Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दि. ११ डिसेंबर दूध भाव वाढ करावी, कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी संगमनेरमध्ये शिवसेनेच्या (उबाठा) नव्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी प्रांताधिकार्यांना निवेदन देत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने दुधाचे भाव १२ ते १३ रुपयांनी कमी केले असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून दुग्ध व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. याबरोबरच केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात बंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकरी देखील अडचणीत सापडले आहे. निर्यात बंदी केल्याने सर्वत्र कांद्याचे भाव पडले आहेत. राज्य सरकारने दुधाला प्रति लिटर चाळीस रुपयांचा भाव द्यावा तसेच कांद्यावर केंद्र सरकारने लादलेली निर्यात बंदी…
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले (अहमदनगर) -अकोले तालुक्यातील सिरीयल किलर म्हणून परिचित असलेल्या क्रूरकर्मा अण्णा वैद्य याने अल्पवयीन मुलीची छेड काढत तिला मारहाण केल्याच्या कारणावरून जमावाने केलेल्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. रविवारी (दि. १० डिसेंबर) सायंकाळी अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथे ही घटना घडली. चार महिलांच्या खून प्रकरणानंतर क्रूरकर्मा म्हणून राज्यात परिचित असलेल्या मच्छिंद्र उर्फ अण्णासाहेब मुक्ताजी वैद्य (अण्णा वैद्य) याने रविवारी सायंकाळी सुगाव खुर्द गावातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढत तिला बेदम मारहाण केली होती या मारहाणीत घाबरलेली मुलगी जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने अण्णा वैद्य याच्यावर हल्ला करत त्याला बेदम मारहाण केली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दि. १० डिसेंबर नेहरू गार्डनमध्ये लहान मुलांना खेळविण्यासाठी असलेली चाचा नेहरू एक्सप्रेस रेल्वे रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातात एक सात वर्षाचा बालक गंभीर जखमी झाला. पुढील उपचारासाठी त्याला लोणीच्या प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. संगमनेर नगर परिषदेच्या नेहरू गार्डनमध्ये ही घटना घडली. विराज मारुती शिंदे (वय ७ वर्ष, रा. संजय गांधी नगर, संगमनेर) असे अपघातात जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. गार्डनमध्ये लहान मुलांसाठी एक चाचा नेहरू एक्सप्रेस रेल्वे आहे. गार्डनमध्ये येणारी लहान बालके या एक्सप्रेस रेल्वेतून सफरीचा आनंद घेत असतात. सायंकाळी सहा वाजता नियमितपणे लहान बालकांना खेळविण्यासाठी ही रेल्वे गाडी बालकांना घेऊन…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दि. १० डिसेंबर संगमनेर येथील शांती फाउंडेशनच्यावतीने कै. चंद्रभागा व काशिनाथ मुटकुळे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिले जाणारे विशेष गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. या संदर्भातील घोषणा निवड समितीच्या अध्यक्षा दुर्गाबाई तांबे यांनी केली. संगमनेर येथील ज्येष्ठ संपादक, सामाजिक कार्यकर्ते प्रा. विठ्ठल शेवाळे यांना साहित्य व सामाजिक कार्यासाठीचा साहित्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. नगर येथील महाराष्ट्रातील नामवंत नाट्यकर्मी आयुब शेख व अकोले येथील डॉ. उल्हास कुलकर्णी यांना नाट्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विठ्ठल शेवाळे हे सेवानिवृत्त प्राध्यापक असून त्यांनी उज्वल उद्यासाठी या त्रैमासिकाचे संपादन केले आहे. शासनाच्यावतीने आढळा नदीच्या अभ्यास प्रकल्पासाठी…
प्रवीण पुरो (मो. 9869991868) आपल्या खोटारडेपणाला ठेस पोहोचली की माणसं कासावीस होतात. ते कसल्याही गोष्टीचा आधार घेत होत्याचं नव्हतं करतात. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असेच काहीसे कासावीस झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकेकाळचे प्रवक्ते असलेल्या नवाब मलिक हे देशद्रोही असल्याने त्यांना सत्तेत सहभागी करून घेता येणार नाही, असा रेटा त्यांनी लावला आहे. त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पत्र पाठवून त्यांनी नैतिकता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मलिक यांना आरोग्याच्या कारणास्तव पॅरोलवर सोडण्यात आल्याने ते सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित आहेत. त्यांनी आपला विधिमंडळात उपस्थित राहण्याचा हक्क बजावला आहे. पण यामुळे अनेकजण अस्वस्थ झाले आहेत. यात पहिले आहेत देवेंद्र फडणवीस. एखाद्याविषयी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दि. ९ डिसेंबर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संगमनेर बसस्थानकावर बसविण्यात यावा, यासाठी नगरपालिकेने दिलेल्या प्रस्तावास मंजुरी द्यावी. