Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: अहिल्यानगरच्या एलसीबी मधील पोलीस उपनिरीक्षकासह तिघा पोलीस कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन लाचखोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांना निलंबित करण्याच्या घटनेची चर्चा सुरू असतानाच संगमनेर येथे एका धक्कादायक घटनेने पोलीस दलात खळबळ उडवून दिली आहे. संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस नाईक धनंजय महाले यांच्यावर गंभीर स्वरूपाचे लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. संगमनेर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीने हे प्रकरण सध्या संगमनेरमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. काय आहे प्रकरण? १९ जानेवारी २०२३ रोजी कतारी यांनी संगमनेर शहर पोलीस…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारूप प्रभाग रचनेत आणि निर्वाचक गण रचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा गंभीर आरोप पंचायत समितीचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) सरूनाथ सुखदेव उंबरकर यांनी केला असून या संदर्भात जिल्हाधिकारी (जिल्हा निवडणूक अधिकारी) यांच्याकडे हरकत अर्ज दाखल केला आहे. २१ जुलै २०२५ रोजी संगमनेर तहसील कार्यालयात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. उंबरकर यांनी आपल्या हरकतीमध्ये म्हटले आहे की, संगमनेर तहसीलदार यांनी प्रारूप प्रभाग रचना आणि निर्वाचक गण रचना करताना शासकीय नियमांचे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या ४ ऑक्टोबर २०११ च्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे. आयोगाच्या निर्देशानुसार, निवडणूक विभाग/निर्वाचक गण रचना उत्तर…
महाराष्ट्र संवाद ऑनलाईन वृत्त अहिल्यानगर: अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस उपनिरीक्षक तुषार छबूराव धाकराव, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोहर सिताराम गोसावी, पोलीस हेडकॉन्स्टेबल बापुसाहेब रावसाहेब फोलाणे आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश प्रभाकर भिंगारदे यांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांची ऑनलाईन लाच घेतल्याच्या कारणावरून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. यामुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे तपास करत आहे. या प्रकरणातील फिर्यादीने ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनी,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त: पुणे शहरात दारूच्या व्यसनावरून होणाऱ्या कौटुंबिक वादातून एका धक्कादायक घटनेत वडिलांनीच आपल्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे. फुरसुंगी परिसरात घडलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना तात्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत सुरेश जमदाडे (वय ३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुरेश बाबुराव जमदाडे (वय ५९, रा. कैलासनगर, वलवा वस्ती, वडकी, हवेली) असे अटक केलेल्या आरोपी वडिलांचे नाव आहे. मयत प्रशांत याला दारूचे तीव्र व्यसन होते. या व्यसनामुळे तो घरात नेहमीच वाद घालत असे, ज्यामुळे कुटुंबातील शांतता भंग पावत होती.…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यात प्रशासकीय अनियमितता आणि राजकीय हस्तक्षेपावरून मोठे वादळ निर्माण झाले आहे. शासनाच्या तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून येलो आणि ग्रीन झोनमधील जमिनींचे बेकायदेशीर तुकडे पाडल्याप्रकरणी दोन मंडळ अधिकारी आणि तीन तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीही अशीच कारवाई करून पाच जणांचे निलंबन करण्यात आले होते. आतापर्यंत दहा जणांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळल्याने या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली असून, यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोपही होत आहे. प्राप्त माहितीनुसार, मंडल अधिकारी बाबाजी जेडगुले (समनापुर) व इराप्पा काळे (साकुर), तलाठी रोहिणी कोकाटे, तलाठी आलोकचंद्र चिंचुलकर, तलाठी धनराज राठोड या पाच महसूल कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहर वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस हवालदार राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने राजेंद्र गायकवाड हे घरीच होते. त्यांची पत्नी दौंड येथे गेली होती, तर १२ आणि १४ वर्षांची त्यांची दोन्ही मुले शाळेत होती. दुपारच्या सुमारास त्यांच्या पत्नीने त्यांना अनेक वेळा फोन केला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांना चिंता वाटू लागली. शाळा सुटल्यावर मुले घरी परतली असता त्यांना घराचा दरवाजा बंद दिसला.…
शिर्डी – महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त शिर्डी येथे येत्या १२ ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान परमपूज्य प्रदीपजी मिश्रा महाराजांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शिवपुराण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः मध्यप्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाम येथे जाऊन महाराजांची भेट घेतली आणि त्यांना शिर्डीतील या अध्यात्मिक सोहळ्यासाठी आमंत्रित केले. या शिवकथा महोत्सवाच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी विखे पाटील कुटुंबियांनी स्वीकारली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी आणि अहिल्यानगर परिसरातील माता-भगिनींकडून शिवकथेसारखा अध्यात्मिक सोहळा आयोजित करण्याची सातत्याने विनंती केली जात होती. या भक्तीभावाला प्रतिसाद देत डॉ. सुजय विखे पाटील यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा पुढाकार घेतला…
राज्य विधानमंडळ इतकं खाली गेलंय, हे ऐकून मन विचलित होतं. 1978 पासून या सभागृहांशी संबंधित असलेले माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया ऐकली की वाईट वाटतं. इतकासा आवाज चढला तरी पीठासनावरील अधिकार्याची भीती वाटायची. मारामारी हा तर विषयच नसायचा. अगदीच नाराजी व्यक्त करण्यासाठी विरोधकांकडून आयुधांचा वापर व्हायचा. पण त्यासाठी हातघाईवर यायची आवश्यकता पडत नसे. एकेका सदस्याचा मान इतका तोडीचा असायचा की पीठासनावरील अधिकारीच त्याची काळजी घेत. महाराष्ट्राचं हीत हेच या सगळ्यांचं ध्येय असायचं. सभागृहातल्या उच्चकोटीच्या चर्चा ही तर दोन्ही सभागृहातील पर्वणीच. असे असंख्य प्रकरणं सांगता येतील, ज्यात उशिरापर्यंत सदस्य सभागृहात थांबायचे. चिंता महाराष्ट्राची असायची. आता ते राहिलं…
संगमनेर, प्रतिनिधी: सध्याच्या तरुण पिढीने मोबाईलवरील ‘रील’ बनण्याऐवजी जीवनात ‘रियल’ आदर्श निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. विठ्ठल कांगणे यांनी केले. छत्रपती प्रतिष्ठानतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा. कांगणे यांनी यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानण्याचे आवाहन तरुणांना केले. ते म्हणाले की, सोशल मीडियाचा वापर जागरूकतेसाठी करावा, परंतु त्याच्या आहारी जाऊ नये. दुर्दैवाने आजच्या पिढीचे आदर्श बदलत असून, तरुणांनी आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करावी. क्षणिक प्रसिद्धीच्या मागे न लागता कष्ट आणि बुद्धिमत्तेच्या बळावर जीवन बदलता येते, असे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त अहिल्यानगर, दि. १९: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे एक महत्त्वाचा निकाल समोर आला आहे. आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे पीठासीन अधिकारी तथा श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी येवती (ता. श्रीगोंदा) येथील एका वृद्ध दांपत्याला त्यांची सुनेने बळकावलेली वडिलोपार्जित शेतजमीन परत मिळवून देण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे तहसीलदारांना ही जमीन पुन्हा मूळ मालकांच्या नावे नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येवती येथील ज्ञानदेव दिनकर आढाव आणि त्यांच्या पत्नी अंजनाबाई आढाव या वृद्ध दांपत्याने न्यायाधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, सुमारे २० वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचे, विजय आढाव यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची सून,…
