Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: शहरातील मालदाड रोड परिसरात एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात चोरीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सुमारे दोन लाख रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. शहर पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मालदाड रोड परिसरात माऊली कॉलनीमध्ये सेवानिवृत्त अधिकारी रामनाथ म्हातारबा सातपुते (वय ६५) हे आपल्या पत्नीसह राहतात. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घरात ही घटना घडली. चोरट्यांनी वॉल कंपाउंड वरून उडी मारून घराच्या दरवाजाचा कडे कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉक तोडून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व ९६…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन लैंगिक अत्याचारासाठी आपल्या लॉज, हॉटेल किंवा कॅफेचा वापर करण्यास परवानगी देणाऱ्या मालकांवर आता कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (POCSO) मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या सह-आरोपींनाही तितकीच शिक्षा होते. त्यामुळे, अल्पवयीन मुला-मुलींच्या लैंगिक शोषणासाठी जागा उपलब्ध करून देणारे लॉज, हॉटेल चालक, मालक किंवा कॅफे मालक हेही आता कायद्यानुसार गुन्हेगार मानले जातील. काही दिवसांपूर्वी राहुरी पोलीस ठाण्यात एक बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासात असे समोर आले की, आरोपीने पीडित मुलीला दोन वेगवेगळ्या लॉजमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामामध्ये प्रगती होईल आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus): आज तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, परंतु तुम्ही त्यावर मात कराल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. अनावश्यक खर्च टाळा. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. मिथुन (Gemini): आज तुम्हाला अनपेक्षितपणे धनलाभ होऊ शकतो. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नवीन लोकांशी संपर्क साधाल, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. कर्क (Cancer): आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहराच्या विकासाबाबत नवीन लोकप्रतिनिधींकडून अपूर्ण माहिती दिली जात असून, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप माजी पाणीपुरवठा सभापती सोमेश्वर दिवटे यांनी केला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून शहराला निळवंडे धरणातून थेट पाणीपुरवठा होत असून, जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी २३ कोटी रुपयांचा निधीही यापूर्वीच महाविकास आघाडीतील तत्कालीन नगर विकास मंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच कार्यकाळात मंजूर झाल्याचे व प्रशासकीय काळात हे काम रखडल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. महायुतीच्या आभार सभेत नवीन लोकप्रतिनिधींनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, किशोर पवार आणि नितीन अभंग यांनी सोमवारी एकत्रित पत्रकार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: आरोग्याला बाधा निर्माण होऊन देखील शहरातील गुळातील भेसळीच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप करत संगमनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शंकर रावसाहेब ढमाले गुरुवारपासून (२८ ऑगस्ट) प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण करणार आहे. ढमाले यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना सांगितले की, शहरातील सिद्धी गुळ नैसर्गिक गुळ नावाने विकल्या जाणाऱ्या मोहनलाल बन्सीलाल दर्डा यांच्या दुकानातून मी गुळ खरेदी केला होता. तो खाल्ल्यानंतर माझ्या घरात दोन व्यक्ती आजारी पडल्या आणि त्यांना रुग्णालयात ॲडमिट करावे लागले. त्यामुळे या गुळात भेसळ असल्याचा संशय आल्याने मी नगर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार दाखल…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी घेऊन येणारा ‘संगमनेर फेस्टिवल’ येत्या गुरुवारपासून (२८ ऑगस्ट) सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये विविध लोकप्रिय नाटकांसह संगीत आणि विनोदी कार्यक्रमांचा संगम साधण्यात आला आहे. राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यंदा फेस्टिवलचे १७ वे वर्ष असून राजस्थान युवक मंडळाच्या स्थापनेचे अमृत महोत्सवी वर्ष देखील आहे. फेस्टिवल मध्ये सादर होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती अशी, गुरुवार, २८ ऑगस्ट: सायंकाळी ६:३० वाजता सुप्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांचा गाजलेला एकपात्री प्रयोग ‘वर्हाड निघालंय लंडनला’ सादर होईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. शुक्रवार, २९ ऑगस्ट: सायंकाळी ७ वाजता…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन आनंदी राहील. वृषभ आज तुम्हाला काही आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते, परंतु तुम्ही त्यावर यशस्वीपणे मात कराल. आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. मिथुन आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक आहे. नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कर्क आज तुम्ही भावनिकदृष्ट्या स्थिर असाल. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध सुधारतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. सिंह आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात मान-सन्मान मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे. कन्या आज तुम्हाला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेरमध्ये ४० वर्षांची मक्तेदारी उलथवून टाकणाऱ्या मतदारांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर आभार मानले. अमोल खताळ हे ‘जायंट किलर’ असले तरी, खरे ‘जायंट किलर’ तुम्ही मतदार आहात, असे सांगत शिंदे यांनी मतदारांचे कौतुक केले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून शिवसेनेचे खताळ निवडून आल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी शिंदे संगमनेरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी थोरात यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. शिंदे म्हणाले, हेलिकॉप्टरमधून यायला तीन तास लागले, पण संगमनेरमध्ये लोटलेला जनसागर पाहता भगवं वादळ इथे आल्याचं जाणवतं. अमोल खताळ हा सर्वसामान्य कार्यकर्ता असून त्याने संधीचं सोनं केलं आहे. त्याला निवडून देणारे तुम्ही मतदारच खरे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रविवारी झालेल्या संगमनेर दौऱ्यादरम्यान त्यांच्या रॅलीत मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. रॅलीच्या वेळी सभेच्या ठिकाणाजवळ काही शिवसैनिकांनी गोंधळ घातला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आमदार अमोल खताळ यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. यादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांची संगमनेरमध्ये भव्य रॅली काढण्यात आली होती, त्यानंतर त्यांची जाणता राजा मैदानावर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, रॅली सभास्थळी पोहोचताच मंचाजवळ अचानक काही कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला आणि गोंधळ वाढू लागला. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करूनही गोंधळ…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन शहरातील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या गुन्हेगारांवर जालना पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम’ अर्थात ‘मोक्का’ (MCOCA) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहे. भोकरदन नाका परिसरातील व्यापारी चंदन बंसतीलाल गोलेच्छा यांना धमकावून खंडणी मागणारे विठ्ठल अंभोरे, अक्षय गाडेकर आणि राहुल गंगावणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तपासात असे समोर आले की, मुख्य आरोपी विठ्ठल अंभोरे आणि त्याच्या साथीदारांचा एक पूर्वेतिहास आहे. त्यांनी जालना तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. या टोळीचा वाढता उपद्रव लक्षात घेता, पोलिसांनी…
