Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज @ संगमनेर पुणे-नाशिक महामार्गावरील बंद पडलेले पथदिवे तातडीने सुरु करावेत, पथदिवे सुरु करण्यात अडचणी असतील तर या संपूर्ण कामाची चौकशी करुन संबंधित ठेकेदार कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्यावतीने प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पथदिवे लवकर सुरु न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. आठ दिवसांपूर्वी पुणे-नाशिक महामार्गावरील पथदिव्यांचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र उद्घाटन झाल्यानंतर एकही दिवस हे पथदिवे सुरु झालेले नाहीत. ही बाब भाजपाच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. या महामार्गाच्या सुशोभिकरणासाठी केंद्र सरकारने निधीची उपलब्धतता करुन दिली आहे. पथदिव्यांचे कामही पूर्ण झाल्यामुळे याचे उद्घाटनही करण्यात आले. परंतू उद्घाटन झाल्यानंतर पथदिवे…
सरकारच खेळतय सामान्यांच्या जीवाशी.. ही तर संपूर्ण मंत्रिमंडळाची जबाबदारी… वर्षभरात असे काय घडले की ज्यामुळे आरोग्य यंत्रणा अपयशी ठरू लागली? महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राज्यात आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. सामान्य माणसांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. नांदेडसह राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव निर्माण झाले, ही परिस्थिती नेमकी का उद्भवली? नेमके दोष कुठे होते? औषध पुरवठ्याची स्थिती काय होती? यंत्रणेमध्ये इतका गलथानपणा का आला? या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राला हवी आहेत. त्यामुळे सरकारने आरोग्याची श्वेतपत्रिका काढून सत्य समोर मांडावे, अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते, माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. थोरात यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सर्वसामान्य माणसाकरीता उपलब्ध असलेले नगरपालीकेचे कॉटेज रुग्णालय ज्यांनी बंद पाडले, ज्यांना अडीच वर्षाच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात उपजिल्हा रुग्णालय तालुक्यात सुरू करता आले नाही, त्यांना महायूती सरकारमधील मंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा कोणताही अधीकार नाही. तालुक्यात सर्व सुवीधांनी परीपूर्ण अशा रुग्णालयांची उभारणी करण्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारुन आ. थोरात यांनीच आधी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे नेते जावेद जहागिरदार यांनी केली आहे. माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मागणीचा समाचार घेताना, जावेद जहागिरदार यांनी पत्रकात म्हटले आहे की, अनेक वर्षे सता असताना तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा ज्यांच्या हलगर्जीपणाने उडाला त्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळाच्या राजीनाम्याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज @ जागतिक टपाल दिन विशेष लेख आज ०९ ऑक्टोबर, जागतिक टपाल दिन… टोकियोत १९६९ मध्ये आयोजित केल्या गेलेल्या युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेसच्या संमेलनात जागतिक टपाल दिनाची घोषणा करण्यात आली होती. १८७४ मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) निर्मितीच्या वर्धापन दिनानिमित्त स्वित्झर्लंड राजधानी बर्न या शहरात २२ देशांनी एकत्र येऊन करारावर सही केली होती. १ जुलै १८७६ ला भारत ‘युनिवर्सल पोस्टल युनियन’ चा सदस्य होणारा पहिला आशियाई देश ठरला. या वर्षी युनिव्हर्सल पोस्टल युनियनने “टुगेदर फॉर ट्रस्ट” या थीमवर जागतिक टपाल दिनाचे आयोजन केले आहे. संपूर्ण भारतभर हा आठवडा राष्ट्रीय टपाल सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या पूर्ण आठवड्यात पोस्टाच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज कळस – हिंदु तरुणांना धर्मरक्षणासाठी एकत्र करण्याचे काम देवस्थानांनी केले पाहिजे. यासाठी व्यायामशाळा व वाचनालय सुरु करावे. तेच युवक आपले मंदिरे वाचवतील, असे मत कालीचरण महाराज यांनी व्यक्त केले. कळस बुद्रुक येथील कळसेश्वर देवस्थान येथील प.पू. सुभाष पुरी महाराज व माता वैष्णवी देवी दर्शन घेण्यासाठी आले. त्यावेळी कालीचरण महाराज यांनी भाविकांशी संवाद साधला. कळसेश्वर टेकडीचा प.पू. सुभाष पुरी महाराज यांनी केलेला कायापालट पाहून कालीचरण महाराज भारावले. यावेळी ईश्वरदास महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल महाराज वाकचौरे, सरपंच राजेंद्र गवांदे, भाजप सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे पाटील, सचिव गोपीनाथ पाटील ढगे, ट्रस्टचे उपाध्यक्ष विष्णु वाकचौरे, विश्वस्त प्रदीप वाकचौरे आदी उपस्थित होते. कालीचरण…
महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने साडेचारशे कोटीचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरित केला आहे. या निधीतून लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले जाणार असले तरी राज्यातील अहमदनगर जिल्हा आणि मुंबई शहराच्या वाट्याला एक रुपयाचाही निधी वितरित करण्यात आलेला नाही. राज्याच्या महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यातच या योजनेचे लाभार्थी निधीपासून वंचित राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. विधानसभा कामकाजा दरम्यान 22 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तातडीने वेळेवर पैसे देण्याचे निर्देश दिले गेले असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता या संदर्भात शासन निर्णय झाला असून या निधीचे वाटप करण्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता : शिर्डी विधानसभा मतदार संघात शासकीय योजनांचा पुरता बोजवारा उडालेला आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंग, विधवा, परित्यक्ता यांच्यासह विविध योजनांच्या लाभार्थ्यांना गेल्या चार महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही, पालकमंत्र्यांनी शेजारच्या तालुक्यात जाऊन गुरगुर करण्यापेक्षा राहता तालुक्यातल्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे मत राहाता तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. पंकज लोंढे यांनी व्यक्त केले. राहाता तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने शासकीय योजना मिळविण्यात लाभार्थ्यांना येत असलेल्या अडचणी संदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात लोंढे यांनी भूमिका मांडली. लोंढे म्हणाले, पालकमंत्री नेतृत्व करत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात विविध शासकीय योजनांचा बोजवारा उडालेला आहे, त्याचा मनस्ताप हकनाक लाभार्थ्यांना सहन करावा लागतो. संजय गांधी निराधार योजना, श्रावण…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – अहमदनगरच्या विळद घाटामध्ये असलेल्या डॉ. विखे पाटील महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोलीमध्ये एका वीस वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अश्विनी सोमनाथ जाधव (वय २० वर्ष, रा. ढोकी चिंचोली, जि. लातूर) असे या युवतीचे नाव असून ही दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. ३ ऑक्टोंबर) घडली. अश्विनी जाधव डॉ. विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. ती वसतिगृहाच्या खोलीत राहत असे. मंगळवारी तिने आपल्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार काही विद्यार्थिनींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती वस्तीगृहाच्या प्रशासनाला दिली. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी विखे पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच तिचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा माजी महसूल व कृषी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनु असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस राष्ट्रीय स्तरावरील बँको या संस्थेचा ब्ल्यू रिबन सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार दमण येथील शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला देल्टीन रिसॉर्ट दमन या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाचे निवृत्त चीफ जनरल मॅनेजर पी. के. अरोरा यांच्या हस्ते पुरस्कार अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन ॲड. नानासाहेब शिंदे, संचालक राजेंद्र काजळे, श्रीकांत गिरी तसेच बँकेचे सीईओ अंबादास वाणी यांनी स्वीकारला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्त व विचारांवर बँकेची वाटचाल सुरू…
रविवार विशेष @ प्रवीण पुरो सत्ता मनसोक्त भोगता आली पाहिजे, यासाठीचे प्रयत्न फोल ठरू लागले की राजाला काही सूचत नसत. तो कासावीस होई. ज्यांच्या सहकार्याने सत्ता राबवायची प्रसंगी त्यांचेच गळे त्याने घोटले. असे गळे घोटत मध्यवर्ती सरकारच्या राजाने सहकार्यांचं अस्तित्वच नाकारलं. एकेका राजकीय पक्षाची पाळेमुळे नेस्तनाबुत झाल्यावर राजाने बोरुबहाद्दरांच्या मुळावर घाव घालायला सुरुवात केली. विरोधकांची मुस्कटदाबी करून कोणीही मान वर करणार नाही, असा प्रयत्न राजाने करून पाहिला. त्यात तो यशस्वीही झाला. अनेक हौसे, नवसे, गवसे राजाला जाऊन मिळाले. राज्यातल्या सत्ता त्याने मस्तीच्या जीवावर आपल्याकडे घेतल्या. तरी राजा समाधानी नव्हता. अपेक्षित असलेला सत्तेचा फायदा मिळू न शकल्याने प्रजाही नाराज होती. दिलेला…
