Author: अनंत पांगारकर
संगमनेर, दि. ६ एप्रिल – प्रतिनिधी शहरातील नामांकित डॉक्टर अमोल कर्पे यांनी एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दवाखान्याच्या टेरेसवर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. दरम्यान फरार झालेल्या डॉक्टरला पोलिसांनी नाशिकमधून ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. शहरात राम नवमी उत्सवाची धामधुम सुरू असतानाच समोर आलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून डॉ. कर्पेवर शहर पोलीस ठाण्यात बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रुग्णालयात चौकशीसाठी गेलेल्या महिला पोलीस पोलीस अधिकाऱ्याला दवाखान्यातील महिला कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार देखील घडला असल्याची माहिती समोर येत आहे. संगमनेर शहरातील कर्पे याच्या दवाखान्यात संगमनेर तालुक्याचा ग्रामीण भागातील अल्पवयीन पीडित…
रविवार, दि. ६ एप्रिल – लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे (वय ५०) यांनी शनिवारी रात्री शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. गोळी डोक्यातून आरपार गेल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर लातूरमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री सुमारे सव्वा अकरा वाजता त्यांच्या शासकीय बंगल्यावरील एका खोलीत स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली. गोळीचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी तातडीने खोलीकडे धाव घेतली, तेव्हा ते रक्तबंबाळ अवस्थेत आढळले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. हनुमंत किनीकर यांनी सांगितले की, गोळी त्यांच्या डोक्याच्या उजव्या…
पुणे, दि. ६ एप्रिल – लाचेची रक्कम स्वीकारून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (५ एप्रिल) पिंपरी न्यायालयाच्या बाहेर करण्यात आली. रेश्मा बाळू नाईकरे (वय ३२) असे लाच घेणाऱ्या महिला पोलीस शिपायाचे नाव आहे. त्या भोसरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. या प्रकरणी एका ३५ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या माहितीनुसार, त्यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे आणि त्यांची डेअरी रात्री उशिरापर्यंत सुरू राहत होती. त्यामुळे भोसरी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. हा खटला न्यायालयात न पाठवण्यासाठी आणि कोणताही दंड न आकारण्यासाठी पोलीस…
राज्यात सध्या विशेष जनसुरक्षा विधेयकाचा बोलबाला सुरू आहे. राज्याची अवस्था भिकेच्या कटोर्यासारखी असली तरी इथे जनसुरक्षेला अधिक महत्व दिलं जात आहे. कंगालीमध्ये ओरड करण्याचं साधन सामान्यांच्या हाती राहू नये, असंच सरकारला वाटत असावं. जन म्हणजे जनता असा अर्थ कोणी काढून घेऊ नये. जन म्हणजे जनतेसाठी निवडून गेलेले आणि राज्य कारभाराच्या खुर्च्या सांभाळणारे. सत्ता सांभाळणार्या या मंडळींच्या सुरक्षेच्या प्रचंड काळजीत सध्या राज्यातलं महायुतीचं सरकार आहे. रस्त्यात कोणीही अडवेल, जाब विचारेल आणि सत्ता सांभाळणार्यांना धोका उत्पन्न करेल. या धोक्यापासून वाचवायचं असेल तर जनसुरक्षा कायदा करण्याची आवश्यकता असल्याचा दावा सरकारचा आहे. जनसुरक्षा नावाच्या या कायद्याची टूम आजची नाही. लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित युती…
विशेष प्रतिनिधी / मुंबई सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा सहा वर्षानंतर निकाल लागला आहे. या प्रकरणातील चार आरोपींपैकी मुख्य आरोपी अभय कुरुंदकर यानेच अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तर कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर या दोघांचा या हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे राजू पाटील याची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र या प्रकरणात झालेल्या तपासावरही न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात नाराजी व्यक्त केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील प्रमुख आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर दुसरा आरोपी आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजू…
शिर्डी (अहमदनगर) दि. ५ एप्रिल – एकीकडे शिर्डीमध्ये रामनवमीच्या उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असताना, दुसरीकडे एका धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारातील गुंजाळवस्ती येथे अज्ञात व्यक्तींनी दोघांची निर्घृण हत्या केली आहे, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला दरोड्याच्या उद्देशाने झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेत साहेबराव भोसले (वय ६०) आणि त्यांचे पुत्र कृष्णा भोसले (वय ३०) यांचा मृत्यू झाला आहे. साहेबराव यांची पत्नी या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी घरात प्रवेश…
संगमनेर, दि. ५ एप्रिल – प्रतिनिधी छत्रपती शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शहागड किल्ल्याचे तसेच पर्यटकांचे मोठे आकर्षण असलेल्या पेमगिरी येथील विशाल वटवृक्षाच्या परिसराचा विकास करण्यासाठी मोठा निधी आणला जाईल, अशी ठोस ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील शहागडच्या विकासाचा मुद्दा आमदार अमोल खताळ यांनी नुकताच विधिमंडळात मांडून शासनाचे लक्ष वेधले. या प्रयत्नांबद्दल पेमगिरी ग्रामस्थांच्या वतीने आमदार खताळ यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात ते बोलत होते. आमदार खताळ यांनी सांगितले की, शहागड तसेच महाकाय वटवृक्षाचा समावेश पर्यटन विकास आराखड्यात करण्यासाठी आपण पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पाठपुरावा करत…
मुंबई, दि. ४ एप्रिल – विशेष प्रतिनिधी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून एका गर्भवती महिलेवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्याच्या गंभीर आरोपांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुण्यातील धर्मादाय सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून दूरध्वनी करूनही रुग्णालयाने महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिला, असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या चौकशी समितीत उपसचिव यमुना जाधव (मुख्यमंत्री सचिवालय प्रतिनिधी), सह कक्षप्रमुख तथा कक्ष अधिकारी (धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष), सर जे. जे. रुग्णालय समूह, मुंबईचे अधीक्षक हे सदस्य…
संगमनेर, दि. ४ एप्रिल – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि संगमनेर मर्चंट सहकारी बँकेवर सेवक संचालकपदाची नियुक्ती ३० दिवसांत कायदेशीर प्रक्रियेनुसार पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. जिल्हा बँक कर्मचारी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष आणि याचिकाकर्ते धनंजय भंडारे यांनी या संदर्भात माहिती दिली. उच्च न्यायालयाने नाशिक विभागाच्या सहकार खात्याच्या सहनिबंधकांना हे आदेश दिले आहेत. संघटनेने जिल्हा सहकारी बँकेवर विद्या अजय तन्वर आणि श्रीमंत घुले यांची, तर संगमनेर मर्चंट सहकारी बँकेवर वाघोबा शेलार आणि तुकाराम सांगळे यांची सेवक संचालक म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, संबंधित बँकांनी ही नियुक्ती स्वीकारण्यास टाळाटाळ केली होती. या विरोधात संघटनेने प्रथम नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे…
संगमनेर, दि. ४ एप्रिल – राज्याच्या आजी-माजी महसूलमंत्र्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या साखर कारखान्यांची पंचवार्षिक निवडणूक पुढील महिन्यात होत आहे. कारखान्यावरील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यासाठी दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी दिले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आतापर्यंतच्या दोन दिवसात केवळ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एकमेव उमेदवारी अर्ज साकुर, जोर्वे आणि सोसायटी मतदारसंघातून दाखल झाला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली…
