Author: अनंत पांगारकर
रविवार, दि. ९ फेब्रुवारी – दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या तळीरामाला पुण्याच्या शिवाजीनगर मोटर वाहन न्यायालयाने कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. ३ ऑगस्ट २०२४ रोजी कोथरुड वाहतूक विभागाने रब्बीन रमजान शेख (वय २९, रा. जनवाडी, पुणे) याच्या विरोधात दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी मोटार वाहन कायद्यान्वये खटला दाखल केला होता. बुधवारी (५ फेब्रुवारी) या खटल्याचा शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयातील न्यायाधीश बिराजदार यांनी निवाडा केला. न्यायालयाने शेख याला ५ दिवसांची साधी कैद आणि २० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्याच्या मुहुर्तावर पक्ष प्रमुख राज यांनी राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ सांगून टाकला. राज हे हजरजबाबी असल्याने त्यांच्या म्हणण्याला जरूर अर्थ असतो. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात निर्माण झालेल्या सन्नाट्याने निकालाचं सार सांगून टाकलं. निकाल किती योग्य आणि किती अयोग्य, याचे पाढे वाचले गेले. ज्यांना अपेक्षा नव्हती ते केवळ निवडूनच आले असं नाही तर त्यांना मिळालेली मतं ही अनपेक्षितच होती. अशा विजयाचा सोहळा कोणी साजरा करत नसतो. यामुळेच प्रचंड विजय होऊनही भाजप आणि त्यांच्या युती सरकारमधल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मौनात सोहळा साजरा केला. यापूर्वी असं कधी झालं नाही. अगदी एक दोन अतिरिक्त जागा मिळाल्या तरी आनंदाला पारावार…
विशेष प्रतिनिधी / नवी दिल्ली दिल्ली विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल समोर आला आहे. गेल्या ३ विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाला भरभरुन मतदान केलं. पण त्याच दिल्लीकरांनी आता भाजपच्या झोळीत मतांचं दान टाकलं. भाजप आणि आपमध्ये थेट निवडणूक झाली. पण या सगळ्यात खरा गेम काँग्रेसनं केला. २०१५, २०२० आणि आता २०२५, अशा सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला दिल्लीत भोपळाही फोडता आलेला नाही. पण या निवडणुकीत त्यांनी अरविंद केजरीवालांच्या आपचं मोठं नुकसान केलं. दिल्ली विधानसभेत एकूण ७० जागा आहेत. पैकी ४८ जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे. तर आपने २२ जागांवर विजय नोंदवत एका मतदारसंघात आघाडी राखली आहे. काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही.…
शनिवार, दि. ०८ फेब्रुवारी – सोन्याच्या कारखान्यात घडविलेले सुमारे वीस लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन दागिन्याच्या दुकानात जात असताना कर्मचाऱ्यांच्या हातातील पिशवी हिसकावत पसार झालेल्या दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, चिरंजीत अंबिका बाग हे अभिजीत दास यांच्या ‘अभिजीत गोल्ड’ या सोन्याच्या कारखान्यात कामाला आहे. कारखान्यात घडवलेले १९ लाख ९४ हजार १०० रुपये किमतीचे २५५ ग्रॅम वजनाचे दागिने एका तांबड्या रंगाच्या पिशवीत घेऊन ते गुरुवारी पुण्याच्या मोती चौकातील पीपीएमएस गोल्ड येथे पायी घेऊन जात होते. मोती चौका जवळील पुष्पम गोल्ड या दुकानासमोर फुटपाथवरून जाताना त्यांच्याजवळ आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांना पत्ता विचारण्याचा बहाना केला. त्याच…
शनिवार, दि. ०८ फेब्रुवारी – संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने शिर्डी येथे आपल्या राहत्या घराच्या बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली. जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर शिर्डीच्या साईनाथ सुपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. गणेश वाळके असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. वाळके यापूर्वी शिर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सध्या ते संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असून शिर्डीतील भन्साळी स्क्वेअर इमारतीत राहत होते. या राहत्या घराच्या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत वाळके यांना शिर्डीच्या श्री साईनाथ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये…
मुंबई, दि. ०८ : मराठी भाषा विभागाअंतर्गत २०२४ करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर करण्यात आला आहे. नामवंत प्रकाशन संस्थेसाठी २०२४ चा श्री. पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे या संस्थेला, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ हा डॉ. रमेश सिताराम सुर्यवंशी यांना आणि मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार २०२४ हा श्रीमती भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रूपये १० लाख असे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. नामवंत प्रकाशन संस्था पुरस्कार- मानपत्र, सन्माचिन्ह व रूपये ५ लाख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर भाषा अभ्यासक आणि भाषा संवर्धन पुरस्कार-…
शुक्रवार, दि. ०७ फेब्रुवारी – संगमनेर तालुक्यातील रहिवासी असलेल्या आणि पुणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात टायगर पॉईंट येथे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. अण्णा उर्फ अनिल बादशहा गुंजाळ असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक असलेले अण्णा गुंजाळ हे गेल्या दोन वर्षापासून पुण्यातील खडकी पोलीस ठाण्याच्या तपास पथकामध्ये कार्यरत होते. गेल्या तीन दिवसांपासून ते कर्तव्यावर नव्हते. वारंवार त्यांना संपर्क करून देखील कुटुंबीयांचा त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत…
संगमनेर दि. ०७ फेब्रुवारी – संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये गुरुवारी झालेल्या लिलावामध्ये कांद्याला २८५१ रुपयांचा भाव मिळाला. याशिवाय बाजार समितीमध्ये १५०० ग्रेट टोमॅटो आवक झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संगमनेर तालुक्यासह शेजारच्या तालुक्यातून एक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीसाठी आणला होता. बाजार समितीमध्ये ११,६७८ कांदा कोणाची आवक झाली. झालेल्या लिलावामध्ये प्रतिक्विंटलला प्रतिवारीनुसार मिळालेला भाव पुढील प्रमाणे… सुपर गोळा माल – २९११ ते ३०११, एक नंबर कांदा – २४०० ते २८५१, दोन नंबर कांदा – १८०० ते २२०१, तीन नंबर कांदा – ५०० ते १६०० रुपये. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी…
शुक्रवार, दि. ०७ फेब्रुवारी – बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस झांबड शोध घेत होते. अजिंठा बँक गैरव्यवहार प्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. २१ जानेवारीला न्यायालयाने झांबड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते पोलिसांना शरण आले. जामीन मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर त्यांनी अखेरीस पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी आज त्यांना अटक केली आहे. २००६ ते २०२३ या दरम्यान अजिंठा अर्बन बँकेत ९७ कोटी ४१ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर याप्रकरणी माजी आमदार सुभाष झांबड यांच्यावर छत्रपती संभाजी नगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात…
शिवपाणंद व शेत रस्त्यांची कामे दर्जेदार करा ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करणार पाणंद रस्त्यांची प्रलंबित प्रकरणे महिनाभरात निकाली काढणार मोजणीसह पोलीस संरक्षणासाठीची फी बंद करणार मुंबई, दि. ०७ : राज्यातील सर्वच शिवपाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररीत्या पूर्ण करावी, अशी सूचना देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. शिवपाणंद आणि शेत रस्ते समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे या…
