Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त – अनंत पांगारकर – संगमनेर: माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकारणाचे बाळकडू मिळालेले आमदार सत्यजित तांबे यांनी, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना विधिमंडळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थी चळवळीत कार्यरत असलेल्या तांबे यांनी पावसाळी अधिवेशनात शेतकरी, बेरोजगार, पदवीधर, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, वकील यांच्यासह समाजातील विविध घटकांचे ११४ प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले. या सर्व प्रश्नांना सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे आणि आगामी काळात त्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सोशल माध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधताना सांगितले. संगमनेर येथे पावसाळी अधिवेशनात केलेल्या कामाची माहिती देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, एनएसयूआय…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त – अहिल्यानगर: महाराष्ट्रातील प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थान पुन्हा एकदा मोठ्या वादंगात सापडले आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात देवस्थान ट्रस्टमध्ये मोठ्या आर्थिक घोटाळ्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले होते. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक वळण आले असून, देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उपकार्यकारी आधिकारी नितीन शेटे यांनी सोमवारी संशयास्पद परिस्थितीत राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी शनिशिंगणापूर आणि अहमदनगर जिल्ह्याभरात “देवस्थानातील भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि चौकशीच्या भीतीमुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले का?” अशा चर्चांना उधाण आले आहे. गावातील अनेक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त – पुणे: दारूचे व्यसन सोडण्यास नकार देणाऱ्या पतीसोबत नांदण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील लोहगाव परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी पती प्रेम जाधव (वय २७) याला अटक करण्यात आली आहे. ममता जाधव (वय २१) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी रेश्मा राठोड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ममता जाधव आणि आरोपी प्रेम जाधव यांचा विवाह २०२० मध्ये झाला होता. प्रेम जाधव याला दारूचे व्यसन होते. ममता वारंवार दारू सोडण्याची विनंती करत होती, परंतु प्रेम दारू सोडत नव्हता. याच…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त राहुरी: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण असून, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन शेतकरी भवन व उपहारगृहाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार काशीनाथ दाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या नफ्यात व काटकसरीने चालवण्यावर भर दिला. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे उत्पादन वाढवण्याचे, फळबाग…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला मोठा धक्का बसला आहे. तब्बल २ कोटी ५२ लाख लाभार्थ्यांपैकी २६ लाख ३४ हजार लाभार्थी विविध कारणांमुळे अपात्र ठरले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या योजनेचा लाभ १४ हजार २९८ पुरुषांनीही घेतल्याचे उघड झाले आहे. या अपात्र लाभार्थ्यांमुळे गेल्या वर्षभरात राज्याचे सुमारे ४ हजार ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी (२७ जुलै) समाजमाध्यमांवर स्वतः अपात्र लाभार्थ्यांची आकडेवारी जाहीर केली. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर या योजनेतील अर्जांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात…
संगमनेर, प्रतिनिधी: शांतता, समृद्धी आणि सुसंस्कृतपणाचे प्रतीक असलेल्या संगमनेर तालुक्यात गेल्या आठ महिन्यांपासून अशांततेचे आणि तेढ निर्माण करणाऱ्या घटनांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप होत आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा शुभेच्छा फलक फाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, समाजात अशांतता पसरवणाऱ्या विकृत प्रवृत्तींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. वडगाव पान येथील टोलनाक्याजवळ असलेल्या महादेव मंदिरापाशी श्रावण मासानिमित्त बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या शुभेच्छांचा फ्लेक्स लावण्यात आला होता. मात्र, श्रावणाच्या दुसऱ्याच दिवशी काही समाजकंटकांनी या फ्लेक्सची छेडछाड केल्याचा प्रकार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त पुणे: पुणे शहरानजीकच्या खराडी भागात सुरू असलेल्या एका हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत तिचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. डॉ. खेवलकर हे राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती असल्याने या अटकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ‘हाऊस पार्टी’च्या नावाखाली सुरू असलेल्या या पार्टीवर गुन्हे शाखेने मध्यरात्री छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त केला आहे. या प्रकरणी दोन महिला आणि पाच पुरुष अशा एकूण सात जणांना अटक करण्यात आली…
हिंदी सक्तीच्या मुद्यावर सातत्याने पळ काढणार्या राज्यातल्या युती सरकारच्या मौनी भूमिकेचा परप्रांतीय कसा फायदा घेतात हे सातत्याने समोर येत असताना महाराष्ट्राविषयी आग ओकणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लाडूकला खासदार निशिकांत दुबे याला भर संसदेच्या लॉबीत खडेबोल सुनावणार्या काँग्रेस पक्षाच्या महिला खासदार रणरागिणींचं करावं तितकं कौतुक कमीच. या खासदारांनी महाराष्ट्राची मान ताठ केलीच नाही तर तमाम मराठी माणसाला त्याच्या स्वत्वाचीही जाणीव करून दिली. इनमीन तीन महिला खासदारांच्या या अवतारामुळे सत्तेचा माज चढलेल्या निशिकांतला या महिलांच्या गराड्यातून पाय काढता घेणंही अवघड झालं आणि ‘आप हमारी बहेन है’, असं सांगत त्याला पळ काढावी लागली. मराठीबाणा काय असतो, हे दाखवणार्या धारावीच्या वर्षा गायकवाड, धुळ्याच्या शोभा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त अहिल्यानगर/संगमनेर: एक महत्त्वाची आणि सतर्क करणारी बातमी समोर येत आहे. संततधार पावसामुळे भंडारदरा आणि निळवंडे ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून, धरणांमधून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना विशेषतः प्रवरा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी नदीपात्रात न उतरण्याचे आणि आपल्या मालमत्तेची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. भंडारदरा धरणातून विसर्ग सुरू- अहिल्यानगर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, २६ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता भंडारदरा धरणातील एकूण पाणीसाठा ९१६५ दशलक्ष घनफूट (दलघफु) इतका झाला होता. धरणाच्या जलाशय परिचालन सूची (ROS)…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त रत्नागिरी: संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील कोसुंब रेवाळेवाडी येथे सासऱ्याने घरातील कामे सांगितल्याच्या रागातून सुनेने जेवणात विषारी द्रव्य मिसळून त्यांना जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत पतीलाही विषबाधा झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. देवरूख पोलिसांनी संबंधित सुनेला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जगन्नाथ सोलकर (वय ३४) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या सुनेचे नाव स्वप्नाली सचिन सोलकर (वय ३२) असे आहे. सचिन आणि स्वप्नाली यांचा विवाह याच वर्षी १३ एप्रिल २०२५ रोजी झाला होता. स्वप्नालीला सासरे जगन्नाथ सोलकर हे घरातील कचरा काढणे, साफसफाई करणे आणि इतर कामे व्यवस्थित करण्यास…
