Author: अनंत पांगारकर
नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज) महत्त्वकांक्षी ठरलेल्या नागपूर ते मुंबई या ७०१ किलोमीटर लांबीच्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी असा पहिला टप्पा खुला झाल्यानंतर त्या पाठोपाठ आता २६ मे पासून शिर्डी ते नाशिक हा दुसरा टप्पा सुरू होत आहे. दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. नासिकपर्यंत हा महामार्ग खुला होत असल्याने आता नागपूर ते नाशिक प्रवासासाठी सहा तास लागणार असून नव्याने सुरू होत समृद्धी महामार्गाचे शिर्डी ते भरवीर हे अंतर अवघ्या ४० ते ४५ मिनिटात पार करता येणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी अंतराचा आहे. त्यापैकी नागपूर…
श्रीरामपूर (महाराष्ट्र संवाद न्यूज) श्रीरामपूर पोलिसांनी गोवंश जनावरांचे कत्तल करून त्यांच्या मांसाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत सुमारे पावणे पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सोमवारी (ता. २२ मे) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर पोलिसांनी धनगर वस्ती, वार्ड नंबर दोन येथे ही कारवाई केली. कारवाई दरम्यान पोलिसांना मुजाहिद मुस्ताक कुरेशी हा त्याच्याकडील पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा कंपनीच्या कार नंबर एम. एच. २३ वाय ६०९९ मध्ये गोवंश जनावरांची कत्तल करून ६३००० रुपये किमतीचे साडेचारशे किलो मांस विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला पोलिसांनी कारवाईदरम्यान ६३ हजार रुपये किमतीचे मांस व चार लाख रुपये किमतीची कार ताब्यात घेतली. श्रीरामपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी मुजाहिद…
राहाता (महाराष्ट्र संवाद न्यूज) उच्चशिक्षित प्रेयसीला फसवत दुसऱ्या मुलीशी विवाह करणे नवरदेवाला चांगलेच महागात पडले आहे. नव्या वधू सोबत बोलल्यावर चढण्यासाठी नवरदेवाची निघालेली मिरवणूक लग्न मंडपाऐवजी थेट पोलीस ठाण्यात पोहोचण्याचा प्रकार राहाता तालुक्यात समोर आला आहे. लग्नाचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची तक्रार घेऊन प्रेयसी पोलीस ठाण्यात पोहोचली आणि नवरदेवाचा हिरमोड झाला. लग्न तर मोडलेच परंतु नवरदेवावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. नगर जिल्ह्यात या विवाहाची चर्चा सुरू आहे. एकीकडे वर आकाशात सूर्यनारायण तळपत असताना दुसरीकडे विवाह समारंभ जोरात सुरू आहे. रविवारी (ता. 21 मे 2023) अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील सावता महाराज मंगल कार्यालयामध्ये देवळाली ता. नाशिक येथील पंकज कदम याचा…
आश्वी (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कोल्हार-घोटी महामार्गावरील लगतच्या दोन गावांमधून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञातांनी पळून नेल्याचा प्रकार घडला. या संदर्भात दोन्ही मुलींच्या पालकांनी आश्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिल्या घटनेत 16 मे रोजी 14 वर्षे 10 महिने वयाची अल्पवयीन मुलगी गावातील दुकानामध्ये मॅगी आणण्यासाठी गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे घरातील व्यक्तींनी दुकानदाराकडे जाऊन चौकशी केली असता संबंधित मुलगी दुकानात मॅगी घेण्यासाठी आली नसल्याची माहिती त्यांना मिळाली. आजूबाजूला तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही, त्यामुळे तिच्या घरच्या व्यक्तींनी दिलेल्या…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) रात्रीच्या वेळी मोबाईल टॉवरवर आराम करण्यासाठी बसलेल्या विविध प्रकारच्या पक्षांना पकडण्यासाठी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो मोबाईल टॉवरवर चढला. मध्यरात्रीच्यावेळी टॉवरवर चढलेल्या या युवकाला टॉवरच्या उंचीचा अंदाज आला नाही. पक्षी पकडण्याच्या नादात टॉवरवरून तोल जाऊन खाली पडताना तो जीव गमावून बसला. संगमनेर तालुक्यातील अंभोरे या गावी रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. गणेश भास्कर गवळी (वय अंदाजे 27 वर्ष) असे या मृत झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. गवळी हा लहानपणापासून आणि लग्नानंतरदेखील पत्नी आणि दोन मुलींसह आपला मेव्हणा काळू बर्डे यांच्याकडे राहावयास होता. रविवारी गावात कार्यक्रम असल्याने गणेश गवळी याने मद्य प्राशन केल्याची माहिती…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) – रविवारी झालेल्या