Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: येथील टाटा लाईफ इ्शुरन्स कंपनीचे अभिकर्ता आदित्य सुनील कडलग यांना प्रतिष्ठेचा एमडीआरटी हा सन्मान प्राप्त झाला आहे. हा बहुमान प्राप्त झाल्यामुळे ते ९ ते १२ जून २०२४ या कालावधीत होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी व्हँकुव्हर या अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील क्लार्क काउंटीमध्ये असलेल्या कोलंबिया नदीच्या उत्तर तीरावरील शहरात या परिषदेत सहभागी होणार आहे. आदित्य याला एमडीआरटी होण्यासाठी वडील कडलग इन्व्हेस्टमेंटचे संस्थापक सुनील कडलग यांच्यापासून प्रेरणा मिळाली. सुनील कडलग हे गेल्या २७ वर्षापासून म्युच्युअल फंड वितरक, जीवन व मेडिक्लेम विमा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. येथील कडलग इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रात अतिशय पारदर्शक व प्रामाणिक सेवा व कार्य केले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर: पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये घराच्या जागेच्या वादातून भरधाव कार अंगावर घालून शेजारी महिलेसह तिच्या अडीच वर्षांच्या मुलाची निघृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कार चालकाविरोधात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीतल अजित येणारे (२७) व स्वराज येणारे (वय अडीच वर्षे) अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. गुरुवारी (२३ नोव्हेंबर) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पारनेरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. या संदर्भात मृत महिलेची सासू चंद्रकला शिवाजी येणारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी किरण राजाराम श्रीमंदिलकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी किरण श्रीमंदिलकर फरार झाला आहे. श्रीमंदिलकर व येणारे कुटुंब शेजारी-शेजारी राहतात. घराशेजारच्या जागेच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर : सरकार आल्यानंतर छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये साडेचारशे रुपयांना गॅस सिलेंडर देणार असल्याची जाहिरातबाजी भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत केली आहे. मग महाराष्ट्रातील जनतेने काय पाप केलं? असा सवाल भाजपाला उपस्थित मराठा विरुद्ध ओबीसी आवाज जाणीवपूर्वक घडवून आणला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पटोले नागपूरमध्ये प्रसार माध्यमांसोबत बोलत होते. ते म्हणाले, वाद निर्माण करून सरकारला जनतेचे मूळ प्रश्न विचलित करायचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये गरीब ही जात असल्याचे सांगितले. तेव्हाच कळलं की, देशातील आरक्षण व्यवस्था संपवण्यास सुरुवात झाली आहे. या देशात गरीब आणि श्रीमंत असे दोन वर्गच सरकारला ठेवायचे आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्याच्या महसूल मंत्र्यांनी नवे वाळू धोरण आणले असले तरी या वाळू धोरणाला सत्ताधारी पक्षाच्याच कार्यकर्त्यांकडून तिलांजली देण्याचे काम सुरू आहे. संगमनेर तालुक्यातील शेडगावमध्ये सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याची वाळू तस्करी गावकऱ्यांनी समोर आणली आहे. नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज लूट सुरू आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी एकत्रित येत ठेकेदार संदीप भाऊसाहेब घुगे (रा. मालुंजे) यांच्याविरुद्ध तक्रार केली असून या वाळू उत्खननाचा पंचनामादेखील करण्यात आला आहे. मंडल अधिकारी व तलाठी यांच्या समक्ष वाळू उपशाचा पंचनामा केला आहे. यात २१ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संदीप भाऊसाहेब घुगे यांनी गावातील लोकांना हाताशी धरून नदीपात्रातून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: अधिकार नसताना देखील निष्काळजीपणा करत अपूर्णपणे गर्भपात करून गर्भ पिशवीत मांसाचा तुकडा शिल्लक ठेवून अयोग्य पद्धतीने उपचार करून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा कारणावरून अकोले तालुक्यातील राजुर येथील डॉ. बाबासाहेब तुकाराम गोडगे यांच्या विरोधात राजुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरवर गुन्हा दाखल झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राजुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जैनुद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून डॉ. गोडगे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 कलम 304 अ तसेच वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 कलम 5 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. अधिक माहिती अशी, अकोले तालुक्यातील शेणीत येथील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली: राजस्थान आणि मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारा दरम्यान झालेल्या सभांमध्ये काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘पनवती’ आणि ‘जेबकतरा’ असा केला. यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. गांधी यांना या नोटीसला शनिवारी सायंकाळपर्यंत उत्तर देण्याचे आदेश आयोगाने दिले. निवडणूक प्रचार सभांमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजपने त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. अशा प्रकारची भाषा वापरणे अशोभनीय असल्याचे या तक्रारीत त्यांनी म्हटले. त्यामुळे या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने गांधी यांना नोटीस पाठविली. ‘आदर्श आचारसंहिता नेत्यांना आपल्या प्रतिस्पर्ध्यावर असत्यापित आरोप करण्यास मनाई…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर: जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात विनानोंदणी तसेच अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर विनाविलंब कारवाई करत त्यांच्यामध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रंसगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, अशासकीय सदस्य गणेश बोऱ्हाडे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख…

