Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  मुंबई/संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम निधीअभावी रखडले असून, गेल्या वर्षभरापासून शासनाकडून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे स्मारकाचे स्वप्न अजूनही अपूर्णच असल्याची खंत आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी पावसाळी अधिवेशनात शासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. गेल्या वर्षी तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक तालुक्यात एक कोटी रुपये खर्चून शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर संगमनेर बस स्थानकावर स्मारकासाठी जागा निश्चित करण्यात आली आणि नगरपालिकेने निधीसाठी प्रस्तावही पाठवला. सुरुवातीला, जिल्हा नियोजन व विकास समिती (DPDC) च्या बैठकीत हा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर तालुक्यातील निमोण आणि तळेगाव परिसरातील दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या भोजापूर धरणाचे पाणी आता थेट दुष्काळी भागापर्यंत पोहोचणार आहे.  आमदार अमोल खताळ यांनी रविवारी (आज) भोजापूर धरणाचे जलपूजन केले आणि ग्रामस्थांसोबत भोजापूर पूरचारीची पाहणी केली. यामुळे अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या या भागाला आता टँकरमुक्त पाणीपुरवठा होण्याची आशा निर्माण झाली आहे. यावेळी बोलताना, आमदार खताळ यांनी विश्वास व्यक्त केला की, आता भोजापूर धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी तळेगाव आणि निमोण या दुष्काळी भागातील जनतेला त्यांच्या हक्काने मिळेल. यापूर्वी निवडणुका जवळ आल्या की केवळ टँकरने चारीमध्ये पाणी आणून दाखवले जात होते, मात्र आता ही परिस्थिती बदलणार…

Read More

नवी दिल्ली:  प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महत्त्वपूर्ण आणि उच्चस्तरीय गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून त्यांनी आपली छाप पाडली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे कायद्याच्या क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व आता संसदेत प्रतिनिधित्व करेल. ॲड. उज्ज्वल निकम यांच्यासह एकूण चार जणांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाली आहे. ॲड. निकम यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूकही लढवली होती, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आता त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत संधी मिळाली आहे. ॲड. उज्ज्वल निकम यांचे नाव १९९३ च्या मुंबई…

Read More

‘हिंदी भाषिकांना मुंबईत मारणार्‍यांनो, हिंमत असेल तर ऊर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात कुत्रा देखील वाघ असतो, कोण कुत्रा कोण वाघ स्वत:च ठरवा. महाराष्ट्राच्या बाहेर या आपटून आपटून मारू, तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? तुम्ही आमच्या पैशावर जगत आहात, तुम्ही कोणता कर भरता? कोणते उद्योग तुमच्याकडे आहेत? अशी दर्पोक्ती करणारा निशिकांत दुबे हा राज्यातल्या सरकारचा मानद जावई वाटू लागला आहे. त्याच्या या वक्तव्याने ज्याचं मस्तक भडकणार नाही, तो मराठी कसला? अनेक वर्षं महाराष्ट्रात राहणार्‍या असंख्य अमराठी तरुणांनी या मानद जावयाची चांगलीच उतरवली आहे. मराठीमध्ये मानद या पदनामाला अनन्यसाधारण महत्व आहे. एकार्थी ही व्यक्ती वर्तणुकीने कशीही असली तरी तिला दोष द्यायचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर येथील भूमिगत गटार दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या अतुल पवार आणि जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी भेट घेऊन सांत्वन केलं. या दोन्ही कुटुंबांना सरकारकडून तातडीने आणि जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन थोरात यांनी दिलं. कोल्हेवाडी रोड येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनंतर थोरात यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वास मुर्तडक, नितीन अभंग, निखिल पापडेजा, गणेश मादास, जावेद पठाण, लाला बेपारी, अंबादास आडेप, वैष्णव…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर शहरातील भूमिगत गटार दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या अतुल पवार यांच्या कुटुंबीयांना आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते ३० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी आमदार खताळ यांनी मदतीचे आश्वासन देतानाच, या घटनेतील दुसरा मृत रियाज जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांनाही शासनाच्यावतीने भरीव मदत मिळवून देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. शनिवारी आमदार खताळ यांनी मदिनानगर येथील जावेद पिंजारी आणि संजय गांधीनगरमधील रतन पवार यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.  संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ भूमिगत गटाराच्या चेंबरमधील मैला काढताना अतुल पवार याचा मृत्यू झाला, तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना रियाज पिंजारी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्तसेवा  संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर येथील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदार संघर्ष समितीने नाशिक विभागाचे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) नाशिक यांच्याकडे धाव घेतली आहे. प्रदीप भाऊसाहेब कुटे यांनी दाखल केलेला फेर-ऑडिट अर्ज (रिव्हिजन अर्ज ९७/२०२४) त्वरित फेटाळून लावण्यात यावा आणि ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवी तात्काळ परत करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील रिट याचिका क्रमांक १२६०४/२०२४ च्या अनुषंगाने हे निवेदन देण्यात आले आहे. ८१ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप आणि ठेवीदारांचे हाल ठेवीदारांनी दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल ८१ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. संस्थेचे चेअरमन, व्यवस्थापक आणि इतर २१ आरोपी या गैरव्यवहारात सामील आहे. गोरगरीब…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक धक्कादायक आणि तितकीच महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता शशिकांत शिंदे यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, पक्षाकडून यावर अधिकृत शिक्कामोर्तबही करण्यात आले आहे. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यामुळे आणि शशिकांत शिंदे यांच्या नियुक्तीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या मोठ्या संघटनात्मक बदलामुळे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गटाची ही एक महत्त्वपूर्ण रणनीती मानली जात आहे. पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा राजकीय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्तसेवा  संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील भूमिगत गटार साफसफाईच्या कामात ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे घडलेल्या दुर्घटनेत अतुल रतन पवार आणि रियाज जावेद पिंजारी या दोघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित ठेकेदारांना तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी अधिवेशनात केली आहे. तसेच, या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणीही त्यांनी केली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या अतुल पवार याच्या कुटुंबीयांना नियमानुसार शासनाकडून ३० लाख रुपये आर्थिक मदत मिळत आहे. मात्र, जीव धोक्यात घालून पवार याला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या रियाज पिंजारी याच्या कुटुंबीयांनाही शासनाने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी:  अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये कोट्यवधी रुपयांचे महाघोटाळे आणि बोगस भरती झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकारामुळे राज्य सरकारने मोठी कारवाई करत ट्रस्टचे सध्याचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली, तसेच दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांची अपसंपदा जप्त केली जाईल, असे स्पष्ट केले. देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हा मुद्दा स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत मांडला होता. लंघे यांनी उघड केले की, ट्रस्टच्या विश्वस्तांनी बनावट ॲप्स तयार करून लाखो भाविकांकडून पूजेसाठी…

Read More