Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, श्रीरामपूर: अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कायद्याची पायमल्ली करून बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा लोणी पोलीस आणि अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे. राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात सुरू असलेल्या या काळ्या धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून एका बीएएमएस डॉक्टरसह त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, रोख रक्कम आणि तीन आलिशान कारसह तब्बल २४ लाख ९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना पिंपरी निर्मळ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: राज्यात सध्या सर्वत्र उष्णतेचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढत असून, येत्या काही दिवसांत हा तडाखा अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा आणि प्रख्यात कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला आहे. यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक असून अहिल्यानगर जिल्ह्याचे तापमान ४१.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचे सावट असून, संगमनेर परिसरातही ही तीव्रता वाढण्याची…

Read More

प्रतिनिधी / उरण उरण तालुका रिक्षा युनियनचे संस्थापक, विद्यमान अध्यक्ष तथा नागाव-म्हातवलीतील ज्येष्ठ समाज कार्यकर्ते प्रफुल्ल किशोर पुरो यांचे सोमवारी दीर्घ आजाराने देहावसान झाले. मृत्यू समयी ते 75 वर्षांचे होते. वरीष्ठ पत्रकार प्रवीण पुरो यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. प्रफुल यांच्या दुःखद निधनावर शोक व्यक्त करण्यासाठी उरणमधील रिक्षा वाहतूक दुपारनंतर बंद ठेवण्यात आली होती. प्रफुल पुरो यांच्या निधनाने रिक्षा चालक-मालकांचा आधार हरपला असून नागाव आणि म्हातवली क्षेत्रातील सामाजिक कार्यक्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. प्रफुल यांनी दीर्घकाळ समाजसेवा केली, असंख्य गरजू व्यक्तींना मदत केली आणि आपल्या सकारात्मक वृत्तीने त्यांनी सर्वांना प्रोत्साहन दिले. त्यांचं साधं राहणीमान, प्रामाणिकपणा आणि समाजहितासाठी…

Read More

 मोहसीन शेख, संगमनेर – शहरातील दिल्ली नाका परिसरात मध्यरात्री एक अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. आयशर ट्रकचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडकून रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या भेळीच्या हातगाडीला जोरदार धडक बसली. या अपघातात हातगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला. छत्रपती संभाजीनगरवरून येणाऱ्या आयशर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटल्याने ट्रक थेट हातगाडीवर जाऊन धडकला. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक तत्काळ बाहेर आले. घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातात भेळीच्या हातगाडीचे व आयशर ट्रॅकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली असून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:  तालुक्यातील वडगाव पान येथील ‘दत्तधाम सरकार’चा स्वयंघोषित भोंदू बाबा राजेंद्र बापू गडगे याच्या पोलीस कोठडीत संगमनेर न्यायालयाने आणखी दोन दिवसांची वाढ केली असून आता तो २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून आणि असाध्य आजार बरे करण्याचे खोटे आमिष दाखवून अनेक निष्पाप नागरिकांची आर्थिक व मानसिक फसवणूक केल्याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने देण्यात आलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे या प्रकरणी तपास करत आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी गडगे याच्या आश्रम आणि निवासस्थानी दोनदा झाडाझडती घेतली असून, त्यातून पोलिसांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास आणि त्यांचे सर्वसमावेशक विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. संगमनेरच्या सय्यद बाबा चौकात कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे जाहीर वाचन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला, मात्र याचवेळी आंदोलकांनी गायकवाड यांचे उपरोधिक आभार मानल्याने या विषयाची शहरात मोठी चर्चा रंगली आहे. वंचित बहुजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने सोमवारी सायंकाळी संगमनेर येथील बहुचर्चित ठरलेल्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या वाचन चळवळीतून इतिहासाचा जागर करण्यात आला. सय्यद बाबा चौकात आयोजित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुक्यासह राज्यभरात सध्या जंगलांना लागणाऱ्या आगींचे सत्र सुरू असून, यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. या गंभीर घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही ठोस किंवा समाधानकारक उपाययोजना केल्या जात नसल्याचा थेट आरोप माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केला आहे. मालदाड परिसरात नुकत्याच लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे केवळ झाडेच जळून खाक होत नसून वन्यजीवांचेही अतोनात नुकसान होत आहे. या परिस्थितीमुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्य पसरले आहे. आपण ‘दंडकारण्य अभियाना’च्या माध्यमातून वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनासाठी रात्रंदिवस कष्ट घेत आहोत. मात्र, जर अशाच प्रकारे मानवनिर्मित किंवा नैसर्गिक…

Read More

मुंबई, विशेष प्रतिनिधी: राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या अटी व शर्ती निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या प्रवीण परदेशी समितीचा अहवाल आता प्राप्त झाला असून, हा अहवाल तातडीने चर्चेसाठी सार्वजनिक करावा, अशी आग्रही मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे. या समितीने केलेल्या शिफारसी आणि अभ्यासावर व्यापक चर्चा होणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. शेतकऱ्यांना वारंवार कर्जबाजारीपणातून मुक्त करण्यासाठी या समितीने नेमक्या कोणत्या शिफारसी केल्या आहेत, हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे. सध्या अशी चर्चा आहे की, समितीच्या अटींमुळे असंतोष निर्माण होऊ नये म्हणून सरकार २०१७ आणि २०१९ च्या जुन्याच निकषांवर कर्जमाफी देण्याचा विचार करत आहे. जर सरकारला जुनेच निकष राबवायचे होते, तर नवीन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:  हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संगमनेर येथे रविवारी एक विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील तसेच उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय कागदपत्रांचे मार्गदर्शन व नोंदणी शिबिर अलकानगर येथे उत्साहात पार पडले. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत झालेल्या या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन आवश्यक कागदपत्रांची नोंदणी करण्यात आली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन आयोजित केलेल्या या उपक्रमात नागरिकांसाठी विनामूल्य ओळखपत्र दुरुस्ती, ई-श्रम कार्ड, आभा कार्ड,…

Read More

डॉ. मैथिली सत्यजीत तांबे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे संवेदनशीलता आणि शिस्त. यांचा संगम लाभलेले हे नेतृत्व संगमनेरच्या विकासाला नवी दिशा देत आहे. चेन्नईच्या मातीत जन्म झाला असला तरी, सांगलीच्या खानापूर तालुक्यातील मातीची ओढ त्यांच्या रक्तात आहे. तामिळ, मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा भाषांच्या संगमातून त्यांना जे बहुभाषिक व्यक्तिमत्व लाभले त्यामुळेच त्यांना समाजाच्या विविध स्तरांतील लोकांशी संवाद साधणे सहज शक्य झाले. पण हा केवळ संवाद नव्हता तर ती नाती जोडण्याची एक कला होती. डॉक्टर (BDS) म्हणून रुग्णांच्या वेदना समजून घेण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले. मात्र, केवळ क्लिनिकपुरते मर्यादित न…

Read More