Author: अनंत पांगारकर
दि. १९ मार्च, मुंबई अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर बदनामीच्या भीतीने तिने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्यानंतर जवळपास पंधरा दिवसानी या घटनेतील आरोपींवर बाल लैगिक अत्याचार (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी आणि गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबाबाबत तात्काळ अहवाल सादर करावा, असे निर्देश संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षकांना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये राहत असलेले एका दहावीच्या विद्यार्थिनीवर अमानुषपणे अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वी देखील संगमनेर शहरात काही…
दि. १९ मार्च, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रविद्या शाखेंतर्गत विधी विषयाच्या अभ्यास मंडळावर प्राध्यापक डॉ. कपिल चौरपगार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राध्यापक चौरपगार संगमनेरच्या ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. तसेच मॉडर्न लॉ कॉलेजमध्ये संशोधक मार्गदर्शक आहेत. चौरपगार यांच्या विधी अभ्यास मंडळावरील निवडीबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी आदींनी अभिनंदन केले.
दि. १९ मार्च, अहमदनगर निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याने ६ जून पर्यंत आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदार संघातील आचारसंहिता अंमलबजावणीच्या पूर्वतयारी संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नेहरू सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास मापारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त मुख्य अधिकारी संभाजी लांगोरे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपजिल्हा…
संगमनेरमधील उद्योजक ‘अमित पंडित’चा नगर अर्बन बँकेतील घोटाळ्यात असा आहे सहभाग, या कारणासाठी झाली अटक!
नगर अर्बन बँकेतील २९१ कोटीच्या घोटाळ्यात उद्योजक अमित पंडितचा ३३ कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा; पंडितचा भागीदार शुक्लाही आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर! दि. १९ मार्च, अहमदनगर २९१ कोटीच्या बहुचर्चित नगर अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपी म्हणून समोर आलेल्या संगमनेर मधील उद्योजक अमित पंडित (वय ५६) याने ३३ कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला असल्याचे समोर येत आहे. शनिवारी दुपारी पोलिसांनी राहत्या घरातून अटक केलेला पंडित सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या चौकशीतून काय समोर येते याकडे सहकारातील जाणकारांचे लक्ष लागले आहे. ३३ कोटींच्या घोटाळ्यात उद्योजक अमित वल्लभराय पंडितला नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने २४ मार्चपर्यंत कोठडी दिली आहे. एका बँकेचे कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या बँकेकडून…
दि. १८ मार्च दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने तिने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात पाच आरोपी विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ फेब्रुवारीला दहावीच्या परीक्षेचे रिसीट काढण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर संगमनेर तालुक्यातील साकुर येथे अत्याचाराची घटना घडली. त्यानंतर बदनामीच्या भीतीने या मुलीने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. सौरभ खेमनर, योगेश रामा खेमनर दोघे (रा. हिरेवाडी, साकुर), प्रशांत भास्कर भडांगे (भडांगे वस्ती, साकुर), विकास रामदास गुंड (गुंड वस्ती, मांडवे बुद्रुक) व विजय खेमनर (हिरेवाडी, साकुर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दहावीत शिकणारी मुलगी…
दि. १७ मार्च, अहमदनगर अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी सुहास मापारी यांनी यासंदर्भात माहिती दिली. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पाचव्या मजल्यावर हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांना आपल्या आचारसंहिता अंमलबजावणी बाबत असलेल्या तक्रारी ०२४१- २३४१९५५ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा mccnagar.election24@gmail.com या ई-मेल आयडीवर करता येणार असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासंदर्भातील तक्रारी नागरिकांना आता थेट या स्थापन करण्यात आलेल्या कक्षात दाखल करता येणार आहे.
दिनांक १७ मार्च, अहमदनगर नगर अर्बन बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संगमनेरमधील अमृतवाहिनी बँकेचा माजी अध्यक्ष आणि उद्योजक असलेल्या अमित पंडित याला न्यायालयाने २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे सात दिवसांच्या पोलीस कोठडीत पंडित यांच्याकडून नेमकी काय माहिती समोर येते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. नगर अर्बन बँकेतील २९१ कोटी रुपयांच्या महा घोटाळा प्रकरणात बँक बुडविण्यास कारणीभूत ठरलेल्या १०५ आरोपींपैकी एक असलेल्या संगमनेर मधील उद्योजक अमित पंडित याने घेतलेल्या कर्जाची रक्कम पंचवीस कोटीच्या घरात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने अशा बड्या कर्जदारांविरुद्ध आपला फास आवळण्यास सुरुवात केली असल्याचे दिसते. शनिवारी दुपारी बँकेला…
महाराष्ट्र संवाद न्यूज – दि. १७ मार्च, मुंबई अँड. असीम सरोदे यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली असून सरोदे यांना दोन दिवसात माफी मागा, नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे सरोदे या प्रकरणी काय भूमिका घेता याकडे लक्ष लागले आहे. काय आहे प्रकरण… चंद्रपूर येथील ‘निर्भय बनो’ सभेत बोलताना ॲड. सरोदे यांनी शिंदे गटाच्या आमदारांबद्दल एक मोठ विधान केलं होतं. या विधानाचे पडसाद शिंदे गटात उमटले आहे. सरोदे यांनी शिवसेना शिंदे गटाचे बारा आमदार उद्धव ठाकरेंकडे पुन्हा परतणार असल्याचा दावा केला होता. यावेळी त्यांनी या बारा आमदारांची नावे देखील वाचून…
महाराष्ट्र संवाद न्यूज – दि. १७ मार्च, मुंबई काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर होऊन निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज रविवारी मुंबईत खासदार गांधी यांच्या जाहीर सभेने होत आहे. या सभेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. मुंबईत शिवाजी पार्कवरील सभेच्या माध्यमातून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराची सुरुवात केली जाईल. या सभेसाठी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी उपस्थित राहणार आहेत. राहुल आज, रविवारी मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी पदयात्रा काढणार आहेत. दोन महिने ६२०० किलोमीटरचा प्रवास करत…
१७ मार्च, देशाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना गेल्या आठवड्यात मोठा धक्का बसला. आपल्याच होम ग्राऊंडवरच्या म्हणजे बारामतीत बोलवलेल्या व्यापार्यांच्या मेळाव्याला यायला तिथल्या व्यापार्यांनी पवारांना अधिकृतरित्या नकार दिला. उभ्या आयुष्यात असा प्रकार बारामतीत पवारांपुढे व्यापार्यांनीच काय कोणीच केला नव्हता. अगदी राजकीय आणि सामाजिक जीवनात पवारांना दुषणं देणारेही त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेताना अनेकांनी पाहिलं आहे. व्यक्तीगत म्हणून एखाद-दुसरा व्यापारी पवारांनी बोलावलेल्या मेळाव्याला गेला नाही, असं होऊ शकतं. पण सारा व्यापारी वर्गच पवारांना नकार कळवतो, त्यांना एकाकी पाडतो हे पवारांनाच काय पवारांच्या विरोधकालाही पटणारं नाही. उभ्या हयातीत ज्यांच्यासाठी पवारांनी रक्ताचं पाणी केलं, ज्या व्यापार्यांना शुन्यातून उभं…
