Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष रास आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामात यश मिळेल आणि नवीन संधी मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ रास आज तुम्हाला थोडा ताण जाणवेल, पण तुम्ही तुमच्या मेहनतीने सर्व अडचणींवर मात कराल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. मिथुन रास आज तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. मित्र आणि नातेवाईकांशी संबंध चांगले राहतील. कर्क रास आज तुम्ही खूप भावूक होऊ शकता. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. सिंह रास आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आहे. तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील. तुमच्या आरोग्याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणी भविष्यात मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल. खंडोबा देवस्थानात झालेल्या कथित ११ लाख रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. गरज पडल्यास आपण स्वतः मंदिराबाहेर आंदोलन करू, असे प्रतिपादन संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी केले. घारगाव ते हिवरगाव पावसा या ३३ केव्ही उच्चदाब वीजवाहिनीचा नुकताच शुभारंभ खताळ यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. हिवरगाव पावसा येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुभाष गडाख होते. यावेळी भाजपचे उपाध्यक्ष अशोक कानवडे, माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, उपसरपंच सुजाता दवंगे, शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोमनाथ भालेराव, केशव…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील ८ रस्त्यांसाठी मंजूर केलेली ४० कोटी रुपयांची कामे रद्द करण्यात आल्याने तालुक्यात संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, हा निर्णय केवळ संगमनेर तालुक्यासाठीच घेण्यात आला असून जिल्ह्यातील इतर कोणत्याही तालुक्यांची कामे रद्द झालेली नाहीत. शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने अपूर्ण माहितीवर आधारित पत्रकबाजी केल्याचा आरोप शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे यांनी केला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ४०.७३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून एकूण ३०.५७० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे होणार होती. यात डिग्रस ते रणखांबवाडी, चिखली…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी तसेच जनजागृती कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जिल्हा पर्यावरण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या समितीत पर्यावरण क्षेत्रात भरीव काम करणारे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांची अशासकीय सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या १ सप्टेंबर २०१५ च्या निर्णयानुसार या समितीची स्थापना झाली असून, जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. या समितीत विविध शासकीय विभागांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. या समितीत खालील प्रमुख सदस्यांचा समावेश आहे: शासकीय अधिकारी:…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून संगमनेर तालुक्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे यांनी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर या निर्णयावरून आमदार अमोल खताळ यांची जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा आरोप केला आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा क्रमांक दोन संशोधन व विकास अंतर्गत ४ ऑक्टोंबर २०२४ रोजी मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामाची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने केवळ संगमनेर तालुक्यापुरता मर्यादित नसून, संपूर्ण जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांमध्येही असाच निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: देशातील सहकार क्षेत्रासाठी एक आदर्श ठरलेल्या संगमनेरच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच गुरुवारी (१४ ऑगस्ट) होणार आहे. या कार्यक्रमाला माजी महसूल व कृषी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आणि आमदार सत्यजित तांबे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने कायमच शेतकरी, कामगार आणि ऊस उत्पादकांचे हित जपले आहे. तसेच, कारखान्याने ५५०० मेट्रिक टन गाळप क्षमता आणि ३० मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्प यशस्वीपणे राबवून राज्यासाठी एक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुम्ही घेतलेल्या मेहनतीला यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ : आज तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. शांत डोक्याने विचार करून निर्णय घ्या. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. प्रवासाचे योग आहेत. मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरेल. तुमचे काही जुने मित्र भेटतील. व्यावसायिक जीवनात प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कर्क : आज तुम्ही थोडं भावनिक होऊ शकता. कामावर लक्ष केंद्रित करा आणि अनावश्यक विचार टाळा. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा. संध्याकाळी चांगली बातमी मिळू शकते. सिंह…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. निवडणुका ईव्हीएमवर असोत किंवा बॅलेट पेपरवर, जनता पुन्हा एकदा विरोधकांना घरी बसवेल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. संगमनेर येथील कुंभार गल्लीमध्ये शिवसेना शाखेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार खताळ यांनी कार्यकर्त्यांना सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं. यावेळी शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खताळ म्हणाले, शिवसेना पक्षात कार्यकर्ता हे पद सर्वात महत्त्वाचे आहे. मी या मतदारसंघाचा आमदार असलो तरी, सर्वप्रथम एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी कार्यकर्ता म्हणूनच…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी : राज्यात भाकड जनावरे आणि वासरांचा प्रश्न गंभीर बनल्याने, शिव आर्मी शेतकरी संघटनेने आज (मंगळवारी,१३ ऑगस्ट) संगमनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात शेतकरी आपली भाकड जनावरे घेऊन सहभागी झाले होते. आंदोलकांनी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आणि नंतर थेट प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांनी भाकड जनावरे आणि वासरांच्या सरकारी खरेदीची मागणी केली आहे. सध्या अशा जनावरांची खरेदी-विक्री पूर्णपणे थांबली आहे, त्यामुळे ती शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक बोजा बनली आहेत. या जनावरांचे योग्य संगोपन करण्यासाठी सरकारने गोशाळा किंवा शासकीय केंद्र स्थापन करावीत, अशीही मागणी आंदोलकांनी केली. तसेच, शासनाकडे जमा केलेल्या जनावरांच्या बदल्यात शेतकऱ्यांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: रोटरी क्लब ऑफ संगमनेरने जालना येथे झालेल्या रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. क्लबने तब्बल सात मानाचे पुरस्कार पटकावत जिल्ह्यामध्ये आपली छाप पाडली. या सोहळ्यात क्लबचे अध्यक्ष साईनाथ साबळे यांना ‘बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पीडीजी मोहन पालेशा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. सुरेशजी साबू, निर्मला साबू, डीजी सुधीर लातूरे, रो. जयेशभाई पटेल, रो. क्षितिज झावरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील एकूण ९२ क्लबमधून रोटरी क्लब ऑफ संगमनेरची निवड झाली. क्लबला बेस्ट डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट सीपीआर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सायटेशन अवॉर्ड,…
