Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरः संस्कृत भाषेच्या अभ्यासासाठी शब्दकोष समृद्ध करून शब्दज्ञान अत्यावश्यक आहे. असे प्रतिपादन डॉ. रवींद्र मुळे यांनी केले. श्री दामोदर मालपाणी मेमोरिअल ट्रस्ट, संस्कृत संवर्धन मंडळ व महाविद्यालय शाळा समूह योजना संगमनेर केंद्र व संगमनेर महविद्यालयातील संस्कृत भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत विविध गुणदर्शन मराठी, इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर दामोदर मालपाणी मेमोरिअल ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त व शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, श्रीमती सुवर्णा मालपाणी, प्राचार्य डॉ. प्रो. डॉ. अरुण गायकवाड, प्राचार्य मुकुंद डांगे, प्रा. अरुण लेले, संस्कृत विभाग प्रमुख डॉ. अनिरुद्ध मंडलिक, स्पर्धा समन्वय अधिकारी डॉ. रोशन भगत आदी उपस्थित होते. डॉ. मुळे म्हणाले, वर्णोच्चारण स्थानाचे ज्ञान, आवाजातील चढ-उतार, शब्दस्वरूप या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: जुनी पेन्शन योजना लागू करावी या मुख्य मागणीसह अन्य मागण्यासाठी राज्यभरातील विविध शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (१४ मार्च) संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे या संपामध्ये संगमनेर नगर परिषदेतील कर्मचारीदेखील सहभागी होणार आहेत. संपामध्ये सहभागी होत असल्याच्या आशयाचे पत्र नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना देण्यात आले आहे. या संपामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी देखील सहभागी होणार असल्याने पालिकेतील अत्यावश्यक सेवा कोसळण्याची चिन्हे आहे. राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती, संवर्ग अधिकारी, स्थानिक नगर परिषद कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी यांच्या विविध मागण्या तसेच जुनी पेन्शन लागू करणेबाबत वेळोवेळी नगरपरिषद प्रशासन संचनालय यांना निवेदन देण्यात आलेले आहे. तसेच नगर विकास मंत्री यांच्यासोबत बैठक…
महाराष्ट्र संवाद न्यूज रंगपंचमीचा जल्लोष सुरू असताना अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील दुःखद बातमी समोर आली आहे. घरासमोरील शेततळ्यात बुडून दोघा लहान भावंडाचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे ही घटना घडली. आर्यन बंडोपंत साळुंखे (वय 9 वर्ष) आणि अनिकेत बंडोपंत साळुंखे (वय 8 वर्षे) अशी शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या भावंडांची नाव आहेत. या घटनेमुळे रंगपंचमीच्या उत्सवाला दुःखाची किनार लाभली. लोणी व्यंकनाथ ते येळपणे रस्त्यावर बंडोपंत साळुंखे यांचे कुटुंबीय राहावयास आहे. शेतीच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी त्यांनी आठ दिवसापूर्वी घरासमोर शेततळे केले होते. साळुंखे दांपत्य रविवारी दुपारी दुसऱ्याच्या शेतात कामासाठी गेले होते. रविवारची सुट्टी असल्याने आर्यन आणि अनिकेत ही…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : पोलंडहून भारतात नोकरी निमित्त आलेल्या एका परदेशी महिलेवर मुंबईत तब्बल सात वर्ष बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेने अंबोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलंडहून एक महिला भारतात 2016 मध्ये नोकरीसाठी आली होती. तिला Asian Business Exhibitions and Conferences Ltd (ABECL)चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिष गांधी यांनी नोकरीची ऑफर देऊ केली. सुरुवातीचे काही महिने व्यवस्थित गेले. मात्र, त्यानंतर मनिष गांधी पीडितेला त्रास देऊ लागला. तिच्या मोबाईलवर अश्लिल चित्रफित पाठवून तिच्याशी जवळीक साधू लागला. त्यानंतर, जर्मनीमध्ये एका प्रदर्शनासाठी दोघेही गेले होते. तेथे एका हॉटेलवर मनिषने पीडितेवर बलात्कार केला.या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: संगमनेर तालुक्यातील जनतेने आपल्यावर प्रेम केले आहे. सत्ता असो अथवा नसो, तरीदेखील आपण तालुक्यातील विकास कामांचा वेग कायम राखला असून जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी काम केले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. शहरालगत नव्याने स्थापित झालेल्या ढोलेवाडी ग्रामपंचायत स्थापनेच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यावेळी रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, राष्ट्रवादीचे नेते आबासाहेब थोरात आदि व्यासपीठावर उपस्थित होते. थोरात म्हणाले, गुंजाळवाडी ग्रामपंचायतचे विभाजन झाले असून ढोलेवाडीला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा मिळाला. 