Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष : आज तुम्हाला कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन आनंदी राहील. वृषभ : काही जुने वाद मिटतील. आरोग्याची काळजी घ्या. जास्त खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. मिथुन : नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. मित्रांचे सहकार्य मिळेल. कर्क : आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. सिंह : पैशांची गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रवासाचे योग आहेत. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कन्या : काही आव्हानांना तोंड द्यावे लागेल, पण तुम्ही त्यावर सहज मात कराल. मेहनत केल्यास नक्कीच यश मिळेल.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन शिर्डी: पत्नी माहेरी निघून गेल्याच्या कौटुंबिक वादातून एका बापाने आपल्या चार चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शिर्डीजवळ घडली आहे. राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारात एका विहिरीत पाच मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण काळे (वय ३०) याने आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही जीवन संपवलं. अरुण काळे हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव येथे राहत होता. त्याला तीन मुले आणि एक मुलगी होती. गेल्या काही दिवसांपासून घरात सुरू असलेल्या वादामुळे त्याची पत्नी आठ दिवसांपूर्वी त्याला सोडून माहेरी येवला तालुक्यात गेली होती. याच कारणातून अरुणने दारूच्या नशेत हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी – स्वातंत्र्यसेनानी व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यासह मागील पिढीतील व्यक्तींनी तालुक्याच्या विकासाचा पाया रचला आहे. याच योगदानातून, संगमनेरच्या वैभवात भर टाकणारी थोरात कारखान्याची नवीन प्रशासकीय इमारत उभी राहिली असल्याचा गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या इमारतीचे उद्घाटन लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी चेअरमन बाळासाहेब पाटील गुंजाळ, बाजीराव पाटील खेमनर, माधवराव कानवडे, लक्ष्मणराव कुटे आणि बाबा ओहोळ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. कारखान्याने तालुक्याचे हृदय म्हणून काम केले- यावेळी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल आणि नवीन संधीही मिळतील. गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे आणि नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा पगारवाढ मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कोर्टातील जुन्या प्रकरणांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. वृषभ : आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी सावध राहावं लागेल आणि कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. कौटुंबिक संपत्तीच्या बाबतीत शहाणपणाने काम करा. आर्थिक लाभाची शक्यता आहे आणि नोकरीमध्ये शुभ बातम्या मिळू शकतात. आज तुम्ही सामाजिक कार्यक्रमात भाग घ्याल. मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा तणावपूर्ण असू शकतो. कोणतेही महत्त्वाचे निर्णय…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर/संगमनेर: संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसा घरफोड्या करणाऱ्या एका सराईत आरोपीला आणि त्याच्या महिला साथीदाराला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ४८ तासांत जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला ११,७९,१४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कौठे कमळेश्वर येथील रहिवासी सोमनाथ शिवाजी भडांगे हे एका कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील ९,९२,२८० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: धनादेश अनादरीत झाल्याच्या (चेक बाऊन्स) प्रकरणात संगमनेर येथील आशिष सुभाष वर्मा यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. व्ही. सूर्यवंशी यांनी दोषी ठरवत दोन महिन्यांच्या साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर, न्यायालयाने वर्मा यांना ३० दिवसांच्या आत फिर्यादी कंपनीला २०,७६४ रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम न भरल्यास त्यांना आणखी १५ दिवसांचा साधा कारावास भोगावा लागेल. तब्बल तेरा वर्षे चाललेला या खटल्याचा महत्त्वपूर्ण निकाल १४ ऑगस्ट २०२५ रोजी देण्यात आला. हे प्रकरण श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड या कंपनीने दाखल केले होते. कंपनी ही नोंदणीकृत असून, कर्ज देण्याचा व्यवसाय करते. आशिष वर्मा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईनअहिल्यानगर: भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाकोडी फाटा येथे सुरू असलेल्या एका बिंगो जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या पथकाने छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एकूण ४१,८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (१४ ऑगस्ट) करण्यात आली. पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे मयूर प्रताप छजलानी (वय ३२), नरेश रामसिंग चव्हाण (वय ३५), आणि ओंकार नंदू बनसोडे (वय २२) अशी आहेत. हे तिघेही हरीमाळ दरेवाडी, सोलापूर रोड, अहिल्यानगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून बिंगो खेळण्याचे साहित्य आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस…
मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि तुम्ही त्या यशस्वीपणे पार पाडाल. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ : आर्थिक व्यवहार जपून करा. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. मिथुन : आज तुमची सर्जनशीलता वाढलेली असेल. कला, लेखन किंवा इतर छंदातून तुम्हाला आनंद मिळेल. सामाजिक कार्यक्रमात भाग घेतल्यास नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल. कर्क : घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कौटुंबिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवल्यास अनावश्यक वाद टाळता येतील. सिंह : तुमच्या…
विशेष प्रतिनिधी / नवी दिल्ली वृत्तपत्रात लेख लिहिला वा वृत्तवाहिनीवर व्हिडीओ दाखवला म्हणून पत्रकारावर देशद्रोहाचा गुन्हा कसा काय होऊ शकतो? तो शस्त्र घेऊन लढत होता काय? नसेल तर कोणाच्याही विरोधात कशीही कारवाई करायला या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काही आहे की नाही असं विचारत सर्वोच्च न्यायालयाने सरकारची पुरती सालटी उतरवली. सर्वोच्च न्यायालयाने ‘द वायर’च्या पत्रकारावरील देशद्रोही ठरवण्याच्या प्रकरणावरील सुनावणी दरम्यान ही टिप्पणी केली. कोणत्याही पत्रकारांचे लेख किंवा व्हिडीओ प्रथमदर्शनी देशाची एकता आणि अखंडता धोक्यात आणणारं कृत्य नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने ‘द वायर’चे सिद्धार्थ वरदराजन आणि ‘फाउंडेशन ऑफ इंडियापेंडेंट जर्नलिझम’च्या सदस्यांना अटकेपासून संरक्षण…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील कुरण गावात सर्रास सुरू असलेल्या गोहत्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी ह्यूमन रिलीफ अल्पसंख्यांक फाउंडेशनने एका निवेदनाद्वारे केली आहे. यासंबंधीचे निवेदन आज, (१४ ऑगस्ट) फाउंडेशनच्या वतीने संगमनेर शहर पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. या निवेदनात, संगमनेरमधील समस्त मुस्लिम समाजाने कुरण गावात काही व्यक्तींकडून सातत्याने होत असलेल्या गोहत्यांबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्रभर कुरेशी, खाटीक व्यापारी आणि शेतकरी संघटनांनी जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बहिष्कार घालून व्यापार व कत्तलखाने बंद ठेवले असतानाही कुरण गावात मात्र कसलीही भीती न बाळगता गोहत्या सुरू असल्याचं निदर्शनास आले आहे. पोलिसांनी अनेकदा छापे टाकले असले तरीही हा प्रकार थांबत नसल्याचे…
