सोबत घेऊन राज्यभर निदर्शने करतील आणि गद्दारांचे पुतळे जाळून या प्रवृत्तीचा तीव्र निषेध करतील. या सहाही खासदारांना लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि संविधान रक्षणाच्या मुद्द्यावर माकप आणि डाव्या जनसंघटनांनी निवडणुकीत पाठिंबा दिला होता. कार्यकर्त्यांनी भाजप आणि मित्रपक्षांच्या विरोधात जीवाची बाजी लावून या खासदारांना निवडून आणले होते. यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, आमदारांचे…
शिवसेनेच्या उरल्यासुरल्या खासदारांना फोडण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या गटाने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेने महाराष्ट्राच्या राजकारणाला पुरता काळीमा फासला आहे. ५० कोटी रोख आणि मतदारसंघात काम करण्यासाठी १०० कोटी अशी ऑफर देऊन सहा खासदारांना शिवसेनेतून फोडण्यासाठी ही मोहीम राबवली गेली. अशा मोहिमा राबवण्यामागची सत्ताधारी कुठला थर गाठू शकतात, याचं उत्तम उदाहरण सध्या सुरू असलेल्या मोहिमेने घालून दिलं आहे. हे सारं शिवसेनेसारख्या एका कडवट पक्षात होत आहे, हे त्यातच अजब म्हटलं पाहिजे. जशास तसं उत्तर जोवर दिलं जात नाही, तोवर हे असंच घडत राहणार, असं उगाच म्हटलं जात नाही. पहिल्या फुटीची सेना नेतृत्वाने अपेक्षित दखल न घेतल्याने मोहिमा राबवणारे माजोर झालेच, पण फुटणारेही…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला राहील. अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे आज गती पकडतील आणि ती पूर्णत्वास जातील. आर्थिक लाभाची दाट शक्यता निर्माण होत असून रखडलेले पैसे परत मिळू शकतात. संततीच्या प्रकृतीची मात्र विशेष काळजी घ्यावी लागेल आणि कामाच्या ठिकाणी आपल्या गुप्त गोष्टी इतरांसमोर बोलणे टाळावे. वृषभ: कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे उत्तम सहकार्य लाभेल. नवीन कामाची सुरुवात करताना त्याबाबतची संपूर्ण माहिती व्यवस्थित गोळा करूनच पुढील पाऊल टाकावे. बोलताना आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा नाहक गैरसमज निर्माण होऊ शकतात. पालकांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता असल्याने संयम राखावा. मिथुन: जुन्या मित्रांच्या अनपेक्षित भेटीमुळे आजचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन राहाता पोलिसांनी विवाह जुळवण्याच्या बहाण्याने तरुणांची फसवणूक व खंडणी मागणाऱ्या तीन महिलांच्या टोळीला अटक केली असून, त्यांच्याकडून एका तरुण शेतकऱ्याला डांबून ठेवून २ लाख ३० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईमुळे विवाह जुळवणाऱ्या अशा बोगस टोळ्यांचे मोठे रॅकेट समोर आले असल्याची अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी माहिती दिली. राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथील एका ३० वर्षीय शेतकरी तरुणाला विवाहासाठी मुलगी हवी होती. मध्यस्थांमार्फत त्याचा संपर्क पुणे येथील रेश्मा केशव काटे नावाच्या महिलेशी झाला. रेश्मा हिने त्याला राहाता तालुक्यातील साकुरी शिवार येथील मंगल…