34 कोटी रुपयांच्या निधीतून ढोलेवाडी व गुंजाळवाडी ग्रामपंचायतसाठी पाणीपुरवठा योजना राबविली आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर: जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये असलेल्या मढी येथील यात्रेत गाढवाच्या बाजारामध्ये पंजाबी संकरित तीन गाढवांपैकी एक गाढव तब्बल एक लाख रुपयाला विकले गेले आहे. त्यामुळे यात्रेतील हे गाढव लाख मोलाचे ठरलं. याशिवाय या यात्रेमधील गाढवाच्या बाजारात काठेवाडी गाढवांची टंचाई निर्माण झाल्याचे दिसून आले. काठेवाड गुजरात येथून बाजारासाठी पायी येत असलेल्या तीनशे पैकी एकशे तीस गाढवांची रस्त्यातच विक्री झाली. त्यामुळे मढीच्या बाजारात पोहोचेपर्यंत अवघी 170 गाढवेच शिल्लक राहिली होती. मढीची गाढवांची यात्रा देशभर प्रसिद्ध आहे. या यात्रेत भरणाऱ्या बाजारामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात व्यापारी येत असतात. पाथर्डी तालुक्यापासून 12 किलोमीटर अंतरावर मढी येथे कानिफनाथ देवस्थान…
महाराष्ट्र संवाद न्यूज बुलढाणा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट ठरलेल्या नागपुर-मुंबई समृद्धी महामार्गावर अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. समृद्धी महामार्गावर आज झालेल्या एका अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. वेगवान कार उलटून हा अपघात झाला आहे. या मार्गावर मोठ्या संख्येने दररोज होत असलेल्या अपघातांमुळे समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार औरंगाबादहून शेगावच्या दिशेनं जात होती. मेहकर जवळ सिवनी पिसा गावाजवळ नागपूर कॉरिडॉरवर कारचा अपघात झाला. अपघातात 2 मुले 3 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात…
रविवार विशेष | प्रवीण पुरो मुंबईत फुटपाथवर झोपलेल्या चार जणांच्या मृत्यूला कारण ठरलेल्या सलमान खान याला मुंबईच्या सत्र न्यायालयाने दिलेली शिक्षा वरच्या न्यायालयाने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर निकाल लावणार्या जोशी नावाच्या न्यायमूर्तींनी आपल्या विवेकाला साद घातली असती तर या घटनेत सलमान खान सुटू शकला नसता. सलमान निर्दोष सुटतो आणि निकाल देणारे न्यायमूर्ती पीठावरून दुसर्या दिवशी निवृत्त होतात, हा योगायोग नाही. या निकालानंतर प्रश्न उपस्थित झाला की सलमान निर्दोष असेल तर त्या गरीबाच्या मृत्यूला जबाबदार कोण? हा निकाल देताना मृत्यूला जबाबदार असलेल्याचा शोध घ्यायला न्यायालयाने सांगितलं असतं तर एकवेळ ठिक. पण ते न झाल्याने मृत्यूला कारण कोण याचं आजवर उत्तर मिळू शकलं…
महाराष्ट्र संवाद न्यूज माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यावर आज सक्तवसुली संचालनालयाने धाड टाकल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मनी लाँड्रिंग प्रकरणी झालेल्या या कारवाई प्रकरणी कोर्टाने हसन मुश्रीफ यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. या दरम्यान ईडीने हसन मुश्रीफ यांना सोमवारी चौकशीसाठी मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. मुश्रीफ यांच्यावर आज सक्तवसुली संचालनालयाने धाड टाकत तब्बल साडे नऊ तास चौकशी केली. मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागलमधील निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहोचले होते. ईडीने दोन महिन्यात केलेली ही तिसरी छापेमारी होती. दरम्यान ईडीने आता नव्याने हसन मुश्रीफ यांना समन्स बजावलं असून पुढील आठवड्यात मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर, कर्जत येथील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नवीन बांधकाम केलेल्या ३८ निवासस्थानांचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी कर्जत येथे करण्यात आले. तर जामखेड येथील ३८ निवासस्थानांचे कर्जत येथून ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. यावेळी महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे, विशेष पोलीस उप महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कर्जत येथील या नवीन पोलीस निवासस्थांनाची पाहणी केली. पोलीस कर्मचारी व बॅंड…
