Author: अनंत पांगारकर
१७ मार्च, देशाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना गेल्या आठवड्यात मोठा धक्का बसला. आपल्याच होम ग्राऊंडवरच्या म्हणजे बारामतीत बोलवलेल्या व्यापार्यांच्या मेळाव्याला यायला तिथल्या व्यापार्यांनी पवारांना अधिकृतरित्या नकार दिला. उभ्या आयुष्यात असा प्रकार बारामतीत पवारांपुढे व्यापार्यांनीच काय कोणीच केला नव्हता. अगदी राजकीय आणि सामाजिक जीवनात पवारांना दुषणं देणारेही त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेताना अनेकांनी पाहिलं आहे. व्यक्तीगत म्हणून एखाद-दुसरा व्यापारी पवारांनी बोलावलेल्या मेळाव्याला गेला नाही, असं होऊ शकतं. पण सारा व्यापारी वर्गच पवारांना नकार कळवतो, त्यांना एकाकी पाडतो हे पवारांनाच काय पवारांच्या विरोधकालाही पटणारं नाही. उभ्या हयातीत ज्यांच्यासाठी पवारांनी रक्ताचं पाणी केलं, ज्या व्यापार्यांना शुन्यातून उभं…
दि. १६ मार्च, संगमनेर नगर अर्बन बँकेतील अडीचशे कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मोठा कर्जदार व आरोपी असलेल्या संगमनेरमधील अमृतवाहिनी बँकेचा माजी अध्यक्ष व उद्योजक असलेल्या अमित वल्लभराय पंडित याला शनिवारी दुपारी संगमनेर पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक अटकेला हुलकावणी देणाऱ्या असलेल्या पंडित याला अखेर नाट्यमयरित्या अटक झाल्याने ठेवीदार सुखावले असून सहकारात मात्र खळबळ उडाली आहे. नगर अर्बन बँकेतील सर्वात मोठ्या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहेत. काही आरोपी अटकेत असतानाच आता आर्थिक गुन्हे शाखेचे वक्रदृष्टी मोठ्या कर्जदारांवर देखील पडली आहे. या कर्जदारांना ताब्यात घेतल्यानंतर अनेक गोष्टी बाहेर येऊ लागल्या. आता अमित पंडित याला अटक केल्याने त्याच्या चौकशीत काय निष्पन्न…
अखेर लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, राज्यात होणार सात टप्प्यात मतदान; नगर, शिर्डीची निवडणूक या दिवशी
दि. १६ मार्च, नवी दिल्ली यंदाची १८ वी लोकसभा निवडणूक देशभरात १९ एप्रिल ते २ या कालावधीत सात टप्प्यात घेतली जाणार असून ४ जूनला देशातील सर्वात मोठ्या निवडणुकीची मतमोजणी होणार असून देश कोणाच्या हाती जाणार हे स्पष्ट होणार असून राज्यात ५ टप्प्यात निवडणूक होणार आहे. याशिवाय सिक्कीम, अरुणाचल आणि आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचीही घोषणा केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेत केली आहे. करण्यात आले आहे. मोदी सरकारचा कार्यकाळ येत्या ६ सहा जूनला संपुष्टात येत असून निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी देशभरातील ५४३ जागांवर १९ एप्रिल पासून मतदानाला सुरुवात होणार असून ७ टप्प्यामध्ये निवडणूक घेण्यात येणार असल्याचे…
दि. १६ मार्च, नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीची घोषणा काही तासांवर आली असताना भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले. शनिवारी दुपारी सव्वा वाजता त्यांच्या भाजप प्रवेशाचा सोहळा मुख्यालयात पार पडला. चार राज्यातील विधानसभा निवडणुकीची व देशातील लोकसभा निवडणुकीची निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याच्या काही तास आधीच यांनी केलेल्या भाजप प्रवेशाला महत्व प्राप्त झाले आहे. ९० च्या दशकात बॉलीवूड आणि भक्ती गीतांनी चहा त्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या अनुराधा पौडवाल नावलौकिक प्राप्त गायिका असून त्या ६९ वर्षाच्या आहेत. एस. डी. बर्मन यांचे सहाय्यक आणि संगीतकार असलेल्या अरुण पौडवाल यांच्याशी त्यांचा १९६९ मध्ये विवाह झाला होता.