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून त्याठिकाणी सुशोभीकरणासाठी, विश्वयुध्दात सहभागी असलेले व व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त शहीद नामदेवराव जाधव यांच्या स्मारकास प्रत्येकी १ कोटींचा निधी उपलब्ध करुन द्यावा, यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. यासंदर्भात सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तांबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले. आमदार तांबे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीमुळे काँग्रेसचे पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह वैभवशाली स्मारके होण्याचा मार्ग…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दि. 9 डिसेंबर महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग व एज्युकेशन सप्लाय अँड फ्रँचाइजी यांच्यावतीने मेरिटवर दिला जाणारा स्टार एज्युकेशन अवार्ड (Star Education Award 2023, only on Merit ) ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगीरी केल्याबद्दल दिला जाणारे या पुरस्काराचे वितरण नुकतेच मुंबईत करण्यात आले. प्राचार्य डॉ. गायकवाड हे गेल्या ३५ वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करत आहे. ते संगमनेर महाविद्यालयात प्राचार्य पदाबरोबरच वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख म्हणुन कार्यरत आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बिझनेस लॉ बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष, व्होकेशनल कॉमर्स अभ्यासमंडळाचे अध्यक्ष, विद्यापरीषद सदस्य, अकौंटन्सी अभ्यासमंडळ सदस्य, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा सदस्य इत्यादी अधिकार मंडळामध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर, दि. ८ डिसेंबर – शुक्रवारी संगमनेरमध्ये झालेल्या कांदा लिलावात भाव अचानक कोसळल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समिती बाहेर नाशिक पुणे महामार्गावर तब्बल दीड तास ठिय्या देत आंदोलन केले. कांद्याचे फेर लिलाव करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले मात्र तरी देखील व्यापाऱ्यांकडून लिलाव सुरू होत असल्याने आक्रमक शेतकऱ्यांनी सभापतींच्या दालना बाहेर आंदोलन सुरू केले अखेरीस सायंकाळी पाच वाजता सुमारास बाजार समितीच्या पदाधिकारी आणि सचिवांनी केलेल्या मध्यस्थीनंतर कांद्याचे फेर लिलाव पुन्हा सुरू झाले. गेल्या काही दिवसांपासून वधारलेल्या कांद्याला शुक्रवारी थेट दोन ते अडीच हजार रुपयांचा भाव संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळू लागल्याने अचानकपणे व्यापाऱ्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर, दि. ८ – दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यावरून राज्यभर मोर्चे, आंदोलने सुरू सुरू असताना सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही, उलट दुग्धविकास मंत्री राज्यातील दुधात भेसळ आहे असे सांगून दूध उत्पादकांची बदनामी करत आहे. त्यामुळे राज्यातील दुधाकडे संशयित नजरेने पाहिले जात असून खाजगी दूध संस्थांची चंगळ सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला. दुधाच्या प्रश्नावर असलेल्या स्थगन प्रस्तावावर सभागृहात सत्ताधाऱ्यांनी चर्चा नाकारल्यानंतर सभागृहाच्या पायऱ्यांवर थोरात यांनी दुधाच्या प्रश्नावरून सरकारला घेरल्याचे दिसून आले. थोरात म्हणाले, दूध दरावरून राज्यभर आंदोलने सुरू आहे. शेतकऱ्यांना २४ ते २५ रुपये दराने दूध…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – शिंदे-फडणवीस-पवारांच्या महायुती सरकारने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांकरिता पुरवणी मागण्यांमध्ये प्रत्येकी 40 कोटी रुपयांची तरतूद केली. निधी वाटपावरून असलेली सत्ताधारी आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करताना विरोधी आमदारांना मात्र या निधीतून धावण्यात आल्याने त्यांच्या वाट्याला निराशा आली आहे. पाच राज्यातील निवडणुका नंतर आता लोकसभेच्या तयारीला लागलेल्या महायुतीच्या सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मतदारांना खुश करण्यासाठी तब्बल ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ते आणि अन्य कामांसाठी या सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये केलेली ५५ हजार ५२० कोटींची तरतूद हा आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. यात सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी ४० कोटींचा निधी…
