Author: अनंत पांगारकर
शिर्डी दि. ३ फेब्रुवारी – शिर्डीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांचे प्रमाण खूप वाढले आहे. आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तासाच्या आत शिर्डीत साई संस्थांच्या दोन तरुण कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने भोसकून निर्घृणपणे संपवल्याची घटना घडली आहे. तर तिसऱ्या घटनेतील गंभीर जखमी असलेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सोमवारी पहाटे तीन वेगवेगळ्या ठिकाणी साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांसह एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार घडल्याने साईबाबांची शिर्डी या गुन्हेगारी कृत्यामुळे हादरून गेली आहे. या घटनेत सुभाष साहेबराव घोडे, नितीन कृष्णा शेजुळ या दोन साई संस्थान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून कृष्णा देहरकर हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर…
अहिल्यानगर दि. ३ फेब्रुवारी – महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांसोबत हुज्जत घालणं दोन पैलवानांना चांगलेच महागात पडलं आहे. महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यावर कुस्ती परिषदेकडून कारवाई करण्यात आली आहे. दोघांनाही तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली. शिवराज राक्षेने पंचांचा निर्णय पटला नाही म्हणून त्यांच्यासोबत हुज्जत घातली होती. पंचांची कॉलर पकडून त्यांना लाथ देखील मारली. हेच कृत्य शिवराज राक्षेला महागात पडलं ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती किताबाच्या स्पर्धेत महत्त्वाच्या सामन्यांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. उपांत्य सामन्यात पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारत शिवीगाळ केली. यानंतर अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाड याने पंचांच्या निर्णयाविरोधात…
संगमनेर दि. २ फेब्रुवारी – शनिवारी सायंकाळी वॉकिंग करून घराकडे परतणाऱ्या महिला शिक्षिकेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघा चोरट्यांनी हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. दागिने चोरांचा तपास लावण्यात संगमनेर पोलीस अपयशी ठरल्याने चोरांची मजल वाढली असून आता चोरटे दिवसाढवळ्या गुन्हे करू लागले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात शनिवारी रात्री संबंधित महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस स्थानकासह शहराच्या विविध भागात दागिने चोर, घरफोड्या करणाऱ्यांनी, दुचाकी चोरांनी उच्छाद मांडला आहे. या चोरट्यांना पकडण्यात संगमनेर पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. चोरीच्या गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याने गुन्हेगार…
संगमनेर दि. २ फेब्रुवारी – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही कर्तुत्वान माणसे असतात. कर्तुत्वाला भाषेची गरज नसून प्रामाणिकपणे कष्ट करा. कारण फसवून मिळालेले यश हे आयुष्यभर अपमान करत असते. नम्रतेने जग जिंकता येते, असे सांगताना अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने गुणवत्तेबरोबर परिपूर्ण विद्यार्थी घडवले असल्याचे गौरवोद्गार, लेखक तथा उद्योजक शरद तांदळे यांनी काढले आहे. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर विश्वस्त डॉ सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख, ॲड. आर. बी.सोनवणे, लक्ष्मणराव कुटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मेधाचे समन्वयक प्राचार्य डॉ. एम. ए.…
संगमनेर दि. २ फेब्रुवारी – प्रख्यात लेखक असलेल्या शरद तांदळे यांनी आज रामाच्या काळात ‘रावण राजा राक्षसांचा’ कादंबरी लिहिली आहे. आगामी बळी या पुस्तकाचे ते लेखन करत असून ‘बळी’देखील क्रांतिकारक पुस्तक असेल असा विश्वास राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त करत मेधा महोत्सवाच्या आनंद पर्वाचे सुरुवात झाल्याची घोषणा केली. संगमनेर मध्ये रविवारी अमृतवाहिनी कॉलेजच्या प्रांगणात बहुचर्चित ठरलेल्या मेधा महोत्सव २०२५ ला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. मेधा महोत्सवाचे पहिले पुष्प प्रख्यात लेखक, मेकॅनिकल इंजिनियर असलेले उद्योजक शरद तांदळे यांनी गुंफले. यावेळी थोरात यांच्यासह माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य…
