Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेने ज्या अपेक्षेने आणि विश्वासाने त्यांना निवडून दिले, त्या अपेक्षांची पूर्तता करण्यात खासदार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी केला आहे. रूपवते यांनी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या गेल्या दोन वर्षांतील कारकिर्दीवर थेट आणि धारदार शब्दांत टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत खासदार वाकचौरे यांच्या कामगिरीचा जाहीर पंचनामा केला. उत्कर्षा रूपवते म्हणाल्या की, ४ जून रोजी लोकसभेच्या निकालाला दोन वर्षे पूर्ण झाली असून या काळात खासदारांनी मतदारसंघात नेमकी काय कामे केली आणि कोणत्या विकासकामांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: राज्य विधिमंडळाचे आगामी पावसाळी अधिवेशन आगामी २२ जूनपासून सुरू होणार असून ते १० जुलैपर्यंत चालणार आहे. आज मुंबईत पार पडलेल्या विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अधिवेशनाच्या एकूण कालावधीसह विधिमंडळ कामकाजाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. २२ जून ते १० जुलै अशा जवळपास तीन आठवड्यांच्या या कालावधीत राज्य सरकारकडून विविध प्रलंबित विधेयके मंजुरीसाठी पटलावर ठेवली जातील, तसेच राज्याच्या महत्त्वाच्या आर्थिक आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर दोन्ही सभागृहात चर्चा घडवून आणली जाईल. सध्याच्या राजकीय घडामोडी आणि राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर हे पावसाळी अधिवेशन अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: माणूस निसर्गातून जन्माला आला असून त्याला पुन्हा निसर्गातच विलीन व्हायचे आहे, हाच परमपूज्य गगनगिरी महाराजांचा संदेश होता. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण आणि निसर्गाचे जतन करणे हीच गगनगिरी महाराज आणि परमेश्वराची खरी सेवा ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. गुंजाळवाडी (संगमनेर) येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात झालेल्या परमपूज्य विश्वविभूषित स्वामी गगनगिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. या सांगता समारंभाप्रसंगी प्रसिद्ध समाजप्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन झाले. या सोहळ्याला व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दिलीप…
मोहसीन शेख, संगमनेर नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी अँग्लो उर्दू हायस्कूल, संगमनेर येथे विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत प्राप्त झालेल्या पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विद्यालयाचे चेअरमन शेख गनी हाजीसेठ, अंजुमन-ए-इस्लाम ट्रस्टचे चीफ ट्रस्टी अब्दुल्लाह हाजी हसन चौधरी, सेक्रेटरी हाजी पठाण शौकतखान मोहंमदखान, ट्रस्टी हाजी शेख एजाज शमशुद्दीन तसेच शालेय समिती सदस्य हाजी इनामदार शमशुद्दीन जैनुद्दीन उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शिक्षणाचे महत्त्व, शालेय शिस्त आणि उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि सकारात्मक राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कार्यशैलीचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामावर प्रसन्न राहतील. नवीन योजनांवर काम करण्यासाठी काळ अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक बाजू भक्कम राहील, परंतु विनाकारण खर्च करणे टाळावे. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवादादरम्यान संयम बाळगणे हितकारक ठरेल. वृषभ – आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे आज मार्गी लागतील. व्यवसायात धनलाभाचे योग आहेत आणि नवीन व्यावसायिक भागीदारीतून चांगला फायदा होऊ शकतो. सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल, ज्यामुळे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन पुणे: राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाची पार्श्वभूमी आणि धरणांमधील खालावलेला पाणीसाठा लक्षात घेऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. सिंचन भवन येथे आयोजित एका महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला कृष्णा व गोदावरी लाभक्षेत्रांतर्गत येणाऱ्या महामंडळांचे कार्यकारी संचालक हनमंत धुमाळ, जयवंत गवळी यांच्यासह मुख्य अभियंता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सध्या राज्यातील धरणांमध्ये एकूण उपयुक्त जलसाठा केवळ ३५७.५ टीएमसी म्हणजेच २५ टक्के इतकाच शिल्लक असून, तो गतवर्षीच्या तुलनेत कमालीचा कमी आहे. चालू वर्षात आतापर्यंत अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे…
पंतप्रधानपदाचा सर्वाधिक काळ कारभार केल्याच्या कारणास्तव नरेंद्र मोदी यांचा सुरू असलेला उत्सव कमालीचा चर्चेचा बनला आहे. एखाद्या व्यक्तीने अधिक काळ कार्यभार सांभाळला म्हणून त्याचे कौतुक करायला कोणाची ना नाही. यासाठी त्याच्या नावावर कामेही जमा असावीत. निमित्तमात्र आणि हौसमौज म्हणून असले कार्यक्रम होतच असतात, तसे या उत्सवाचे व्हायला नको. दुर्दैवाने त्यामागे असलेला कुटील डाव पाहिला की, या उत्सवाचा उबग आल्याशिवाय राहत नाही. मोदींनी अधिक काळ पंतप्रधानपद सांभाळले असे दाखवताना ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याहून किती महान होते, हे पुढे आणण्याचा पद्धतशीर आटापिटा सुरू आहे. कोणाचा कार्यकाळ किती, याहून त्याचा कार्यकाळ ‘कसा’ होता, याची मोजदाद करायची असते. पण आजकाल त्याचा विचार करण्याचा…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी कमालीचा ऊर्जावान राहील. नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी वेळ अतिशय अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक बाजू मजबूत राहील, परंतु विनाकारण खर्च करणे टाळावे. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. दिवसाच्या सुरुवातीला काही मानसिक तणाव जाणवू शकतो, परंतु दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. संयम आणि शांतता राखणे आज हितकारक ठरेल. व्यापार्यांना आज मोठा आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाबावी लागेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. जोडीदाराची उत्तम साथ लाभल्याने मन प्रसन्न राहील. मिथुन: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि नवनवीन…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: सरकार दारूबंदी करणार नाही आणि लोक सहजासहजी दारू सोडणार नाहीत, त्यामुळे महिलांनीच पुढाकार घेऊन घरातील व्यसनाला आळा घातला पाहिजे, देश जर महासत्ता करायचा असेल, तर आधी गाव आणि शेतकरी समृद्ध करणे गरजेचे असून आपले गाव हेच आपले खरे तीर्थक्षेत्र मानले पाहिजे, असे प्रतिपादन पाटोदा गावचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. संगमनेर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील शनिवारच्या व्याख्यानात ते बोलत होते. आपल्या व्याख्यानात पेरे पाटील यांनी अन्नभेसळ, प्लास्टिक प्रदूषण, बालविवाह, भ्रष्टाचार आणि ग्रामविकास यांसारख्या गंभीर विषयांवर अत्यंत रोखठोक भाषेत विचार मांडले. सध्या बाहेरच्या अन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असून धने, जिरे, हळद, तिखट,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर येथील भरारी पथक क्रमांक २ ने एका कारवाईत बनावट परदेशी दारू तयार करणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी घटनास्थळावरून पोपट भास्कर पवार याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. श्रीरामपूर येथील आशीर्वाद नगर भागात एका व्यक्तीकडून नामांकित ब्रँडची बनावट दारू तयार केली जात असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात ‘इम्पेरियल ब्लू’ आणि ‘रॉयल स्टॅग’ या नामांकित ब्रँड्सच्या व्हिस्कीच्या बनावट असलेल्या एकूण ११७ बाटल्या, एक दुचाकी वाहन आणि इतर साहित्य असा एकूण…
