Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज चंद्रपूर : चंद्रपूरचे काँग्रेस खासदार सुरेश तथा बाळू धानोरकर (वय 47 वर्ष) यांचे नवी दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. धानोरकर राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार होते. चारच दिवसांपूर्वी त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. वडिलांपाठोपाठ चार दिवसांनी मुलाचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पिता पुत्राच्या लागोपाठ झालेल्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धानोरकर यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर आणि दोन मुले असा परिवार आहे. प्रकृती अस्वस्थामुळे भद्रावती येथे झालेल्या वडिलांच्या अंतिम संस्काराला बाळू धानोरकर उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे वडिलांचे अंतिम विधी धानोरकर यांचे भाऊ अनिल यांनी केले होते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर / शिर्डी :- निळवंडे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कालव्याची कामे ठेकेदारांनी निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. मात्र कामामध्ये जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सलग दुसऱ्या दिवशी राहाता आणि संगमनेर तालुक्यातील निळवंडे कालव्यांच्या कामांची सोमवारी पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी, मनोली, घुलेवाडी, कुरण, खांजापूर, निळवंडे, कौठे कमळेश्वर, गोगलगाव, आडगाव, मापारवाडी, लोणी खुर्द, बाभळेश्वर, पिंप्री निर्मळ, वाकडी आदी गावात कालव्यांच्या सुरू असलेल्या…

Read More

वाळू वाहतुकीकरिता खुली परवानगी देणार मोदी आवास योजनेअंतर्गत मागील त्याला घरकुल देणार वाळू तस्करांना पाठीशी घालणारे महसूल पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार महाराष्ट्र संवाद न्यूज पुणतांबे :- वाळू धोरणात सुटसुटीतपणा आणून वाळू वाहतूकीकरिता खूली परवानगी देण्यात येईल. ओबीसी समाजाच्या घरकुलासाठी मोदी आवास योजना केंद्र शासन आणत आहे‌, यात मागेल त्याला घरकुल देण्यात येईल तसेच गायरान जागेवर बांधण्यात आलेले घरकुले नियमित करण्यात येतील. अशा महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केल्या. राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील पहिल्या शासकीय वाळू केंद्राचे उद्घाटन व लोकार्पण महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी, उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या चाचणी शुभारंभ कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. ३१ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची तयारी धरण स्थळावर सुरू करण्यात आली असून, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंददायी अशा सोहळ्यास उपस्थित राहावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. त्यांनी या कार्यक्रमास येण्याचे मान्य केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पाणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर :- पुण्याहून संगमनेरमध्ये विक्रीसाठी आणलेला गांजा संगमनेर शहर पोलिसांनी पकडला आहे. दोन किलो गांजा सह पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आणलेली आलिशान टाटा कंपनीची नेक्सन कार आणि विवो कंपनीचा मोबाईल असा 4 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोर्वे रोडने जाणाऱ्या एका संशयित वाहनचालकाला त्यांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र वाहन चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत वाहन वेगात घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पथकाने त्याला कोल्हेवाडी रस्त्यावरील चर्चजवळ पकडले. वाहनाचे झडती घेतली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज आळंदी :- शिक्षणाचा मूल्याधिष्ठीत विचार हा संत साहित्यात सातत्याने प्रतिबिंबीत झाला आहे. समाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. मात्र शिक्षण अधिकाधिक मूल्याधिष्ठीत होण्यासाठी संताच्या विचारातील शिक्षण विषयक दृष्टीकोन जाणून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक शिवाजीराव तांबे यांनी केले. चपराक प्रकाशनच्यावतीने संदीप वाकचौरे लिखित ‘शिक्षणाचे पसायदान’ या पुस्तकाच्या आळंदी येथे झालेल्या व्दितीय आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्य शासनाचा कंठसंगीत पुरस्कार विजेते जेष्ठ संगीतकार कल्याण गायकवाड, सुप्रसिध्द गायिका कार्तिकी गायकवाड, माजी शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी, चपराक प्रकाशनचे प्रमुख जेष्ठ संपादक घनश्याम पाटील, रवींद्र कामठे, अरूण कमळापूरकर, आळंदी देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी…

Read More

आरोपींनी केला लाकडी दांडके, फायटर, चॉपर, रॉड, तलवारीचा वापर; सतर्क पोलिसांमुळे परिस्थिती नियंत्रणात… गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पिकअप मधून जाताना शहरातील जोर्वे नाका येथे हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून पिकअपमधील लोकांना टोळक्याकडून मारहाण करण्यात आली. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून उपचारानंतर घरी परतत असणाऱ्या या लोकांवर पुन्हा शंभर ते दीडशे लोकांनी “ये वही लोग है जो अपने खिलाफ पोलीस स्टेशन को तक्रार देने गये थे, आज इन्हे जिंदा घर नही जाने देंगे” असे म्हणत तलवार, चॉपर, फायटर, लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने हल्ला करीत त्यांना जिवे मारण्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. या हल्ल्यात आठ जण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज स्मिता मांजरे नावाची एक मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबातील मुलगी. बारावी झाल्यावर तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. पण घर थोडे जुन्या वळणाचे, काय करायचे मुलीला इतके शिकवून, असा विचार करून जवळच्याच कॉलेजमध्ये तिला बी.ए.साठी प्रवेश घेऊन दिला. या युवतीला थोडे वाईट वाटले, पण आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचे आणि पुढे जायचे हा तिचा मूळ स्वभाव!! बीए करतांना भरपूर वेळ मिळायला लागला. अभ्यास थोडासा असायचा, त्यातून मग खेळाची आवड निर्माण झाली. सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. अभाविप, छात्र युवा संघर्षवाहिनी यांचे आंदोलने कार्यक्रम यात ती सहभागी होऊ लागली. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर काहीतरी व्यवसायाभिमुख शिक्षण घेतले पाहिजे असे तिच्या मनात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जीवनाचे ध्यासपर्व मानून निळवंडे धरण आपण पूर्ण केले. अनेक अडचणीवर मात करून कालव्यांची कामे मार्गी लावली. रात्रंदिवस काम सुरू ठेवून ऑक्टोबर 22 मध्येच दुष्काळी भागाला पाणी द्यायचे होते. सरकार बदलले त्यामुळे कामे मंदावली मात्र आता दहा टीएमसी पाणी शिल्लक असताना श्रेयवादासाठी उशीर न करता तातडीने पाणी सोडले पाहिजे. धरणाचे काम कोणी केले हे सर्वांना माहीत असून नशिबाने तुम्हाला संधी मिळाली आहे तर पाणी सोडण्यास उशीर का केला, असा सवाल निळवंडे धरणाचे जनक काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला. बुधवारी 31 मे निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी घेतली जात आहे. आमदार थोरात यांनी गेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३१ मे २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. पाच तालुक्याचे लाभक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे, अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.‌ अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या कार्यस्थळावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी अधिकारी-कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जलसंपदा विभागाचे अभियंता अरूण नाईक, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्रीनिवास वर्पे, कृषी विभागाचे गायकवाड, माजी मंत्री मधुकर पिचड, वैभव पिचड, सिताराम भांगरे,…

Read More