Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या आपल्या सहकारी तरुणीस पदोन्नतीचे अमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक शहरातील कॉलेज रोड परिसरात हा प्रकार घडला. कॉलेज रोड परिसरात असलेल्या एका नामांकित रेस्टॉरंटमधील वरिष्ठ सहकार्याने आपल्या कनिष्ठ सहकारी तरुणीस पदोन्नतीचे आमिष दाखवून हे कृत्य केले असल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून स्पष्ट झाले. गत बुधवारी पीडित तरुणी कामावर असताना आरोपीने तिला गाठून पदोन्नती मिळवून देण्याचे आमिष दाखवत पंचवटीत एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस स्थानकामध्ये आरोपी सागर मधुकर कदम (वय 29 वर्ष) याच्या विरोधात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अस्मानी संकट आल्यावर सरकारचे कर्तव्य असते की, शेतकऱ्याला उघड्यावर पडू द्यायचे नाही. मात्र आपल्याकडील निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आणि घोषणांची अतिवृष्टी असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. शिवसेना फुटीनंतर रविवारी प्रथमतःच औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आणि बांधावरच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. आपल्या दौऱ्यात ठाकरे यांनी दहेगाव आणि पेंढापूर येथे जात शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना ठाकरे म्हणाले, राज्यात एकूणच घोषणांची अतिवृष्टी सुरू आहे. आणि अंमलबजावणीच नव्हे तर मी म्हणेल, या निर्दयी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अखिल भारतीय किसान सभेचे 23 वे अधिवेशन अकोलेमध्ये 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या दरम्यान होत आहे. अधिवेशनाची सुरुवात पहिल्याच दिवशी जाहीर सभेने होणार असून या सभेमध्ये ओल्या दुष्काळा प्रश्न आरपार लढायचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती डॉ. अजित नवले यांनी दिली. सोमवारी 31 ऑक्टोबरला होत असलेल्या या सभेसाठी डॉ. अशोक ढवळे, पी. कृष्णप्रकाश, माजी आमदार जे. पी. गावित, किसन गुजर, आमदार विनोद निकोले, अर्जुन आडे, उमेश देशमुख आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. राज्य अधिवेशनापूर्वी किसान सभेची राज्यभर रीतसर गाव, तालुका व जिल्हा अधिवेशने घेण्यात आली असून जिल्हा अधिवेशनांमध्ये निवडलेले ३०० प्रतिनिधी व किसान सभेचे…
प्रशांत गुंजाळ (लेखक सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक असून संगमनेर न्यायालयात वकील आहेत) सन 2014 च्या मे महिन्यामध्ये मी एका पक्षकाराचे घटस्फोटाचे प्रकरण संगमनेरच्या न्यायालयात दाखल करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी तत्कालिन न्यायाधीशांनी माझ्या असं निदर्शनास आणून दिले की, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये जवळपास शंभर घटस्फोटाची प्रकरणे न्यायालयात निवाड्यासाठी दाखल झाली आहेत. माननीय न्यायाधीश साहेबांनी त्यावर चिंता व्यक्त करत एक भिती बोलून दाखविली होती. दुर्दैवाने आता ती भिती आता खरी होताना दिसत आहे. गत दोन दशकांच्या कालावधीत वेगवेगळ्या कारणांनी समाजातील एकत्र कुटूंब पध्दती लयाला गेली. याच काळात एकत्र कुटूंब पध्दती जावून विभक्त कुटूंब पध्दती समाजात निर्माण झाली. याचे धोके आता…
मुंबई । प्रविण पुरो (लेखक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक आहेत) प्रिय पवार साहेब, गेल्या काही वर्षांपासून देशातील बदलत्या राजकीय वातावरणाची आपणास पूर्ण जाणीव असेल. विशेषत: महाराष्ट्रात या राजकारणाने घेतलेल्या निचत्तम पातळीने भाजप वगळता आपण सारेच घायाळ झालो आहोत. 2014पासून महाराष्ट्र एका वेगळ्या वळणावर आहे. लोकशाही नावाची संकल्पना ही केवळ नावापुरती शिल्लक राहिली असल्याचं आपण आणि आपल्या पक्षासह काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी अनेकदा बोलून दाखवलं आहे. विरोधकांना जगणं मुष्कील करून ठेवण्याच्या या कृतीची करावी तितकी निर्भत्सना कमीच आहे. हे करतं कोण? घडवतं कोण? हे आपण जाणता. यात आपले कार्यकर्ते असलेले मंत्री अनील देशमुख, नवाब मलिक, सहकारी मित्र असलेले संजय राऊत…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नवीन ट्रॅक्टर घेण्यासाठी पत्नीने माहेराहून पाच लाख रुपये आणावेत, या कारणासाठी तिचा छळ करुन खून केल्याच्या आरोपातून पती सुरेश पंकज बिबवे याच्याबरोबर सर्व आरोपींची संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. संगमनेर तालुक्यातील निमज येथे २०१७ मध्ये हा प्रकार घडला होता. