Author: अनंत पांगारकर
संगमनेर – ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत परवानगी नसतानाही मोठ्या आवाजात डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी दोन डीजे वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे परिसरात विनापरवाना डीजे वाजवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही डीजे वाहने जप्त केली असून, आयोजकांचाही शोध सुरू आहे. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांकडून ही कठोर भूमिका घेतली असून, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार कोणताही लाऊड स्पीकर किंवा डीजे वाजवण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी देताना आवाजाची पातळी (डेसिबल मीटर) आणि वेळेचे नियम पाळणे आवश्यक असते. मात्र, काल शहरात आयोजित केलेल्या ईद-ए-मिलाद मिरवणुकीसाठी पोलिसांकडून लाऊड…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सिन्नर-शिर्डी महामार्गावर मिरगाव फाट्याजवळ रात्रीच्या वेळी एका लॅब टेक्निशियनला मारहाण करून १५,००० रुपये लुटणाऱ्या तिघांना वावी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या घटनेतील चौथा आरोपी मात्र अद्याप फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. मागील महिन्यात ही घटना घडली होती. वावी येथे लॅब टेक्निशियन म्हणून काम करणारे सुधाकर सोपान वक्ते (वय ३५) हे आपले काम संपवून रात्री ८ च्या सुमारास जेऊर कुंभारी (कोपरगाव) येथील आपल्या घरी परत जात असताना चोरट्यांनी त्यांना गाठले. यावेळी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील १५,००० रुपये हिसकावून चोरट्यांनी शिर्डीच्या दिशेने पळ काढला होता. या घटनेनंतर सुधाकर वक्ते यांनी तात्काळ पोलिसात…
अहिल्यानगर- जिल्ह्यातील एका ग्रामसेवकाला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ५ सप्टेंबर) दिलीप संजय मिसाळ (वय ३९, रा. खेटाकळी, ता. शेवगाव) या ग्रामसेवकाला अमोल चंद्रकांत गवळी (रा. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी) या व्यक्तीने अडवले. आरोपी गवळीने ग्रामसेवक मिसाळ यांना बंदुकीचा धाक दाखवून, ऐ ग्रामसेवक, माझ्याकडे बंदूक आहे, यातील सहा गोळ्या तुझ्या… घालीन, अशी धमकी दिली. पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तू आमच्या विरोधकांचे ऐकून काम करत होतास, आता आमचे नेते खासदार आहेत, आम्ही फक्त तुमची आणि विरोधकांची जिरवणार, असे धमकावले. या घटनेची माहिती…
मेष (Aries)- आज तुम्हाला मानसिक शांती आणि आनंद मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये असलेले नाते अधिक घट्ट होईल. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. वृषभ (Taurus)- आज तुम्ही शांत आणि आत्मविश्वासाने कामाला सुरुवात कराल. तुमचे छुपे शत्रू किंवा विरोधक तुमच्याशी स्पर्धा करू शकणार नाहीत, ज्यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या समर्पणाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रमोशन मिळू शकते. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहांचा आशीर्वाद मिळेल. मिथुन (Gemini)- आज तुम्ही कौटुंबिक बाबींमध्ये व्यस्त असाल, परंतु तुम्ही उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत शोधण्यास देखील सक्षम असाल. तुमची…
संगमनेर: सकल मराठा समाज, शहर आणि तालुका यांच्या वतीने मंगळवारी (९ सप्टेंबर) संगीता वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी संगमनेर शहर पोलीस स्टेशनला निवेदन दिले जाणार आहे. मराठा समाजातील महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा निषेध करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाणार आहे. मोठ्या संख्येने मराठा समाजातील महिला आणि पुरुष हे निवेदन देणार आहे. संगीता वानखेडे यांनी केलेल्या मराठा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह विधानांमुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या विधानांचा निषेध करत, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. या निवेदनानंतर पोलीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल…
संगमनेर: गणेश विसर्जनाच्या दिवशी संगमनेरच्या पठार भागातील साकुर मध्ये दोन सख्या चुलत बहिणींनी आत्महत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच त्या पाठोपाठ संगमनेर शहराला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाह केलेल्या एका दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही घटना शहरातील इंदिरानगर परिसरातील जय जवान चौकात घडली. या दुर्दैवी घटनेत वैष्णवी संजय खांबेकर (वय २२) आणि तिचा पती कुलदीप सुनील अडांगळे (वय ३५) यांचा अंत झाला. वैष्णवी आणि कुलदीप यांचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघेही जय जवान चौकातील घरात राहत होते. या संदर्भात अद्याप पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाली…
संगमनेर- नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि वडनेर दुमाला येथे बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय आयुष आणि 10 वर्षीय सारंग या दोन निष्पाप मुलांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच, आमदार सत्यजीत तांबे यांनी बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘बिबट्या नसबंदी कायदा’ लागू करण्याची जोरदार मागणी केली आहे. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने या मागणीचा पाठपुरावा केला असून, ही लढाई बिबट्यांविरोधात नसून शेतकऱ्यांच्या आणि माणसांच्या जगण्याच्या हक्कासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. आमदार तांबे यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या मुलांचा असाच बळी जात राहणार का? बिबट्याच्या हल्ल्यात नाशिकच्या वडनेर दुमाला येथील 3 वर्षीय आयुषच्या मृत्यूनंतर त्याच्या आईचा आक्रोश आजही डोळ्यासमोर आहे आणि कालच सिन्नर…
संगमनेर – सहकाराचे आदर्श मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, १२ सप्टेंबर ते रविवार, १४ सप्टेंबर २०२५ या काळात आयोजित करण्यात आल्या आहेत. या सभा काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत. स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर आधारित या संस्थांनी संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या संस्थांमुळे शेतकरी, उत्पादक, नागरिक, महिला, व्यापारी आणि कामगार अशा सर्वांचा विकास झाला असून तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. या सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावरील नवीन प्रशासकीय…
संगमनेर – जगातील सर्व दुःख मलाच आहे असे अनेक जण समजून जीवन दुखी करतात. दुःख विसरा हसत रहा. शोधले तर प्रत्येक ठिकाणी आनंद आहे. व्यंग हे प्रत्येक ठिकाणी आहे. ते शोधण्याची कला अरविंद गाडेकर यांना असून त्यांच्या “मनातलं पानावर” हे पुस्तक वाचकांना आनंद देईल आणि जीवनातील दु:ख विसरून आनंदी राहण्यास मदत करेल, असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी व्यक्त केला आहे. व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांच्या “मनातलं पानावर” या पुस्तकाचे प्रकाशन संगमनेर येथे सह्याद्री महाविद्यालयाच्या के. बी. दादा सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते, तर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, श्रीमती सुवर्णाताई मालपाणी, अनिल देशपांडे,…
मुंबई- राज्यात यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी राज्यभरात विसर्जन मिरवणुका मोठ्या जल्लोषात पार पडल्या. मात्र, काही ठिकाणी गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या दुर्दैवी घटनांमुळे १८ जणांचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये तिघांचा मृत्यू- नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान विविध घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. आनंदवल्ली येथे गोदावरी नदीत प्रवीण शांताराम चव्हाण या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. दुसरीकडे, बोरगड येथे चंदर नथू माळेकर (वय २९) यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सिन्नर शहरालगतच्या सरदवाडी धरणातही ओमप्रकाश सुंदरलाल लिल्हारे (वय ४०) यांचा बुडून मृत्यू झाला. धुळे, मीरा भाईंदर आणि मुंबईत दुर्घटना- धुळे जिल्ह्यात गणपती विसर्जन करून दुचाकीवरून परतणाऱ्या शुभम सांगवी…