दि. १६ मार्च, मुंबई लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी काही तासांचा कालावधी असताना राज्य सरकारने शनिवारी निर्णयांचा धडाका लावत १७ महत्वपूर्ण निर्णय घेतले. प्रशासकीय निर्णयाबरोबर आदेश काढण्याचा धडाका सुरू आहे. शुक्रवारी तब्बल २०५ शासन निर्णयाची घोषणा राज्य शासनाच्या संकेतस्थळावर करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या बैठकीत झालेले निर्णय पुढीलप्रमाणे… राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी (उद्योग विभाग). तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार (वैद्यकीय शिक्षण विभाग) मालमत्ता विद्रुपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास, दंड सुद्धा वाढविला (गृह विभाग) १३८ जलद गती न्यायालयाच्या वाढीव खर्चाला मान्यता (विधी व न्याय विभाग) संस्कृत, तेलगू, बंगाली…
दि. १६ मार्च, पुणे – संगमनेर पतीच्या १ कोटीच्या टर्म इन्शुरन्ससाठी पत्नीने तिच्या सैन्य दलातील प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तिघांना अटक केली असून अटकेत संगमनेरमधील आरोपींचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिंबळी येथे ही दुर्दैवी घटना घडली. राहुल सुदाम गाडेकर असं हत्या झालेल्या ३६ वर्षीय तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने पत्नी सुप्रिया राहुल गाडेकर, भारतीय सैन्य दलातील तिचा प्रियकर सुरेश मोटाभाऊ पाटोळे तसेच त्याचा सहकारी रोहिदास नामदेव सोनवणे अशा तीन जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत राहुल गाडेकर याची पत्नी…
हिंदुस्थानच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात सीबीआय, ईडी, आयकर विभागाकडून दबाव टाकून कार्पोरेट्सकडून वसुली भिवंडी, दि. १५ मार्च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय अर्थकारण साफ करण्याची भाषा करून इलेक्टोरल बाँड पद्धत आणली पण या बाँडची खरी बाजू आज देशाला समजली आहे. इलोक्टोरोल बाँड हे जगातील सर्वात मोठे हप्ता वसुली रॅकेट आहे. सीबीआय, ईडी, आयकर विभागाला यासाठी गुंतवून वसुली केली आहे. हिंदुस्थानच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात आहे, असा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान संध्याकाळी भिवंडी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना गांधी यांनी या घोटाळ्यावरून भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र…
दि. १६ मार्च संगमनेर विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा आणि काडतुसे कब्जात बाळगणाऱ्या संशयित आरोपीला घारगाव पोलिसांनी अटक केली आहे. अशोक दगडू खेमनर (वय २५ वर्ष, रा. हिरेवाडी, साकुर, ता. संगमनेर) असे पोलिसांनी अटक केलेले आरोपीचे नाव आहे. खेमनर हा आपल्या कब्जात विनापरवाना गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घारगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने मांडवे बुद्रुक गावच्या शिवारात असलेल्या अनिल शांताराम कढणे यांच्या शेतातील विहिरीजवळ असलेल्या कोपीमध्ये छापा टाकला. यावेळी पोलिसांना संशयित आरोपी अशोक दगडू खेमनर याने विनापरवाना स्वतःच्या कब्ज्यात गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसे बाळगले असल्याचे आढळून आले. पोलिसांनी खेमनर याला अटक केली असून त्याच्या विरोधात घारगाव…
दि. १४ मार्च, संगमनेर राज्य शासनाच्यावतीने राबविल्या जात असलेल्या यशवंत पंचायत राज विकास अभियानात संगमनेर पंचायत समितीने बाजी मारली असून तिसऱ्या क्रमांकाचा सहा लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला आहे. याशिवाय पंचायत समितीचे सहाय्यक लेखाधिकारी प्रदीप वर्पे यांनाही गुणवंत अधिकारी पुरस्कार देण्यात आला. महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर यावेळी उपस्थित होते. संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. योजनांची अंमलबजावणी करून राज्याच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. शाश्वत विकासाचे ध्येय समोर ठेवून पंचायत राज्य संस्थेच्या कामगिरीनुसार त्यांना प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता राज्यात…
दि. १४ मार्च, संगमनेर शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. यासाठी दरवर्षी शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या कार्यकारी यांच्या अध्यक्षपदी सागर बागे याची तर उपाध्यक्षपदी सौरभ उमरजी यांचे निवड करण्यात आली आहे. ग्रामदैवत असलेल्या चंद्रशेखर चौकातील मारुती मंदिरात उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी केलेल्या प्रास्ताविकानंतर कार्यकारिणीची निवड सर्वांनुमते करण्यात आली. यावर्षी उत्सव समितीच्या माध्यमातून साजरा केला जाणारा कार्यक्रमांची माहिती पत्रकार मंगेश सालपे यांनी दिली. उत्सव समितीची कार्यकारणी पुढील प्रमाणे… सागर बागे (अध्यक्ष), सौरभ उमरजी (कार्याध्यक्ष), मयूर जाधव व सागर पगारे (उपाध्यक्ष), किरण…
