Author: अनंत पांगारकर

संगमनेर, दि. ८ एप्रिल – प्रतिनिधी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीने चांगलाच वेग घेतला आहे. उद्या (९ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने आज दिवसभर इच्छुकांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत विरोधकांनी देखील सक्रिय सहभाग दर्शविला असून, विद्यमान संचालकांनीही आपले अर्ज भरले आहेत. उद्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून आणखी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, दाखल झालेल्या अर्जांची छाननी ११ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीत राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि…

Read More

संगमनेर, दि. ८ एप्रिल – प्रतिनिधी तालुक्यातील अंभोरे गावातील वीज, पाणी आणि रस्त्यांसारख्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी अंभोरे ग्रामस्थांना दिला. अंभोरे येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली. या वेळी सप्ताह समितीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी गावातील गंभीर वीज, पाणी व रस्त्यांच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. खताळ म्हणाले, अंभोरे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आपण नेहमीच तत्पर राहू. आध्यात्मिक, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील विविध विकासकामे लवकरच पूर्ण केली जातील. या कार्यक्रमाला संपत गोविंद खेमनर, अनिल शिवराम खेमनर,…

Read More

मुंबई, दि. ८ एप्रिल – प्रतिनिधी मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाच्या निर्णयांची माहिती दिली. या निर्णयांमध्ये राज्यातील विकासकामांना गती देणे, झोपडपट्टी पुनर्वसन अधिक प्रभावी करणे आणि नागरिकांच्या सोयीसाठी विविध धोरणे निश्चित करणे यावर भर देण्यात आला आहे. बैठकीतील प्रमुख निर्णय खालीलप्रमाणे… * विकास प्राधिकरणांना शासकीय जमिनी हस्तांतरित: नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणांना हस्तांतरित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळे या प्रदेशांमधील विकास कामांना मोठी चालना मिळणार आहे. (नगर विकास) * राज्याचे नवीन वाळू-रेती निर्गती धोरण जाहीर: राज्याचे वाळू-रेती निर्गती धोरण-२०२५ जाहीर करण्यात आले आहे. (महसूल) *…

Read More

पुणे, दि. ७ एप्रिल पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिघी पोलिसांनी मोशीतील एका दगडाच्या खाणीत एका व्यक्तीचा हात, पाय आणि मुंडक नसलेला मृतदेह शोधून काढला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारावर अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृतदेहाची ओळख पटली असून सीताराम ढाले असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते जेसीबी चालक होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सीताराम ढाले २९ मार्च रोजी घरातून कामासाठी निघाले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते मोशीतील दगडाच्या खाणीच्या दिशेने जाताना दिसले होते. मात्र, ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने ३१ मार्च रोजी भोसरी पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची…

Read More

संगमनेर, दि. ७ एप्रिल – विलास गुंजाळ  शिर्डीहून साईबाबांचे दर्शन घेऊन नारायणगावकडे परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला सायंकाळी सहाच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर डोळासणे उड्डाणपुलाजवळ एका ट्रकने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत नारायणगाव येथील सचिन पांडुरंग दरेकर या साईभक्ताचा जागीच मृत्यू झाला, तर आशा नागनाथ दराडे (वय ५५) आणि अश्विनी शिवाजी बोराडे (वय ४५) या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. दोघीही नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाविक (एम एच १४ जी यु २६४४) क्रमांकाच्या टेम्पोमधून शिर्डीहून दर्शनानंतर आपल्या गावी परतत होते. डोळासणे उड्डाणपुलाच्या उतारावर, रस्त्याच्या कडेला पाणी पिण्यासाठी टेम्पो थांबला असताना, नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या (एम एच १५…

Read More

मुंबई, दि. ७ एप्रिल – विशेष प्रतिनिधी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला होता. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र रिव्हॉल्वरवर अक्षयचे फिंगरप्रिन्टस आढळले नाहीत, असे फॉरेन्सिक अहवालात समोर आला होता. यानंतर आता अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. मात्र पोलिसांनी बनावट चकमकीत मुलाची हत्या केल्याचा आरोप करत अक्षय शिंदेच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर…

Read More

संगमनेर, दि. ७ एप्रिल – प्रतिनिधी  १६ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी, संगमनेरमधील प्रतिष्ठित डॉ. अमोल संताजी कर्पे (वय ४७ वर्ष) याला संगमनेरच्या अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी सोमवारी १० दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. आता पोलीस चौकशीतून या अत्याचार प्रकरणी नेमकी काय माहिती समोर येते याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. रविवारी रामनवमीच्या दिवशी पहाटे डॉ. कर्पे याने आपल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. रविवारी पहाटे सुमारे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयात आलेल्या डॉ. कर्पे याने अल्पवयीन मुलीच्या तब्येतीची विचारपूस करत…

Read More

अकोले, दि. ७ एप्रिल – प्रतिनिधी उन्हाळी हंगामातील सिंचनाचे आणि बिगर सिंचनाचे पहिले एकत्रित पाणी आवर्तन आज, सोमवारी (७ एप्रिल) सकाळी ७:३० वाजता निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे आवर्तन तब्बल २५ ते २८ दिवस सुरू राहणार आहे. भंडारदरा आणि निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून उन्हाळी पिकांसाठी पाण्याची मागणी सातत्याने होत होती. या मागणीची दखल घेत जलसंपदा विभागाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आज सकाळी १६०० क्युसेकच्या वेगाने पाणी सोडण्यात आले असून, यामुळे प्रवरा नदी दुथडी भरून वाहणार आहे. पाणी सोडतेवेळी भंडारदरा धरणात ६९३४ दशलक्ष घनफूट (दलघफू) तर निळवंडे धरणात ३३३३ दलघफू पाणीसाठा शिल्लक होता. वाढत्या…

Read More

संगमनेर, दि. ७ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेरमधील प्रतिष्ठित डॉ. अमोल कर्पे याने अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कारामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी आरोपी डॉ. अमोल कर्पे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी आज शिवसेना आणि महिला आघाडीच्यावतीने पोलीस उप अधीक्षक कुणाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर या सर्व पदाधिकारी, शिवसैनिकांनी डॉ. कर्पे याच्या रुग्णालयात जात निदर्शने केली. निवेदनात शिवसेनेने स्पष्टपणे म्हटले आहे की, संगमनेर शहर आणि तालुक्यातील आरोग्यसेवेच्या चांगल्या परंपरेला डॉ. अमोल कर्पे याच्या कृत्याने काळीमा फासला आहे. एका निष्पाप अल्पवयीन…

Read More

संगमनेर, दि. ७ एप्रिल  सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि कवी नागराज मंजुळे यांनी व्यंगचित्रांच्या सामर्थ्यावर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. ते म्हणाले, “व्यंगचित्र हे थेट आणि स्पष्टपणे समाजातील वास्तवाला लोकांसमोर मांडते. आपल्यातील त्रुटी आणि कमतरता स्वीकारायला कोणालाही आवडत नाही, परंतु व्यंगचित्र त्या नेमक्या चुकांवर बोट ठेवते. जेव्हा देशाचं आणि समाजाचं चित्र बिघडलेलं असतं, तेव्हा ते अधिक प्रभावीपणे व्यंगचित्रातून समोर येतं. त्याला कोणत्याही प्रकारचं ‘फिल्टर’ नसल्यामुळे ते अधिक परिणामकारक ठरतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आणि संपूर्ण समाजाला व्यंगचित्राची नितांत गरज आहे.” मंजुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) च्या वतीने पुण्यातील बालगंधर्व कलादालनात आयोजित ‘विवेकरेषा’ या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

Read More