Read More

25 कोटी रुपयांची साखर विनापरवानगी विकली; ज्येष्ठ नेते गंगाधर पाटील चौधरी यांचे गंभीर आरोप महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता : गणेश कारखान्यात प्रवरेच्या नेतृत्वाने भांडवली गुंतवणूक केली, असे म्हणणे निव्वळ धुळफेक आहे. कारखान्याची क्षमता तुमच्या नेत्यांनी वाढवली असे तुम्ही म्हणत असाल तर मग, कारखान्याच्या जिंदगीत वाढ का झाली नाही? उलट जाता-जाता तुमच्या नेत्यांनी 25 कोटी रुपयांची साखर विनापरवानगी विकून सभासद आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, असा गंभीर आरोप ज्येष्ठ नेते गंगाधर पाटील चौधरी यांनी केला. चौधरी म्हणाले, गणेश बंद करणे हाच प्रवरेच्या नेतृत्वाचा मुख्य उद्देश होता. त्यामुळे प्रवरेच्या नेत्यांनी गणेशमध्ये भांडवली गुंतवणूक केली, असे म्हणणे हा निव्वळ खोटेपणा आहे. भांडवली गुंतवणूक सोडा,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : राज्यात वितरित होणाऱ्या दुधापैकी 30 टक्के दुधात भेसळ असल्याची स्पष्ट कबुली दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी (21 नोव्हेंबर) दूध उत्पादकांच्या बैठकीत दिली आहे. या संदर्भातील वृत्त दैनिक महानगरने दिले आहे. दूध भेसळ शोधण्याची जबाबदारी सध्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे आहे. पण आता दुधातील भेसळ रोखण्याचे काम दुग्धविकास विभागावरच सोपवण्याच्या हालचाली सुरु आहेत. मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दूध दर आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नाबाबत मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात राज्यस्तरीय बैठक पार पडली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. अजित नवले, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: राज्यात कालपर्यंत 32 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या आधारे प्रमाणपत्र देण्याचे कामही सुरू आहे. याचा फायदा मराठा समाजातील जवळपास दोन कोटी लोकांना होणार असल्याचे स्पष्ट करत मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी गप्प बसणार जीव गेला तरी चालेल मात्र सरकारच्या छाताडावर बसून आम्ही आरक्षण घेऊ असा सज्जड इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. मराठा समाजाला एकत्र करत वज्रमुठ आवळणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी सायंकाळी संगमनेरमध्ये जाणता राजा मैदानावर सभा झाली यावेळी जरांगे पाटील बोलत होते. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जरांगे पाटील म्हणाले, आत्तापर्यंत मराठ्यांना आरक्षण समजू दिले नाही. सत्तर वर्षांपूर्वीच मराठा…

Read More