Author: अनंत पांगारकर

मुंबई- भावी नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदांच्या आरक्षण सोडत कार्यक्रम निश्चित केला आहे. या संदर्भात विभागाकडून सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्ष, सचिव यांना पत्र पाठवण्यात आले आहे. सोमवारी (०६ ऑक्टोबर) मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात ही सोडत काढली जाणार आहे. या सोडतीच्या माध्यमातून राज्यातील २४७ नगरपरिषदा व १२७ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. राजकीय पक्षांना या आरक्षण सोडतीसाठी त्यांच्या पक्षाकडून दोन प्रतिनिधींची शिफारस करून पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे. नगर विकास विभागाच्या उप सचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांच्या सहीने ०३ ऑक्टोबरला यासंबंधीचे पत्र काढण्यात आले आहे. मंत्रालयात…

Read More

संगमनेर – शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया आहे. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने थोर स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेली कोळवाडे येथील जयहिंद आदिवासी आश्रम शाळा आज राज्यातील इतर आश्रम शाळांसाठी एक आदर्श मॉडेल ठरली आहे. या शाळेतील अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत, ज्यामुळे त्यांना मोठी संधी मिळाली आहे, तसेच नव्याने होत असलेल्या वस्तीगृह आणि ट्रेनिंग सेंटरमुळे स्थानिक विद्यार्थ्यांना अधिक चांगली संधी मिळेल, असा विश्वास माजी शिक्षण मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. कोळवाडे येथे जय हिंद आदिवासी आश्रम शाळेचा वर्धापन दिन, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि फादर रॉबर्ट यांच्या…

Read More

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील २९० उमेदवारांच्या शासकीय नियुक्ती आदेश वितरणाच्या कार्यक्रमाचे स्थळ बदलण्यात आले आहे. हा कार्यक्रम आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऐवजी पालकमंत्र्यांच्या कार्यालयातून आयोजित केला जाणार आहे. राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) शिफारस झालेले आणि अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या एकूण २९० उमेदवारांना हे नियुक्ती आदेश वाटप करण्यात येणार आहेत. हा महत्त्वाचा कार्यक्रम आता जनसेवा कार्यालय, लोणी–हसणापूर रोड, लोणी बुद्रुक, ता. राहाता, जि. अहिल्यानगर येथे शनिवारी (दि. ४ ऑक्टोबर) सकाळी १०.३० वाजता पार पडणार आहे. यापूर्वी हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना या…

Read More

संगमनेर – निळवंडे धरण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील वितरिकांची कामे आणि कालव्याशेजारील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज (शुक्रवार दि. ०३ ऑक्टोंबर) घुलेवाडी येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या मोर्च्याचे नेतृत्व करताना आमदार सत्यजित तांबे यांनी जलसंपदा विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, येत्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. आंदोलनावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, पांडुरंग पाटील घुले, रामहरी कातोरे, संपतराव डोंगरे, दत्ता कोकणे, विष्णुपंत रहाटळ, विलास कवडे, सचिन दिघे, मारुती कवडे, सुमित पानसरे ,रमेश नेहे, सनी ठोंबरे, अक्षय दिघे, संतोष नागरे, आनंद वर्पे, निर्मला राऊत, संतोष हासे, सुहास आहेर, किरण रोहम, प्रदीप हासे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन दसरा आणि महात्मा गांधी जयंतीनिमित्त घोषित केलेल्या मद्य विक्री बंदीच्या दिवशीही नियम मोडत अवैध विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे. विभागाने श्रीरामपूर शहरातील दोन वाईन शॉपवर छापे टाकून १२,४४,३४५/- किमतीचा अवैध मद्यसाठा व मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत किशोर भूतकर, अनिल भूतकर, आणि अरुण अक्षय काळे या तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध मद्य विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, छाप्यांमध्ये सापडलेले ‘सेंट्रल वाईन्स शॉप’ हे एका माजी नगरसेवकाच्या नावावर असल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी…

Read More

मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही दानधर्मात खर्च कराल. सामाजिक स्नेहमेळावे आणि सहली तुम्हाला आनंद देतील. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या. वृषभ (Taurus): तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. इच्छा पूर्ण होण्याचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. मिथुन (Gemini): प्रदीर्घ काळापासून सुरू असलेला तणाव कमी होईल. कामात बदल केल्यास फायदा होईल. कामात प्रगती दिसून येईल. कर्क (Cancer): दूरचा प्रवास टाळा, कारण प्रकृती आज साथ देणार नाही. पैशाच्या बाबतीत काळजी घ्या. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. सिंह (Leo): तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आज तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर चांगला प्रभाव टाकेल. कामात तुमची क्षमता वाढलेली दिसेल आणि वरिष्ठांकडून तुमच्या प्रयत्नांचे कौतुक…

Read More

अहिल्यानगर – राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील २९० पात्र तरुणांना शासकीय नोकरीची संधी मिळाली आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात या सर्व उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप केले जाणार आहे. या एकूण २९० नियुक्तींपैकी १८१ जणांना अनुकंपा तत्त्वावर तर १०९ उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) लिपिक पदांसाठी नियुक्ती मिळणार आहे. अनुकंपा तत्त्वावर निवड झालेल्या १८१ उमेदवारांमध्ये गट ‘क’ मधील ६७ आणि गट ‘ड’ मधील ११४ उमेदवारांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यात गती दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले की,…

Read More

संगमनेर – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची आज केवळ देशालाच नाही, तर जगालाही गरज आहे. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी महात्मा गांधी यांचे विचार घेऊन एक मोठी लोकचळवळ उभी करावी लागेल, असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. जयहिंद लोक चळवळीच्यावतीने महात्मा गांधी यांची १५६ वी जयंती, लालबहादूर शास्त्री यांची जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त संगमनेर येथे आयोजित भव्य प्रभात फेरीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, उत्कर्षा रुपवते, डॉ. मैथिलीताई तांबे आदी उपस्थित होते. थोरात म्हणाले की, जुलमी ब्रिटिशांविरुद्ध महात्मा गांधी यांनी भारतातील सर्व…

Read More

संगमनेर – संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी (१ ऑक्टोबर) अवैध दारू वाहतुकीविरोधात एकाच दिवशी मोठी मोहीम राबवून तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. धडक कारवाईत पोलिसांनी ३,८१,४६०/- रुपये किमतीची विदेशी आणि देशी दारू आणि ती वाहतूक करण्यासाठी वापरलेली दोन वाहने जप्त केली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात वेदांत वाईन्सच्या चालक मालकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार पो.कॉ. बाळासाहेब गुंजाळ, पो.हे.कॉ. गणेश लोंढे, पो.हे.कॉ. संतोष खैरे आणि पो.ना. राहुल डोके यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. विशेष म्हणजे, अवैध विक्री आणि पुरवठा…

Read More

मुंबई – राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्याकरिता १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची राज्य निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे. असा आहे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम: सूचना प्रसिद्धी- संबंधित जिल्हाधिकारी १० ऑक्टोबर २०२५ रोजी वृत्तपत्रात आरक्षण सोडती संदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील.  आरक्षण सोडत आणि अधिसूचना- १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत- प्रारूप आरक्षणावर १४ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम आरक्षण प्रसिद्धी- प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करून…

Read More