Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संगमनेर शहर ठाकरे शिवसेनेच्या वतीने बुधवारी (२३ एप्रिल) सायंकाळी तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी शिवसैनिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी बोलताना, पूर्वी काँग्रेसच्या काळात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे जनता वैतागली होती, त्यामुळे त्यांनी भाजपला सत्तेवर आणले. मात्र, भाजपच्या काळातही पुलवामा आणि पहलगामसारखे हल्ले होत असतील, तर जनतेला भाजपलाही घरी बसवण्याची वेळ आली आहे, असे मत व्यक्त केले. शहरप्रमुख पप्पू कानकाटे आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांनीही पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत देशातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह…
संगमनेर – प्रतिनिधी जम्मू-कश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा संगमनेर शहर काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी (दि. 23) तीव्र निषेध नोंदवण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवर कॅण्डल मार्च काढण्यात आला, कॅण्डल मार्चमध्ये सहभागी कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ आणि ‘अतिरेक्यांना फाशी द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कॅण्डल मार्चमध्ये माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे अध्यक्ष जयश्री थोरात यांच्यासह संगमनेर तालुका व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआय, जय हिंद युवा मंच, महाविकास आघाडी, पुरोगामी संघटना आणि समविचारी पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘फाशी द्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या संगमनेर तालुक्यातील १४४ ग्रामपंचायतीच्या आरक्षणासाठी आज (बुधवार, २३ एप्रिल) दुपारी तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठी राखीव असलेल्या जागांची सोडत काढण्यात आली. शुक्रवारी (२५ एप्रिल) प्रांत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महिला आरक्षण निश्चित केले जाणार आहे. आरक्षण सोडतीवेळी संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आरक्षण सोडतीनंतर कुठली ग्रामपंचायत कोणत्या प्रवर्गासाठी राखीव झाली यांची चर्चा सुरू होती. दरम्यान आता कुठल्या ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठीचे आरक्षण पडते याकडे लक्ष लागले आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेले ग्रामपंचायत निहाय आरक्षण… बघा यादी
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाच्या दणदणीत विजयानंतर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विधानसभेच्या पराभवाचे आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला. “विधानसभेच्या निवडणुकीत झालेली चूक पुन्हा होऊ नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे होते. अतिआत्मविश्वास आणि गाफीलपणा टाळल्यामुळेच हा विजय शक्य झाला,” असे थोरात म्हणाले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा आहे, या पार्श्वभूमीवर कारखान्याचे सभासद, कार्यकर्ते आणि हितचिंतकांचा स्नेह मेळावा गुंजाळवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह नूतन संचालक, अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते. थोरात म्हणाले,…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. बसस्थानकासमोर जुन्या नाशिक-पुणे महामार्गावर उतरलेल्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि पाकिस्तानच्या हिरव्या झेंड्याचे दहन करून आपला संताप व्यक्त केला. यावेळी महायुतीच्यावतीने पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले. निदर्शनांमध्ये शिवसेना, भाजप आणि आरपीआयचे तालुका आणि शहर स्तरावरील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महायुतीच्या नेत्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली की, दहशतवाद्यांना कठोर शासन करावे आणि त्यांच्या संघटनांना संपवण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत. हिंदू पर्यटकांवरील हा हल्ला केवळ एका विशिष्ट समुदायावर नसून संपूर्ण देशावरील हल्ला असल्याचे मत यावेळी…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर व्यक्ती आणि संघटनांना बेकायदेशीर ठरवण्याचे अमर्याद अधिकार राज्य सरकारला देणाऱ्या प्रस्तावित जनसुरक्षा विधेयकाविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) काल (मंगळवार,२२ एप्रिल) संगमनेरमध्ये मोठे शक्तिप्रदर्शन केले. अकोले आणि संगमनेर तालुक्यातील हजारो श्रमिक या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला. जनसुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले आणि त्याला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. राज्य सरकार शहरी नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी हे विधेयक आणत असल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात सरकारच्या धोरणांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या आणि आवाज उठवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेवर कारवाई करण्याचे प्रचंड अधिकार या विधेयकामुळे सरकारला मिळणार आहेत. सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर आज (बुधवारी, २३ एप्रिल) पहाटे पाच वाजता संगमनेरच्या भारत नगरमधील कादरी मस्जिदच्या मागील बाजूस गल्ली नंबर १ येथे एका वाड्यात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संगमनेर मध्ये पोलिसांकडून सातत्याने कत्तलखाना चालकांवर कारवाया केल्या जात आहे. संगमनेर शहर पोलीस, पोलीस उपअधीक्षक आणि अहिल्यानगर च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून संगमनेर मधील कत्तलखान्यांवर सातत्याने छापेमारी केली जात आहे. यातून वारंवार या अवैधरित्या चालणाऱ्या कत्तलखान्यांमध्ये गोवंश जनावरांची हत्या होत असल्याचे समोर आले आहे. या शिवाय वारंवार तेच तेच आरोपी निष्पन्न होत आहेत. संगमनेर चे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर नगरपालिकेने…
महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान’ स्पर्धेत संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्याचा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरी सेवा दिन २०२५ च्या निमित्ताने राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका तसेच शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान’ अंतर्गत सन २०२३-२०२४ आणि सन २०२४-२०२५ या वर्षांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी वृक्ष संगोपन व संवर्धनासाठी ‘सीड बँक’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केली. कोकरे यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील बेलसोंडा वाडीजवळ पाण्याच्या टँकरचा टायर फुटल्याने तो सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत तुकाराम गोविंद घुले (वय ५०) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले सिताराम गणपत घुले हे गंभीर जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना आज (मंगळवार, २२ एप्रिल) घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम घुले आणि सिताराम घुले हे दोघेही बेलसोंडा फाट्यावरून बेलसोंडा वस्तीकडे ट्रॅक्टरद्वारे पाणी घेऊन जात होते. दरम्यान, अचानक ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर थेट २०० फूट खोल दरीत कोसळला. ट्रॅक्टर दरीत कोसळल्याचा मोठा आवाज ऐकून वस्तीतील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांची पदोन्नतीने बदली झाली असून ते आता अहिल्यानगरचे अपर जिल्हाधिकारी असतील. राज्यभरात तीसहून अधिक महसूलच्या अधिकाऱ्यांना शासनाने बढत्या दिल्या असल्याची माहिती समोर येत असून त्यात हिंगे यांचा समावेश आहे. हिंगे यांच्या रिक्त जागेवर अद्याप नवीन नियुक्ती करण्यात आली नसली तरी शासनाकडून बदल्यांचे आदेश अद्यापही सुरू असल्याने लवकरच संगमनेरच्या रिक्त जागेवर प्रांत अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, असे संकेत मिळाले आहे. संगमनेरला येण्यापूर्वी हिंगे वाशीम येथे कार्यरत होते. लोकसभा, विधानसभा निवडणूक हिंगे यांच्या कार्यकाळात शांततेत पार पडली होती. सध्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी देखील ते निवडणूक निर्णय अधिकारी…