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात सुजीत पावसे याच्या तक्रारीवरुन विवाहितेचा पती सुरेश बिबवे, सासरा पंकज लक्ष्मण बिबवे, अमोल पंकज बिबवे, मंगल पंकज बिबवे, अविनाश लक्ष्मण बिबवे, सुरेखा अविनाश बिबवे, वच्छला लक्ष्मण बिबवे आणि लक्ष्मण बुवाजी बिबवे यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना अटक करत तत्कालिन पोलीस निरीक्षक…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क लंम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव पुशधनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकट्या संगमनेर तालुक्यामध्ये लम्पी चर्मरोगाने मृत झालेल्या पशुधनाची संख्या मंगळवारपर्यत ६५ वर गेली आहे. यापैकी ४२ पशुधनाचे नुकसान भरपाईचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले असून उर्वरित प्रस्ताव दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली. राज्यात उद्भवलेल्या गो व महिप वर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या तालुकास्तरीय समितीची बैठक संगमनेरमध्ये तहसीलदार निकम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीसाठी गटविकास अधिकारी अनिल नागणे, सहाय्यक आयुक्त डॉ. जे. के. तिटमे, पशुधन विकास अधिकारी डॉ. नितीन जोंधळे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ऑक्टोंबरमध्ये झालेल्या पावसामूळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला केल्या आहेत. तसेच येत्या दोन दिवसात मंत्री स्वत: नुकसानग्रस्त तालुक्यांची पाहणी करणार असून यावेळी सर्व शासकीय यंत्रणेने उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल, पशु संवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेत अतिवृष्टीमूळे जिल्ह्यात झालेले नुकसान, पशुधनावरील लंम्पी आजार, आनंदाचा शिधा किट वाटपाचा आढावा घेतला. बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, जिल्हा कृषी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जोर्वे येथे एकविरा फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी अंगणवाडीतील मुलांसोबत अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे असले तरी अनेक लोकांना दिवाळीचा आनंद घेता येत नाही. याच हेतूने लहान बालकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी या चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य आणि दिवाळीचा फराळ वाटप करीत एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी या चिमुकल्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत तरुणांनी ग्रामस्थांच्या मदतीने लोकसहभागातून गावातील अंगणवाडी डिजिटल बनविली. अनोखा आदर्श घालून देत डिजिटल बनविलेल्या या अंगणवाडीला जयश्री थोरात यांनी भेट दिली आणि डिजिटल अंगणवाडीचे कौतुक केले.
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कमी पटसंख्येच्या कारणावरून राज्यभरातील हजारो शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या धोरणाचा निषेध म्हणून छात्रभारती संघटनेने राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना काळा आकाश कंदील भेट पाठविला आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्याने ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठी गैरसोय होणार आहे. दूरवर असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी जाणार नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी सरकारच्या या धोरणामुळे मुकण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्यास या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने छात्रभारती संघटनेने सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहा बाहेर जाणार असल्याने छात्रभारती संघटनेने अनेक शाळांवर जाऊन यासंबंधीच्या सर्वे…
