Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहर आणि परिसराची तहान भागवणाऱ्या निळवंडे धरणाच्या मुख्य पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनवरच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने चक्क वीज पोल उभे करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर चुकीमुळे हजारो नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, राहुल गांधी समर्थक संघ (TEAM RGSS) महाराष्ट्र आणि स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. निळवंडे धरण प्रकल्पातून संगमनेरसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ही पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र, महावितरणने कोणत्याही नियोजनाशिवाय या पाईपलाईनच्या अगदी वरून आणि बाजूने वीज पोल रोवले आहेत. यामुळे पाईपलाईनच्या संरक्षक आवरणाला आधीच मोठी इजा झाली असून, भविष्यात पाईपलाईन फुटल्यास मोठी…
संगमनेर: शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला दिलेल्या सूचनानंतर आता शहरात वारंवार समोर येणाऱ्या गोवंश कत्तलीच्या घटनांची गंभीर दखल घेत, प्रशासनाने आज अवैध कत्तलखान्यांविरुद्ध मोठी मोहीम राबवली. आज सकाळपासूनच मोठ्या पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या (बुलडोझर) साहाय्याने हे अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. संगमनेरमधील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर वारंवार झालेल्या कारवाईनंतर देखील हे कत्तलखाने सुरू असल्याचे अधोरेखित झाले आहे. या विरोधात आंदोलने करणाऱ्या संघटना देखील गेल्या काही महिन्यांपासून या प्रश्नी मूग मिळून होत्या. अशा परिस्थितीत गेल्या महिनाभराच्या कालावधीमध्ये स्थानिक पोलिसांच्या सुरू असलेल्या या कत्तलखान्यांवर अहिल्यानगरच्या एलसीबीने मोठ्या कारवाया केल्या होत्या. या कारवायांमुळे संगमनेर मधील अवैध कत्तलखान्याचे प्रस्थ समोर…
संगमनेर, प्रतिनिधी – तालुक्यातील निमगावजाळी येथील माधुरी मनोज अरगडे (वय २८) या विवाहितेने सासरच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून शेततळ्यात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या धक्कादायक घटनेप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात पती मनोज भास्कर अरगडे आणि सासू मीराबाई भास्कर अरगडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधुरी यांचा विवाह १० वर्षांपूर्वी झाला होता. सुरुवातीचे काही महिने सुखात गेल्यानंतर, पती आणि सासूने किरकोळ घरगुती कारणावरून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. या जाचाला कंटाळून त्या काही काळ आपल्या मुलांसह माहेरी (अंभोरे) राहण्यास गेल्या होत्या. मात्र, नातेवाइकांच्या मध्यस्थीनंतर त्या पुन्हा सासरी परतल्या होत्या. ७ फेब्रुवारी रोजी माधुरी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती.…
आजचे राशीभविष्य: मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र बोलताना संयम ठेवावा. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः उष्णतेचे विकार त्रास देऊ शकतात. वृषभ: आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्यामुळे मन प्रसन्न राहील. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम असून भविष्यात त्याचे चांगले फळ मिळेल. व्यावसायिकांना नवीन कंत्राट मिळण्याची चिन्हे आहेत. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनावरचा ताण हलका होईल. मिथुन: आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील.…
संगमनेर, प्रतिनिधी – नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरून राजकारण तापले असून, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्र्यांच्या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पालकमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांना नेमका कोणता मार्ग सुचविला आणि कोणता नकाशा दाखविला, हे जनतेसमोर स्पष्ट करावे, अशी आग्रही मागणी थोरात यांनी केली आहे. संगमनेर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकल्पातील संदिग्धतेवर प्रहार केला. थोरात म्हणाले, नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प हा या भागाच्या विकासासाठी अत्यंत कळीचा मुद्दा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०२० मध्ये या प्रकल्पाला मोठी गती देण्यात आली होती. सेंट्रल रेल्वेने डीपीआर मंजूर केल्यानंतर नाशिक-सिन्नर-संगमनेर-साकूर-आळेफाटा-राजगुरुनगर-चाकण-हडपसर-पुणे असा सरळ मार्ग निश्चित झाला होता. मंत्रिमंडळाची मान्यता मिळून…
