Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणामध्ये आहे. 7 नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रमध्ये प्रवेश करणार असून लोकशाहीच्या विचारांना ताकद देणाऱ्या या यात्रेचे देगलूरमध्ये भव्य स्वागत केले जाणार आहे. महाराष्ट्रात या यात्रेचा प्रवास 381 किलोमीटरचा राहणार असून या दरम्यान दोन भव्य सभा देखील होणार आहेत. याबद्दलची उपरेषा माजी मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे. नांदेड ते बुलढाणा दरम्यान 14 ठिकाणी या यात्रेचा मुक्काम राहणार असून 10 नोव्हेंबरला नांदेडमध्ये पहिल्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिर्डीतील एका अधिवेशननंतर सरकार पडले होते आता आमच्या अधिवेशनानंतर देखील शिंदे फडणवीस सरकार पडणार आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात, त्यासाठी आमची तयारी आहे असे आम्ही स्नेही खासदार सुजय विखे पाटील यांना शिर्डीत जाऊन सांगणार आहोत. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार व पाच नोव्हेंबर रोजी ‘राज्यव्यापी मंथन व वेध भविष्याचा’ हे शिबिर होत आहे. या राज्यव्यापी शिबिरासाठी आजी-माजी आमदार खासदार, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. आमदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी सोपविली आहे. त्यांची महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे पत्र वाघ यांना दिले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देणे, महिलांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणे यामुळे त्या भाजपच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी निवड करून पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविल्याचे मानले जाते. याआधी महिला प्रदेशाध्यक्षपदी उमा खापरे काम पाहत होत्या मात्र त्या विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर या जागेवर आता वाघ यांना संधी देण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी तब्बल २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर केले असून याद्वारे भविष्यात राज्यात अगणित रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या अंतर्गत ७५ हजार रोजगार देण्याचा मानस सरकारच्या वतीने करण्यात आलेला आहे. यावेळी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले, केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी तब्बल २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर केले आहेत. यापैकी काही प्रकल्पांवर सध्या काम सुरू आहे. काही प्रकल्प लवकरच सुरू होतील. महाराष्ट्रात केंद्र सरकारने रेल्वेचे जाळे विणण्यासाठी ७५ हजार कोटी आणि रस्त्यांसाठी ५० हजार कोटी रुपयांचा निधी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेली आणि पंतप्रधानांचे होमपीच असलेली गुजरातची निवडणूक अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. १८२ जागांसाठी दोन टप्प्यात १ आणि ५ डिसेंबरला निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीचा निकाल हिमाचल प्रदेश सोबत म्हणजेच ८ डिसेंबरला जाहीर होणार आहे. दिल्लीत एका पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीच्या तारखा आज दुपारी जाहीर केल्या आहेत. एक आणि पाच डिसेंबर अशा दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात ८९ तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होणार आहे. हिमाचलमध्ये एकाच टप्प्यात १२ नोव्हेंबरला मतदान होत असून हिमाचल आणि गुजरातची मतमोजणी एकाच दिवशी ८ डिसेंबरला…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संस्थेच्या इमारतीच्या वॉटर प्रूफिंग आणि कोबा करण्याच्या नियोजित कामात ठेकेदाराकडून तीस हजार रुपयांचे लाच घेताना आयटीआयच्या प्राचार्याला नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अलगदपणे सापळ्यात पकडले आहे. नासिकरोड पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडलेला निलेश बबन ठाकूर हा सिन्नरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आयटीआय) प्राचार्य आणि सचिव आहे. एसीबीच्या माहितीनुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे वॉटरप्रूफिंग आणि कोबा करण्याचे काम नियोजित होते. ११ लाख ५१ हजार रुपयांना या कामाचा ठेका एका कंत्राटदाराला देण्यात आला होता. या कंत्राटदाराकडे प्राचार्य ठाकूर याने तीन टक्के रक्कम लाच म्हणून…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकारास, “भारत माता ही विधवा नाही त्यामुळे तू आधी कुंकू लाव मगच मी तुझ्याशी बोलतो”, अशा शब्दात महिला पत्रकाराशी वादग्रस्त विधान करत संभाजी भिडे गुरुजींनी आज पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. सातत्याने वादग्रस्त विधाने करत चर्चेत राहणाऱ्या संभाजी भिडे गुरुजींनी आज पुन्हा एकदा महिला पत्रकाराशी बोलताना केलेले वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आले आहे. त्यांच्या या विधानामुळे महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याकरता मंत्रालयात आले होते. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटी संदर्भात संभाजी भिडे गुरुजी यांच्याशी बोलण्याकरता एक महिला पत्रकार पुढे आली. त्यांनी संभाजी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी भाव देऊन त्यांच्यावर अन्याय करत आहे. शेतकरी आणि कारखाना प्रश्नांवर अनेकदा न्यायालयात धाव घेतली मात्र आता न्यायव्यवस्था, सरकारवर विश्वास राहिलेला नाही. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी पायातले हातात घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. शेतकरी आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केले. शेट्टी यांच्या उपस्थितीत मांडवे खुर्द येथे झालेल्या ऊस परिषद व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, उद्योजक किरण वाबळे, प्रगतशील शेतकरी कारभारी आहेर, जिल्हाध्यक्ष रवी मोरे, शेतकरी नेते जगदीश गागरे, अशोक खेमनर, प्रा. जालिंदर…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नासिकहुन पुण्याला जाणारी शिवशाही बस सिन्नरहून संगमनेरच्या दिशेने येत असताना माळवाडी शिवारात या बसने पेट घेतला. बसला लागलेल्या आगीमध्ये बस पूर्णतः जळून खाक झाली असून केवळ नशीब बलवत्तर म्हणून प्रवासी बालंबाल बचावले आहेत. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. शिवशाही बसने सकाळी सात वाजता नाशिक सोडल्यानंतर ती प्रवासी घेऊन सिन्नर स्थानकात आली होती. तेथून बस संगमनेरच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर माळवाडी शिवारामध्ये अचानकपणे धूर निघत असल्याचे बस चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे तातडीने बस रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली आणि शिवशाही बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर काही क्षणातच शिवशाही बसने पेट घेतला आणि आगीच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका भारतीय जनता पक्षासोबत लढणार असल्याने आरपीआयला सत्तेत चांगला वाटा मिळायला हवा. यासाठी राज्यपाल नियुक्त बारापैकी एक जागा आरपीआयला देण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात त्यांच्यात यावेळी चर्चा झाली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) भाजपसोबत ही निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. 2012 पासून आरपीआय भारतीय जनता पक्षासोबत आहे. त्यामुळे तुमच्याकडे दुर्लक्ष होणार नाही तुम्हाला सत्तेमध्ये नक्कीच चांगला वाटा मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला…
