Author: अनंत पांगारकर
गुरूवार दि. २९ ऑगस्ट २०२४ मेष – अचानक धनलाभाचे योग. परंतु आज खिसा, पाकीट सांभाळा. आर्थिक फसवणुक होण्याची शक्यता. वृषभ – अतिशय यशस्वी दिवस. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. संततीमुळे आज मानहानी संभवते. मिथुन – महादेवाची उपासना लाभदायक होईल. वाहन सांभाळून चालवा. कर्क – आजचा दिवस कटकटीचा असेल. पाकीटासह महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. सिंह – आपली हुशारी व आपल्या समय सूचकतेनुसार आजच्या दिवसाचे आर्थिक नियोजन यशस्वी कराल. कन्या – गणेशाची आराधना करा. दिवस आनंदात जाईल. पोटदुखीने हैराण व्हाल. तूळ – आनंदी व लाभदायक दिवस. आईकडील नातलग भेटण्याचा दिवस. वृश्चिक – भाग्यशाली दिवस. आज जे मागाल ते मिळण्याचा दिवस. प्रेमी युवकांसाठी भाग्यशाली दिवस.…
बुधवार, २८ ऑगस्ट अहमदनगर जिल्हा माहिती अधिकारी या पदाचा कार्यभार डॉ. किरण मोघे यांनी आज बुधवारी स्वीकारला. डॉ. किरण मोघे हे अहमदनगर येथे रूजू होण्यापूर्वी पुणे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून २०२१ पासून कार्यरत होते. त्यांच्या जागेवर अहमदनगरचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर यांची बदली झाली आहे. अहमदनगर जिल्हा माहिती अधिकारी पदावर रूजू झाल्यावर त्यांचे शिर्डी उपमाहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने संतोष गुजर, धनंजय जगताप, सुरज लचके, प्रविण मुठे, चिंतादेवी जयस्वार यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. मोघे यांनी यापूर्वी नांदेड, रत्नागिरी, नाशिक, नंदुरबार येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून आणि मुख्यमंत्री सचिवालयात माहिती…
बुधवार, २८ ऑगस्ट अवैध धंद्यासाठी बहुचर्चित असलेल्या शक्तिमान टॉवरचा अखेर संगमनेर शहर पोलिसांना पत्ता सापडला असून पोलिसांच्या डिटेक्शन ब्रांचच्या (डीबी) कर्मचाऱ्यांनी येथील एका गाळ्यात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर सोमवारी साडेसहा वाजता छापा टाकला. कल्याण मटक्याचे आकडे घेणाऱ्या एकाला पोलीस पथकाने पकडत त्याच्यावर कारवाई केली, मात्र याचवेळी येथे सुरू असलेल्या अन्य अवैध धंद्यांकडे पोलीस पथकाने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. राज्यात सुसंस्कृत म्हणून पुढे येत असलेल्या संगमनेरला गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांचा कलंक लागला असून गल्लोगल्ली हे धंदे राजरोसपणे रस्त्यांवर सुरू आहे. पोलिसांसह अन्य संबंधित सर्वच विभागांचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये राजकीय पक्षाचे पदाधिकारी…
बेजबाबदार शासनाला जनतेने शिक्षा द्यावी – माजी आमदार डॉ. तांबे मालवणची घटना दुर्दैवी व वेदनादायी – डॉ. जयश्री थोरात बुधवार, २८ ऑगस्ट संगमनेर – महाराष्ट्रासह देशवासीयांची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा रत्नागिरी समुद्रकिनाऱ्यावरील पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळल्याने राज्यभरात भ्रष्ट सरकार विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे. बुधवारी संगमनेरमध्ये देखील महाविकास आघाडीच्यावतीने निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. प्रांताधिकार्यांना या संदर्भातील निवेदन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. संगमनेरकर नागरिक, शिवप्रेमी आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा यात समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जमलेले सर्वजण भ्रष्ट भाजप सरकार विरोधात घोषणा देत प्रांताधिकारी कार्यालयात आले होते.…
बुधवार, २८ ऑगस्ट शाळेत विद्यार्थिनी गैरवर्तन केल्याप्रकरणी चार महिन्यांपूर्वी न्यायालयात आरोप सिद्ध झालेल्या प्राथमिक शिक्षकाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर सेवेतून बडतर्फ केले आहे. मदन रंगनाथ दिवे असे कारवाई झालेल्या या प्राथमिक शिक्षकाचे नाव आहे. डिसेंबर २०२२ मध्ये राहुरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेवर उपाध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या शाळेतील विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दिवे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३५४(अ), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात शिक्षक दिवे याला पोलिसांनी अटक देखील केली होती. त्यामुळे संबंधित शिक्षकावर जिल्हा परिषदेने निलंबनाची कारवाई केली होती. न्यायालयीन खटल्या दरम्यान…
