Author: अनंत पांगारकर

अहिल्यानगर,  जिल्ह्याचे नवे एसपी सोमनाथ घार्गे यांनी जिल्हा पोलीस दलात फेरबदल केले असून सात पोलीस निरीक्षकांसह तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांचीदेखील बदली करण्यात आली आहे. या पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना पाठविण्यात आले आहे. एसपी घार्गे यांनी काढलेल्या आदेशामुळे आता जिल्ह्यातील शेवगाव, कर्जत, जामखेड, पाथर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर पोलीस ठाण्यांना पोलीस निरीक्षक मिळणार आहे. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ नव्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर जामखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश पाटील यांच्या देखील बदलीचे आदेश काढण्यात…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी शौचालयासाठी शेतात जाण्यावरून झालेल्या वादानंतर संगमनेर तालुक्यातील कर्जुलेपठार येथे एका महिलेची चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मयत महिलेची नणंदही गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुपाली ज्ञानदेव वाघ असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून मोनिका वाघ असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कर्जुलेपठार येथील रहिवासी अजित दादाभाऊ वाघ (वय २५) यांनी संदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या घराजवळच मुरलीधर रामकृष्ण पडवळ यांचे कुटुंब राहते. घरात शौचालय नसल्याने वाघ कुटुंबीय अनेकदा मुरलीधर पडवळ…

Read More

संगमनेर, ११ जून २०२५  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेता सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेने संगमनेरमधील काही रिक्त पदांवर नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण यांनी ही माहिती दिली. यापूर्वीची कार्यकारिणी कायम ठेवत, पक्षाच्या वरिष्ठांच्या निर्देशानुसार रिक्त झालेल्या जागांवर या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ज्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, त्यात पंकज पडवळ (युवा सेना उपजिल्हाधिकारी, ग्रामीण), लक्ष्मण सोन्नर (युवा सेना पठार भाग तालुका अधिकारी) आणि सागर भागवत (युवा सेना तालुका अधिकारी, तळेगाव भाग) यांचा समावेश आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावर अमृतवाहिनी कॉलेजजवळ आयशर टेम्पो आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतवाहिनी कॉलेज जवळ गुंजाळ शॉपीसमोर २३ मे रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. या संदर्भात मंगळवारी अवधुत धोंडीबुवा भारती (वय ३५, रा. जाधववाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. हिप्परगा, पोस्ट हाडोली बी.एस., ता. कंधार, जि. नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते २३ मे रोजी पहाटे ४ वाजता आपला आयशर टेम्पो (क्र. एमएच ०५ डीके १६२५) घेऊन नाशिक-पुणे…

Read More

मुंबई, विशेष प्रतिनिधी  अकोले व संगमनेर तालुक्यातील सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी. या दोन्ही तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढावे, यासाठी सिंचन प्रकल्प व योजनांच्या कामांचे सर्वेक्षण करून याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकोले मतदारसंघातील जलसंपदा विभागातील विकास कामे आणि संगमनेर तालुक्यातील साकुर व पठार भागातील जलनियोजन संदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता तथा सहसचिव संजीव टाटू आदी उपस्थित होते. मंत्री विखे म्हणाले,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी प्रत्येक महिलेमध्ये काहीतरी विशेष गुण असतात या गुणांचा उपयोग करून महिलांनी स्वतःला सक्षम करावे आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करावं, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी करीत महिला बचत गटांच्या माध्यमातून सर्वच महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारून आत्मनिर्भर व्हावे, अस आवाहन केलं. संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक पेमगिरी येथील महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात, वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित ‘उत्सव माझ्या कुंकवाचा वटसावित्री पौर्णिमेचा’ या विशेष महिला कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जाकमत बाबा तरुण मित्र मंडळ आणि संगमनेर तालुका महायुती महिला आघाडी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल खताळ यांच्या मातोश्री मंगल…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत संगमनेर तालुक्यात यंदाच्या वटसावित्री पौर्णिमेला तालुक्यातील १७१ गावे, २५८ वाड्या आणि विविध वस्त्यांवरील महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात २५२५ वटवृक्षांचे रोपण आणि पूजन केले. या उपक्रमातून त्यांनी केवळ वटपौर्णिमा साजरी केली नाही, तर वृक्षसंवर्धनाचा एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, दंडकारण्य अभियान समिती आणि अमृत उद्योग समूह यांच्या सहकार्याने हे अभियान एका लोकचळवळीत रूपांतरित झाले आहे. प्रकल्पप्रमुख दुर्गाताई तांबे आणि कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली, यावर्षी महिलांनी लावलेल्या या वटवृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यात जिल्हा आणि सत्र न्यायालयातील मान्यवर न्यायाधीश, सरकारी वकील आणि वकील संघाचे पदाधिकारी तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या आदर्शांना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश दिलीपराव घुमरे आणि जिल्हा न्यायाधीश नेर्लेकर यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि दूरदृष्टीचे महत्त्व विषद केले. त्यांनी महाराजांचे न्याय आणि सुशासनाचे आदर्श अधोरेखित केले. यावेळी सहाय्यक सरकारी अभियोक्ता मच्छिंद्र गवते, संगमनेर वकील संघाचे अध्यक्ष जगन्नाथ वामन, ज्येष्ठ वकील…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर शहरात गोवंश हत्या सातत्याने सुरू असून, वेळोवेळी हे प्रकार उघडकीस येत असतानाही यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने सलग दोन दिवस बेकायदेशीर कत्तलखान्यांवर टाकलेल्या छाप्यात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलिसांनी १७ गुन्हे दाखल करत ७३ गोवंश जनावरांना कत्तलीपासून वाचवल्याचे सांगितले. कसायांवर केवळ कागदोपत्री गुन्हे दाखल होत असल्याने व ठोस कारवाई होत नसल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आली आहे. या गंभीर विषयावर यापूर्वी आक्रमक भूमिका घेणारे हिंदुत्ववादी नेते आणि संघटना तसेच सुरुवातीला कत्तलखान्यांविरोधात संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी थेट भूमिका घेतल्यानंतर काही कसायांचे वाडे पाडण्यात आले मात्र, त्यानंतर देखील हा व्यवसाय पूर्ववत सुरू…

Read More

मुंबई:  रविवारी सकाळी एका ६० वर्षीय पतीने पत्नीची गोळी झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. राजमनोहर नम्पेली (६०) आणि त्यांची पत्नी लता नम्पेली (५५) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना वरळीतील सिद्धार्थनगर परिसरात घडली. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना गोळीबाराची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना हे वृद्ध दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजमनोहर यांनी पहाटे साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान झोपेत असलेल्या पत्नी लता यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर त्यांनी स्वतःवरही गोळी झाडून घेतली. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेवेळी…

Read More