संगमनेर दि. २ फेब्रुवारी – प्रत्येक तरुणांमध्ये काही सुप्त गुण दडलेले असतात. सुप्त गुणांच्या रूपाने प्रत्येकामध्ये दडलेला हा राजहंस आपल्याला माहित नसतो. त्यामुळे बऱ्याचदा तो माहिती करून देण्यासाठी मेधा महोत्सवाचा खूप उपयोग होत असतो. असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार व जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे यांनी केले. संगमनेरमध्ये रविवारी दोन दिवस चालणाऱ्या आणि तरुण-तरुणींसाठी आकर्षण ठरलेल्या मेधा महोत्सव २०२५ ला प्रारंभ झाला. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात अध्यक्षस्थानी होते. प्रख्यात उद्योजक व लेखक शरद तांदळे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त शरयू देशमुख आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉ. तांबे म्हणाले, अनेक दिवस ज्या उत्सव,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक दि. – २ रविवारी पहाटे नाशिक-गुजरात महामार्गावरील सापुतारा घाटामध्ये खासगी लक्झरी बस दोनशे फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज (रविवार) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून यात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १५ जण गंभीर जखमी असून ४२ प्रवासी किरकोळ जखमी आहेत. तसेच हा अपघात इतका भीषण होता की बस दरीत कोसळल्याने बसचे दोन तुकडे झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु असून जखमींना रुग्णालयात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नितेश राणे यांना महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय व बंदरे यामध्ये खूप काम करण्याचा वाव आहे. ज्या विभागाचे मंत्रीपद मिळाले आहे तिथे कामगिरी करून दाखवा. नको त्या भानगडीत पडण्यापेक्षा त्यावर लक्ष दिले तर उत्तम होईल. अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी भाजपाचे मंत्री नितेश राणे यांना सुनावले आहेत. मंत्री राणे यांनी ‘परीक्षेला बसताना बुरख्यावर बंदी आणावी, त्याने कॉपी करण्याचे प्रमाण कमी होईल’, अशी हास्यास्पद मागणी केली होती. मात्र राणे यांची ही मागणी फेटाळत राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सामाजिक भान राखले असल्याचे सांगत रूपवते यांनी हे सरकार जाणीवपूर्वक दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न…
शहाणा होईल तो माणूस कसला, अशी बोली म्हण आहे. मरणासाठी तो कुठल्याही संकटाची तमा बाळगत नसतो. वाईच्या मांढरादेवीच्या गडावर घसरून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संकटाची तमा जे बाळगत नाहीत, त्यांना काही सांगून डोकं चालवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. याने मरण आलंच तर आदळआपट करायची आणि गप्प बसायचं. प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभ मेळ्यात चेंगरून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या प्रति असंच म्हणता येईल. सारासार विचार करणारा माणूस तिथे मरायला जाणार नाही. ज्याला श्रध्देचं ठिकाण मानलं जातं तिथेच अशा घटना घडतात. मात्र श्रध्दा म्हणून कोणी कोणाला वाचवायला येत नाही. पवित्र स्नान केल्याने पापं धुवून निघतात आणि मोक्ष मिळतो, असं मानायच्या ठिकाणी ३० जण मोक्षाला गेले. असा मोक्ष…
अहिल्यानगर दि. १ – जिल्ह्यातील १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जिल्हा प्रशासनाकडे रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहे. या रुग्णवाहिकांचे वाटप राज्याचे जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी (१ फेब्रुवारी) करण्यात आले. यांची होती उपस्थिती… जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार मोनिका राजळे, अमोल खताळ, विठ्ठल लंघे, काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते. १९ रुग्णवाहिका… अहिल्यानगर जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत एकुण ११५ प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर असून त्यापैकी १०२ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत…
