Author: अनंत पांगारकर
संगमनेर दि. १८ फेब्रुवारी – वेळेत आपल्या कामात सुधारणा करा नाहीतर बदल्या करून घ्या, माझ्या मतदारसंघात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा महावितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा देत येथून पुढे जर विजेचे रोहित्र जळाले तर ग्रामस्थांनी वर्गणी काढायची नाही तसेच तीन दिवसाच्या आत अधिकाऱ्यांनी वीज रोहित्र उपलब्ध करून देण्याचे निर्देश संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. पठार भागातील साकुर उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या साकुर, मांडवे, कर्जुले पठार, डोळसणे, घारगाव, खांबे या महावितरणच्या उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांची आढावा बैठक खताळ यांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडली. या बैठकीत ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभाराविरोधातील तक्रारींचा पाढाच आमदार खताळ यांच्यासमोर मांडला. यावेळी बाबासाहेब…
मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी – नव्या कायद्याअंतर्गत ज्ञानेश कुमार यांची भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. ते सध्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची जागा घेतील. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या केंद्रीय निवडणूक आयोगातील कार्यकाळाला एक वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांना बढती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निवृत्तीनंतर त्यांना १४ मार्च २०२४ ला लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून घेण्यात आलं होतं. ज्ञानेश कुमार यांनी १४ मार्चला पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ मार्चला लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. ज्ञानेश कुमार हे १९८८ बॅचचे केरळ कॅडरचे…
संगमनेर, दि. १७ फेब्रुवारी – अनेक गावांसाठी गैरसोयीच्या ठरणाऱ्या आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालयाचा वाद चांगलाच पेटला आहे. तालुक्याचा विकास रोखण्यासाठी व तालुक्याची तोडफोड करण्यासाठी सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी कुटील डाव करत आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय नियोजित केले आहे. हा अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करावा अन्यथा तालुका पेटून उठेल, असा आक्रमक इशारा कृती समितीने निवेदन देत प्रशासनाला दिला आहे. सोमवारी (१७ फेब्रुवारी) नव्याने होऊ घातलेल्या आश्वी बुद्रुक अपर तहसील कार्यालयात समाविष्ट करण्यात येणाऱ्या ६२ गावांच्या प्रतिनिधींनी तहसीलदार धीरज मांजरे यांच्या कार्यालयासमोर ‘जबाब दो’ म्हणत आंदोलन केले. यावेळी आर. बी. राहणे, भाऊराव रहाणे, शांताराम कढणे, सुभाष गुंजाळ, अरुण गुंजाळ, सिताराम…
अहिल्यानगर, दि. १७ – जिल्हा नियोजन समितीने डॉ. झाकिर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना २०२४-२५ अंतर्गत मदरशांमध्ये मूलभूत आणि आधुनिक सुविधा पुरवण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत. इच्छुक मदरशांनी २२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा डॉ. झाकिर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेचे सदस्य सचिव दीपक दातीर यांनी केले आहे. मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरशांना मिळेल. एसपीक्यूईएम या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळणाऱ्या मदरशांना ही योजना लागू राहणार नाही. मदरशांमध्ये विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी व इंग्रजी इत्यादी विषयांचा अभ्यासक्रम राज्यशासनाच्या अन्य शाळांप्रमाणे राहील. तसेच, शिक्षकांचे प्रतिदिन ५ तासिका याप्रमाणे…
मुंबई, दि. १७ फेब्रुवारी – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा उद्या मंगळवारी (१८ फेब्रुवारी) मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी १ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळ हे नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतील. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व कम्युनिकेशन विभागाचे चेअरमन पवन खेरा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगडी प्रदेश कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग…
संगमनेर – आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये झालेल्या “आय लव संगमनेर चळवळ” अंतर्गत युथोत्सव नोकरी मेळाव्यात जिल्हाभरातून ७२९० तरुणांनी सहभाग नोंदवला. या नोकरी मेळाव्यात सहभागी झालेल्या ९१ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधून २०१९ विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड झाली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात आय लव संगमनेर लोक चळवळीच्यावतीने आयोजित युथोत्सव नोकरी मेळावा रविवारी पार पडला. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आयोजक आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, हर्ष मालपाणी, प्रज्वल भळगट, किरण रहाणे आदींसह विविध कंपन्यांचे एच आर मॅनेजर यावेळी उपस्थित होते. या नोकरी मेळाव्यात, कॅम्पस इंटरव्यू, रोजगार, व्यवसाय मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती असे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगमनेर…
संगमनेर, दि. १६ फेब्रुवारी – प्रतिनिधी अन्न व औषध प्रशासनाच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या संगमनेर मधील जोशी स्वीट होम वरील कारवाई टाळण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या युवा नेत्यामार्फत प्रशासनातील अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचे बोलले जात आहे.कच्चा आणि शिळा मिठ्ठावडा ग्राहकाला देऊन त्याच्याशी वाद घातल्याचा प्रकरणाचा व्हिडिओ मध्यंतरी समाज माध्यमात व्हायरल झाला होता. त्यानंतर संगमनेर मधील जोशी स्वीट होम चर्चेत आले होते. जोशी स्वीट होम मधील मिठाईसह अन्नपदार्थाची तपासणी अन्न व औषध प्रशासनाचा अधिकाऱ्यांनी केली होती. तपासणी दरम्यान काही नमुनेही ताब्यात घेण्यात आले होते. या तपासणीत काही गंभीर बाबी आढळून आल्याचा अहवाल समोर आला आहे. त्यानंतर अन्न व औषध…
संगमनेर, दि. १६ फेब्रुवारी – प्रतिनिधी संगमनेरकर नागरिकांनी मालमत्ता व पाणीपट्टी कराचा वेळेत भरणा करण्याचे तसेच कारवाई टाळण्याचे आवाहन संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांनी केले आहे. कोकरे म्हणाले, संभाव्य कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे. मार्च महिना जवळ येत असल्याने मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या थकीत बिलांच्या वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी मालिकेतील विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाद्वारे विशेष वसुली अभियानांतर्गत शहरातील मालमत्ता व पाणीपट्टी करायची ज्या थकबाकीदारांकडे थकबाकी आहे अशा थकबाकीदारांवर नळ जोडणे तोडण्याची, मालमत्ता जप्तीची, थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची तसेच शहरातील विविध भागात…
अहिल्यानगर दि. १६ – महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक खासगी दवाखान्यातून रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व खासगी दवाखाने दोन्ही योजनांशी संलग्नित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालये संलग्नित करण्यासाठी खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधी समवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. अभिलाषा खरसडे, डॉ. अनिकेत भालसिंग, जिल्हा समन्वयक रोहित कारंडे, विठ्ठल वांढेकर, हर्षल साळवे, शरद कोंडा आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी…
नवी दिल्ली – नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री दहा वाजता झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला असून १० लोक जखमी झाले आहे. शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १४, १५ व १६ वर भाविक प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी ही दुर्दैवी दुर्घटना घडली. त्यामुळे महाकुंभला जाण्याची अनेकांची इच्छा अपूर्ण राहिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात तीन मुलांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १० जण जखमी आहेत. महाकुंभला जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या उशीरा धावत असल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक १४, १५ व १६ वर मोठी गर्दी होती.…
