Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. कर्नाटकमधील २०१९ च्या एका सभेतील विधानाचा संदर्भ घेऊन खोटी तक्रार दाखल करत हा निर्णय घेतलेला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न भाजपा मागील काही दिवसांपासून करत होते. हे सर्व जाणीवपूर्वक व ठरवून केलेले असून खासदारकी रद्द करण्याचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा निर्णय हा लोकशाहीचा खून आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी प्रमाणे राहुल गांधी सुद्धा भाजपचा पराभव करून पंतप्रधान होतील, असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचे समजताच त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. महाविकास आघाडीने या घटनेचा…
शिर्डी: शेतकरी पशुधनाच्या बाबतीत राज्य सरकार अतिशय संवेदनशीलपणे निर्णय घेत आहे. गो आयोग स्थापन करण्यात आल्याने गोसंवर्धना बरोबरच दूग्ध व्यवसायाला संरक्षण आणि रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शेतीपुरक व्यवसायातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्याचे सरकारचे उदिष्ठ असून, लम्पि संकटातही पशुधन वाचविण्यासाठी देशात पशुपालकांना मदत करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. राज्यशासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्यावतीने शिर्डी येथे आयोजित तीन दिवसीय ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चे पशुसंवर्धन मंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज दिल्ली: देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी घटना समोर आली आहे. सुरत कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी अखेर रद्द करण्यात आली आहे. देशभरातील काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, सूरत येथील कोर्टाने राहुल यांना गुरुवारी मानहानी प्रकरणी दोषी ठरवत त्यांनी दोन वर्षांची शिक्षा ठोठवली होती. त्यांना कोर्टाने जामीनही मंजूर केला होता. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वायनाडचे खासदार होते. संसदेमध्ये अदानी प्रकरणावरून आरोप करणाऱ्या खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप अतिशय आक्रमक झाल्याचे दिसत आहे. परदेशातील एका वक्तव्याप्रकरणी गेल्या आठवडाभरापासून भाजपचे खासदार आक्रमक झाल्याचे दिसून येत होते. लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहर पोलीस पथकाने मदिना नगर मधील एका वाड्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल झाल्याचे समोर आले असून पोलिसांनी सुमारे पावणे दोन लाख रुपयांचे सातशे किलो गोमांस ताब्यात घेतले आहे. पोलिसांचा छापा पडत असताना आरोपी नेहमीप्रमाणे पळून जाण्यात यशस्वी ठरला. गुढीपाडव्याच्या दिवशीच कत्तलीचा व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचे यातून समोर आले. संगमनेरमध्ये गोवंश हत्या बंदी कायद्याला येथील कसायांनी केराची टोपली दाखविली असून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून येथील बेकायदेशीर कत्तलखाने सुरूच असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता सणासुदीला देखील नियमांचे उल्लंघन करत गोवंश जनावरांच्या कत्तली सुरूच असल्याने या व्यवसायाला नेमके आशीर्वाद कोणाचे? येत्या काही दिवसात राम नवमी आणि हनुमान जयंती सारखे सण…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: ऐतिहासिक महत्त्व आणि पार्श्वभूमी असलेल्या संगमनेरच्या हनुमान विजय रथाचे नूतनीकरण अखेरीस पूर्ण झाले आहे. हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिनी म्हणजेच गुढीपाडव्याला या रथाचे मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. मारुतीरायाच्या चरणी हा रथ उत्सव समितीने एका कार्यक्रमात अर्पण केला असून हनुमान जयंतीदिनी रथाची मिरवणूक निघणार आहे. संगमनेरकरांचे ग्रामदैवत असलेल्या चंद्रशेखर चौकातील मोठ्या मारुती मंदिरापासून निघणाऱ्या रथोत्सवाच्या मिरवणुकीला ऐतिहासिक महत्त्व आहे. धार्मिक तणावाचे कारण पुढे करत तत्कालीन ब्रिटिश सरकारने सन १९२७ ते १९२९ दरम्यान रथाच्या मिरवणुकीवर बंदी घातली होती. १९२९ मध्ये ब्रिटिशांचा हा बंदी आदेश मोडत महिला रणरागिनींनी रथाची मिरवणूक काढली होती. महिला शक्ती समोर ब्रिटिश अधिकाऱ्यांना देखील त्यावेळी…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्य सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या विधानसभेत आज मोठा गोंधळ बघावयास मिळाला. आशिष शेलार यांनी तर थेट बाळासाहेब थोरात यांना आव्हान आव्हान दिल्याचे दिसून आले. खासदार राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी गुरुवारी सभागृहामध्ये सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) लावून धरली. या मागणीवरून सभागृहात बराच काळ गोंधळ देखील बघावयास मिळाला. भाजप आमदार आशिष शेलार आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांचा यात समावेश होता. आशिष शेलार म्हणाले, भारताबाहेर भारताचा अपमान केल्याबद्दल तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागायला हवी. काँग्रेस नेत्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सुरत: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने मानहानी प्रकरणी दोषी ठरविले असून त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या खासदारकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून राहुल गांधी यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. खासदार गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा करताना न्यायालयाने त्यांना जामीनही मंजूर केला आहे. या खटल्यावेळी राहुल गांधी स्वतः न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. चार वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर सुरत जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यावर आज निकाल देताना गांधी यांना दोषी ठरवल आहे. गांधी यांना दोषी ठरविल्यानंतर अवघ्या वीस…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई: सत्ता संघर्षाच्या न्यायालयीन कचाट्यामध्ये अडकलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने बुधवारी झालेल्या गुढीपाडव्याला आपला ८ महिने २२ दिवसांचा कालावधी पूर्ण केला. हा कालावधी पूर्ण करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जुन्या सहकारी मित्राचा विक्रम मोडला असून सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे शिवसेनेचे ते तिसरे मुख्यमंत्री ठरले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांना त्यांनी मागे टाकले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मोठी फुट पाडत चाळीस आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हात मिळवणी करत नव्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुख्यमंत्री पद मिळविले. मुख्यमंत्रीपद मिळविणारे शिवसेनेचे ते चौथे मुख्यमंत्री ठरले. यापूर्वी मनोहर जोशी, नारायण राणे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी, शिर्डी येथील फुलविक्रीबाबत जिल्हाधिकारी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून पुढील दहा दिवसांत संस्थांनमध्ये फुलविक्री सुरू करण्यात येईल. यात फक्त आजूबाजूच्या परिसरातील सातबाराधारक शेतकऱ्यांना फुल विक्रीला परवानगी देण्यात येईल. अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. राहाता तालुक्यातील नांदुर्खी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण व विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. विखे-पाटील म्हणाले, संस्थान दर्शन रांगेत अधिकृतरित्या फुलविक्री सुरू करण्यात येईल. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गरज लक्षात घेऊन आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी शेती करावी.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: अज्ञात चोरट्याने हिवरगाव पावसा येथील खंडोबा मंदिरातील लोखंडी दानपेटी फोडत त्यातील सुमारे आठ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री साडेनऊ ते मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात मोठ्याभाऊ भाऊराव बढे (वय ५७ वर्ष, धंदा शेती, रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. बढे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, अज्ञात चोरट्याने खंडोबा देवस्थानच्या मंदिरातील लोखंडी कायमस्वरूपी दानपेटी फोडून त्यातून सुमारे आठ हजार रुपयांची रोकड चोरून…