संगमनेर, प्रतिनिधी – तालुक्यातील सावरगाव तळ, चंदनापुरी, हिवरगाव पावसा आणि झोळे या गावांना पाण्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. ज्याप्रमाणे तळेगाव निमोण आणि साकुर पठार भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जात आहे, त्याच धर्तीवर या गावांचा प्रश्नही उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून सोडवला जाईल. तुम्हाला पाणी देण्याची जबाबदारी आम्ही घेतली असून तो शब्द आम्ही नक्कीच पूर्ण करू, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली. सावरगाव तळ येथे आयोजित ५ कोटी ७१ लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी आमदार खताळ बोलत होते. या कार्यक्रमाला महायुतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नूतन ग्रामपंचायत इमारत, सभामंडप, व्यायामशाळा साहित्य, म्हसोबा महाराज मंदिर रस्ता…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर नगरपालिकेच्या प्रशासकीय कारभारात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे पती आमदार सत्यजित तांबे यांचा बेकायदेशीर हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाची दखल घेत महायुतीच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने कारवाई करण्याची आणि नगराध्यक्षांचे पद रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना निर्णय प्रक्रियेत सक्षम करण्यासाठी शासनाने ५० टक्के आरक्षण दिले असून, महिला लोकप्रतिनिधींना स्वतंत्रपणे काम करता यावे यासाठी विशेष शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे. या नियमानुसार महिला पदाधिकाऱ्यांच्या पतीला किंवा नातेवाईकांना संबंधित संस्थेच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास मनाई असल्याचे म्हटले आहे. मात्र, संगमनेर नगरपालिकेत या नियमांचे सर्रास उल्लंघन…
संगमनेर, प्रतिनिधी – प्रभाग क्रमांक १४ मध्ये विकासकामांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या नगरसेवकाचा एक वेगळाच अंदाज रहिवाशांना पाहायला मिळाला. कामाच्या व्यापातून वेळ काढत नगरसेवक योगेश जाजू यांनी चक्क लहान मुलांसोबत गल्ली क्रिकेटचा आनंद लुटला. त्यांच्या या ‘इनिंग’ची सध्या संगमनेरमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. नगरसेवक म्हणून सभागृहामध्ये नागरिकांचे प्रश्न मांडत असताना नगरसेवक योगेश जाजू हे आपल्या प्रभागातील दैनंदिन विकासकामांची पाहणी करत होते. प्रभागातील या पाहणी दरम्यान काही मुले तेथे रस्त्यालगत क्रिकेट खेळत होती. खेळता खेळता अचानक चेंडू त्यांच्या पायापाशी आला. मुलांनीही मोठ्या उत्साहाने त्यांना खेळण्याचा आग्रह केला. हा आग्रह मोडता न आल्याने, जाजू यांनी हातात बॅट धरली आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.…
आजचे राशीभविष्य: मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल, तर व्यापाऱ्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे हितकारक ठरेल. वृषभ : आज तुम्हाला आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च टाळल्यास भविष्यातील चिंता कमी होतील. कौटुंबिक वादात पडणे टाळावे, अन्यथा मनस्ताप होऊ शकतो. प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. संयम बाळगल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने झुकेल. सायंकाळचा वेळ मित्र-परिवारासोबत व्यतीत केल्यास प्रसन्न वाटेल. मिथुन : तुमच्या कल्पकता आणि कार्यक्षमतेमुळे आज तुम्ही कठीण…
संगमनेर, प्रतिनिधी – राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काही ठिकाणी एजंटांकडून पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र, ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, बांधकाम कामगारांनी कोणत्याही मध्यस्थाला पैसे न देता थेट महायुती जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा. फसवणूक करणाऱ्या एजंटांना अजिबात बळी पडू नका, असे आवाहन संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी केले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून शनिवारी (१४ फेब्रुवारी) संगमनेर येथील मातोश्री लॉन्स येथे आमदार खताळ यांच्या हस्ते २ हजार बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संचाचे (भांडी) वाटप करण्यात आले. फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा पुन्हा एकदा इशारा: काही ठिकाणी योजनेचे फॉर्म…
