Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज – पिंपरी पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक निलेश सुरेश बोडखे (वय ३८ वर्षे, पुणे) यांच्यावर तक्रारदाराकडून तीस हजार रुपये लाच मागणी केल्याप्रकरणी व मागणी दरम्यान तडजोडीअंती वीस हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराचे वाहन सोडवण्यासाठी पोलीस निरीक्षक निलेश बोडखे यांनी ३०,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, पडताळणीमध्ये बोडखे यांनी २०,०००/- रुपये लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे-मोहोळ, अपर पोलीस अधीक्षक गिरीश सराफ, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरील शास्ती कर सामान्य नागरिकांसाठी अन्यायकारक असल्याचे सांगत आमदार सत्यजीत तांबे यांनी या मुद्द्यावर विधिमंडळात आणि शासनाकडे सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या पाठपुराव्याला शासनाने काहीसा दिलासा दिला असला, तरी अनधिकृत बांधकामांवरील शास्ती कर माफीबाबत अद्याप स्पष्ट निर्णय न घेतल्याने तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सत्यजीत तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी २१ डिसेंबर २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात आणि १६ मार्च २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शास्ती कर रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच, ८ एप्रिल २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी विधिज्ञ ॲड. जगन्नाथ वामन, उपाध्यक्षपदी ॲड. प्रसाद भडांगे, महिला उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता सस्कर यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीची पुन्हा फेरनिवड करण्यात आले आहे. १५ एप्रिल, २०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वकील संघाचे कार्यकारिणी निवडण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये निवडणूक कार्यक्रम न लावता सद्यस्थितीत काम करणाऱ्या, गेल्या वर्षभरात वकिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच वकिलांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाची दखल घेत कार्यकारिणीलाच सन २०२५ ते २०२६ या वर्षांच्या कालावधीसाठी संधी देण्याचा निर्णय सर्वानुमते झाला. त्यामुळे जुन्याच कार्यकारिणीकडे नव्या वर्षासाठी ची सूत्रे सोपविण्यात आली. अध्यक्षपदासाठी ॲड. वामन, उपाध्यक्षपदी भडांगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल, तर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात असलेल्या एका अनधिकृत दर्ग्याच्या उर्वरित बांधकामावर आज पहाटेपासून अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, यात तीन ते चार पोलीस जखमी झाले असून पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अनधिकृत दर्गा ट्रस्टला आपले म्हणणे मांडण्यासाठी दिलेली मुदत आज, १५ एप्रिल रोजी संपली. यानंतर नाशिक महानगरपालिकेने (NMC) मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून उर्वरित बांधकाम तोडण्यास सुरुवात केली. यापूर्वी याच दर्ग्यावर कारवाई करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे पोलिसांनी कोणतीही अनुचित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई | विशेष प्रतिनिधी राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरीच्या नगराध्यक्षांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचे महत्त्वपूर्ण अधिकार आता थेट निवडून आलेल्या सदस्यांना मिळणार आहेत. यासंबंधीच्या महत्त्वपूर्ण तरतुदींना आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या निर्णयामुळे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा होणार आहेत. यापूर्वी, कोणत्याही नगराध्यक्षांना पदावरून दूर करायचे असल्यास, निवडून आलेल्या एकूण सदस्यांपैकी किमान पन्नास टक्के सदस्यांच्या सह्या असलेला प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाई. त्यानंतर, शासनाच्या स्तरावर या प्रस्तावावर विचार होऊन अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया पार पडत असे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही वर्षांपासून अस्थिर असलेल्या राजकीय वातावरणात आता आणखी एक नवी आघाडी उदयास येण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षांविरोधात विरोधकांची धार कमी होत असतानाच, राज्यातील तीन प्रमुख नेते – राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर – यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, या तिन्ही नेत्यांनी येत्या रविवारी पुण्यात ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’ चे आयोजन केले आहे. या परिषदेच्या माध्यमातून राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटना, बच्चू कडू यांचा ग्रामीण भागातील प्रभाव आणि महादेव जानकर यांचा ओबीसी मतदारांवरील जनाधार एकत्र येणार आहे. “खोट्या आश्वासनांना…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने दिलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील महिला मतदारांना देताना दिलेल्या आश्वासनाचा युती सरकारला पद्धतशीर विसर पडला आहे. शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या बहिणीच्या दीड हजाराच्या रक्कमेतून चक्क हजार रुपये कमी होणार आहेत. ज्या योजनेमुळे महायुती पुन्हा सत्तेत येण्यास कारणीभूत ठरली त्या योजनेलाच हात घालण्यात आल्याने राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या बहिणी चांगल्याच संतापल्या आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तर युती सरकारला बहिणींचा शाप लागेल असं म्हटलं आहे. निवडणुकीपूर्वी जर आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेत १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ, असं आश्वासन महायुतीनं दिलं होतं. मात्र, राज्यात महायुतीचं सरकार येऊन चार महिने झाले. तरीही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर सहकारातील दोन दिग्गजांच्या समेटानंतर दोन्ही कारखान्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली असून निवडीची औपचारिकता बाकी आहे तर दुसरीकडे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची वाटचाल ही बिनविरोध निवडीकडे असून उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर यासंबंधीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या तरी या निवडीमध्ये अन्य उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा अडसर असल्याचे दिसून येते. मात्र छाननीनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था सभासदांनी निवडून द्यावयाच्या गटातून बिनविरोध निवड झाली आहे. अन्य मतदार संघातून कोणाची कारखान्याच्या संचालकपदी वर्णी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) (३) अन्वये जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू केली आहे. हा आदेश आजपासून (१५ एप्रिल २०२५) ते २४ एप्रिल २०२५ पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशानुसार, जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीला शस्त्र बाळगण्यास किंवा जमाव करून फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी शस्त्र प्रदर्शन करणे, लाठ्या-काठ्या, तलवारी किंवा इतर कोणत्याही प्रकारची शस्त्रे घेऊन फिरणे कायद्याचे उल्लंघन ठरेल. तसेच, पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊन कोणताही जमाव करणे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर शहरात नुकत्याच पार पडलेल्या हनुमान जयंती उत्सवादरम्यान झालेल्या गोंधळ प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ११ आणि १२ एप्रिलला घडलेल्या या घटनांप्रकरणी १४ एप्रिलला रात्री उशिराने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक पुंडलिक गरुडकर, सौरभ रमेश उमरजी, शेखर शिवाजी सोसे, अमोल दशरथ क्षीरसागर, श्याम मधुकर नालकर, सोनू गोविंद नालकर, शुभम मनोज परदेशी, ओंकार ननवरे उर्फ चाव्या, मयूर जाधव उर्फ पप्पू, राहुल शशिकांत नेहूलकर व पियुष संतोष गोडसे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कमलाकर विश्वनाथ भालेकर (वय ६२, धंदा निवृत्त, रा. चंद्रशेखर चौक,…

Read More