Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे, दि. १९ मार्च – ऐन रंगपंचमीच्या दिवशी पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पुण्याच्या हिंजवडी मध्ये धावत्या ट्रॅव्हलर बसला आग लागल्याने चार जणांचा होरपळून मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. मृतांची व जखमींची नावे अद्याप समोर आलेली नाही. सकाळी आठच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. १५ प्रवासी घेऊन होमा प्रिंटिंग प्रेसची बस तमन्ना सर्कलवरून रेजवानच्या दिशेने जात होती. अचानक बसला समोरून आग लागल्याने चालकाने उडी घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडीमध्ये होमा प्रिंटिंग प्रेस कंपनीच्या बसला आग लागली. तमन्ना सर्कलवरून रिजवानच्या दिशेने जाणाऱ्या बसने समोरून अचानक पेट…
अहिल्यानगर, दि. १९ मार्च – अहिल्यानगर शहरातील बेपत्ता व्यापारी दीपक लालसिंग परदेशी (वय ६८) यांचे खंडणीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. १० कोटी रुपयांच्या मागणीसाठी त्यांचे अपहरण करण्यात आले आणि नंतर गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी एका बडतर्फ पोलिसासह दोघांना अटक केली आहे. या दोघांना न्यायालयाने २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. किरण बबन कोळपे (वय ३८, रा. विळद, ता. अहिल्यानगर) आणि त्याचा साथीदार सागर गीताराम मोरे (वय २८, रा. ब्राह्मणी, राहुरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांनी खुनाची कबुली दिली असल्याचे तपासी अधिकारी आणि तोफखाना पोलीस…
मुंबई दि. १८ मार्च : प्रतिनिधी राज्य सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून दर ८ ते १५ दिवसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची घोषणा होत आहे. यापूर्वी १५ दिवसांपूर्वी काही जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या बदल्या झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागपूरच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त आंचल गोयल यांना मुंबईच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे, तर छत्रपती संभाजीनगरसह इतर जिल्ह्यांमध्येही अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या दोन गटांमधील तणावामुळे शहर चर्चेत आले होते. सध्या तिथली परिस्थिती नियंत्रणात असली तरी आता अतिरिक्त महापालिका आयुक्तांची बदली झाल्याने याबाबत चर्चा…
मुंबई, दि. १८ मार्च विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काही सदस्यांनी ५ मार्च २०२५ रोजी मांडलेला अविश्वास ठराव सभापती राम शिंदे यांनी नामंजूर केला. प्रस्तावात तांत्रिक चुका आणि अस्पष्ट मुद्दे असल्याचे कारण देत हा निर्णय घेण्यात आला. संविधानाच्या अनुच्छेद १८३ (ग) तसेच विधान परिषद नियम ११ व १०३ नुसार, ठरावासाठी १४ दिवसांची पूर्वसूचना आणि स्पष्ट मुद्दा आवश्यक आहे. मात्र, या निकषांची पूर्तता न झाल्याने आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन न झाल्याने सभापतींनी सूचना फेटाळली. “हा प्रस्ताव अस्वीकार्य आहे, त्याला अनुमती दिली जाणार नाही,” असे राम शिंदे यांनी ठामपणे सांगितले. यामुळे विधान…
कोल्हापूर, दि. १८ मार्च – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याचा अंतरिम जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या निर्णयामुळे कोरटकरच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून, त्याला कधीही अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाची सुनावणी १७ मार्च रोजी पूर्ण झाली होती, तर निकाल १८ मार्च रोजी जाहीर करण्यात आला. कोल्हापूर सत्र न्यायालयाने सरकारी वकील आणि फिर्यादीच्या वकिलांची बाजू मान्य करत कोरटकरच्या अंतरिम जामीन अर्जाला नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. यासोबतच, त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज…
मुंबई, दि. १८ मार्च: प्रतिनिधी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. अर्ज छाननी दरम्यान एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे. बिनविरोध झालेल्या उमेदवारांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे. या निवडणुकीत भाजपचे तीन, शिंदे गटाच्या शिवसेनेचा एक आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवाराचा विजय झाला आहे. विजयी उमेदवार – * दादाराव केचे (भाजप) * संजय केणेकर (भाजप) * संदीप जोशी (भाजप) * चंद्रकांत रघुवंशी (शिंदे गट शिवसेना) * संजय खोडके (अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस) महायुतीच्या या पाच उमेदवारा व्यतिरिक्त आणखी एका अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अपक्ष उमेदवाराने सादर केलेल्या अर्जात आवश्यक…
संगमनेर, दि. १८ – प्रतिनिधी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ च्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ गुरुवारी (२० मार्च) होत आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला सहकार मंत्री थोरात कारखाना साखर कारखानदारीसाठी दिशादर्शक ठरला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव कारखान्याने देत शेतकऱ्यांचा विश्वास जपला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरचा सहकार व कारखान्याची वाटचाल सुरू आहे. कारखान्याने यावर्षी विक्रमी उत्पादन करताना ऊस उत्पादकांना प्रति टन ३०००/- रुपये ॲडव्हान्स पेमेंट अदा केले आहे. तर आसावनी व इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण केले आहे. यावर्षीच्या…
अकोले, दि. १९ मार्च – प्रतिनिधी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अकोले तालुक्यातील आंबड येथील गवनेर दामू सरोदे यांच्या विरोधात अकोले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून ग्रामस्थांचा अकोलेकरांनी सोमवारी (17 मार्च) कोल्हार घोटी मार्ग बराच काळ रोखून धरला होता. दरम्यान या प्रकरणावरून अकोल्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गवनेर सरोदे याच्यावर कारवाईसाठी सामाजिक संघटना नेते कार्यकर्ते अंबड ग्रामस्थांचं अकोले सरांनी महामार्गावर रास्ता रोको करत टायर जाळत निषेध व्यक्त केला. शिवसेना (ठाकरे) तालुका अध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, संभाजी ब्रिगेडचे डॉक्टर संदीप कडलग, मनसे अध्यक्ष दत्ता नवले, रोहिदास जाधव, रामदास भोर आदीसह नागरिक उपस्थित होते. महापुरुषांबद्दल…
विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने यापूर्वी केलेली मागणी विरळत नाही तोच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आगामी मुख्यमंत्री हे अजित पवार असतील असं सांगायला सुरुवात केल्याने महायुतीतील भाजपमध्ये पुन्हा एकदा चलबिचल सुरु झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. “येत्या काळात अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील,” असा दावा त्यांनी केला. पक्षप्रमुख अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता असून भविष्यात तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील,” असं मत बाबासाहेब पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केलं. पुढं ते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील चांगलं काम करतायत. परंतु,…
अहिल्यानगर, दि. १७ मार्च – प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २५ मार्च २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