बुधवार, २८ ऑगस्ट गोविंदा पथकांच्या पाठीशी हे शासन नेहमीच खंबीरपणे उभे आहे आणि यापुढेही राहील. शासनाकडून गोविंदांसाठी जे-जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल. ‘लाडक्या बहिणी’ प्रमाणेच ‘सुरक्षित बहीण’ ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे, शासनाने ही जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली आहे. हे शासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, पूर्वेश सरनाईक, संस्कृती युवा प्रतिष्ठानचे इतर सर्व पदाधिकारी, विविध गोविंदा पथके व गोविंदाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हा खेळ पाहून आम्हालाही आमचे…
बुधवार, २८ ऑगस्ट विश्व हिंदू परिषद हीरक महोत्सवानिमित्त बजरंग दलाच्यावतीने संगमनेरमध्ये भव्य हिंदू संमेलनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेस यावर्षी साठ वर्षे पूर्ण होत आहे भारतासह संपूर्ण विश्वातील हिंदूंची सेवा सुरक्षा व संस्कार करणे हे ध्येय समोर ठेवून विश्व हिंदू परिषद अखंड कार्य करीत आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी आंदोलन, न्यायालयीन लढा आणि मंदिराच्या निर्माण पर्यन्त चे नेतृत्व विश्व हिंदू परिषदेने केले आहे. अनेक मोठमोठ्या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेने यशस्वीपणे आपली भूमिका घेतली आहे. आणि यापुढेही हिंदू हिताचे कार्य अखंडितपणे चालू राहणारच आहे. रविवारी (१ सप्टेंबर) सकाळी दहा वाजता नाशिक-पुणे मार्गावरील शेती…
मंगळवार, २७ ऑगस्ट पुणे : धडापासून हातपाय वेगळे केलेल्या आणि शिरच्छेद झालेला अवस्थेत पुण्याच्या खराडी भागात नदीपात्रात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. १८ ते २० या वयोगटातील असलेल्या या तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. तरुणीची ओळख पटविण्याचे आणि आरोपीचा शोध घेण्याचे काम चंदननगर पोलिसांनी सुरू केले आहे. खराडी परिसरात जेनी लाइट कन्स्ट्रक्शनकडून इमारतीचे काम सुरू आहे. नदीपात्रात एका तरुणीचा मृतदेह वाहून आल्याचे बांधकाम मजुरांनी पाहिले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता हा मृतदेह एका तरुणीचा असल्याचं दिसून आलं. तरुणीची ओळख पटू नये म्हणून शिर धडावेगळे करण्यात आले…
बुधवार, २८ ऑगस्ट संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाला उच्चांकी ७१०१ रुपयांचा भाव मिळाला आहे. तर कांद्याला ४१०१ रुपयापर्यंत भाव मिळाला. यामुळे डाळिंब आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ आणि अध्यक्ष शंकरराव खेमनर यांनी म्हटले आहे. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डमध्ये मंगळवारी (२७ ऑगस्ट) डाळिंबाला चांगला भाव मिळाला. एक नंबर डाळिंबास २५१ ते ३५० रुपये प्रति किलो, दोन नंबर डाळिंबास १५१ ते २०० रुपये प्रति किलो, तीन नंबर डाळिंबास ८० ते १०० रुपये प्रति किलो असा बाजारभाव मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५२८१ कांदा गोण्यांची आवक…
जाणून घ्या… आजचे राशीभविष्य बुधवार दि. २८ ऑगस्ट २०२४ मेष – आज आपल्यावर आलेल्या संकटात भावाची मोलाची मदत मिळेल. आपल्या संततीमुळे आज आपला मान सन्मान वाढेल. वृषभ – आपल्या राशीमध्ये असलेला राजयोग आज आपल्याला प्रकर्षाने जाणवेल. जोडीदाराकडून आर्थिक मदत मिळेल. मिथुन – अतिशय खर्चिक दिवस. आज स्वभाव चिडचिडा बनेल. स्वभावावर नियंत्रण ठेवा. कर्क – आज संततीसाठी किंवा संततीकडून अतिशय पैसा खर्च केला जाईल. आज आपलं भाग्य आपल्याला साथ देणार नाही. सिंह – आज तब्येत साथ देणार नाही. साथीच्या आजारामुळे वैतागून जाल. आज आराम करा. कन्या – लाभस्थानी असलेला राशी स्वामी बुध आज शेअर मार्केटमध्ये लाभ मिळवून देण्याची शक्यता. तूळ -…