आशीर्वाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी आशीर्वाद विकास पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे. सभासदांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर विश्वास दर्शवित विरोधी पॅनलचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. अनुसूचित जाती-जमाती राखीव प्रतिनिधी मतदारसंघातून सुनील पुनाजी दाभाडे तर विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातून बाळासाहेब जगन्नाथ दासरी या सत्ताधारी गटाच्या दोन्ही उमेदवारांची निवड सुरुवातीलाच बिनविरोध झाली होती. विरोधी गटाने बहुतेक जागांवर उमेदवार उभे केल्याने उर्वरित तेरा जागांसाठी रविवारी मतदान झाले. या संस्थेच्या निवडणुकीकडे सभासदांचे लक्ष लागले होते. मतदानानंतर लगेचच मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीनंतर विरोधी गटाच्या उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्याचे दिसून आले. एकाही…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अज्ञात व्यक्तीने संगमनेरच्या बालगृहातून नऊ वर्षीय वयाच्या बालकाला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. संगमनेर शहरामध्ये बीएड कॉलेज जवळ बालगृह असून या बालगृहात असलेल्या नववर्षीय मुलाला काहीतरी फुस लावून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तक्रारदाराच्या रखवालीतून पळवून नेण्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी पाच ते सात वाजण्याच्या दरम्यान घडला. या संदर्भात बालगृहाचे कर्मचारी बाळकृष्ण दिगंबर आंबरे यांनी रविवारी दुपारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस…
नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज) नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजीव सोनवणे यांची राज्यपाल रमेश बैस यांनी नियुक्ती केली आहे. सोनवणे यांच्याकडे पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्र कुलगुरूपदाचा पदभार होता. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई वायुनंदन यांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू असलेले डॉ. सोनवणे हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नववे कुलगुरू आहेत. कुलगुरूपदासाठी राज्यभरातील इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्यपाल कार्यालयाकडून डॉ. सोनवणे यांची कुलगुरूपदी निवड करण्यात आली. डॉ. सोनवणे यांनी आतापर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख, मुक्त अध्ययन प्रशाळेचे प्रमुख आदी जबाबदार्या पार…
रविवार विशेष लेख विद्यमान राज्य सरकारच्या काळात सभ्य चेहर्याच्या खंडणीखोरांची चलती आहे. या खंडणीखोरांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास दिला असेल, त्यांना आत टाकण्यासाठी मदत केली असेल, त्यांच्या सरकारला बदनाम केलं असेल तर अशा बदमाशांचं पुनर्वसन करण्याची या सरकारची तयारी दिसते आहे. सत्तेच्या विकृतीचा हा परिपाक होय. अशाच चेहर्यातील समीर वानखेडे यांचा उपद्व्याप आपण पाहातोच आहोत. या वानखेडेंविषयी आपण पुढे लिहिणारच आहोत. अशा सभ्य चेहर्यामागचा आणखी एक खंडणीखोर या राज्यात उजळ माथ्याने वावरत होता. परमवीर सिंग असं त्याचं नाव. असंख्य प्रकरणांमागचा मास्टरमाईंड असलेला आणि विविध गुन्ह्यांचा पाठिराखा म्हणून ओळखला जाणारा म्हणून परमवीर राज्याच्या पोलीस खात्यात कार्यरत होता, हेच या राज्याचं दुर्देवं…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेरात आता बिबट्यांच्या अवयवाच्या तस्करीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघा तस्करांना पकडण्यात संगमनेरच्या वनविभागाला यश आले आहे. तर त्यांचा तिसरा साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. संगमनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन एच. लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. शनिवारी (ता. १९ मे) नासिक-पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ दुचाकीवरून येणारे काही लोक बिबट्याच्या दात सुळे नखे आणि मिशांची विक्री करणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजली होती. या माहितीच्या आधारे वनक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांनी या परिसरात आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. संशयित व्यक्ती या ठिकाणी आल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून संशयतांसोबत बोलणी…
