Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी – देशभरात क्रीडाप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या संगमनेरच्या प्रतिष्ठेच्या ‘सहकारमहर्षी टी-२० क्रिकेट चषका’वर एनबीसीसी पुणे संघाने आपले नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात मुंबई संघाने दिलेल्या २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुणे संघाने आक्रमक फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवत मानाचा चषक पटकावला. जय हिंद लोकचळवळ आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या २६ व्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तब्बल १० हजार प्रेक्षकांची उपस्थिती आणि १९ रणजी व आयपीएल खेळाडूंचा सहभाग हे यंदाच्या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात झालेल्या या चुरशीच्या सामन्यात मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत २०० धावांचा डोंगर उभा केला होता.…
मेष : कामात प्रगती आणि उत्साहाचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत सकारात्मक ठरेल. सकाळपासूनच तुम्हाला एक नवीन ऊर्जा जाणवेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे चीज होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील. संध्याकाळी मित्रांसोबत मनोरंजनाचे कार्यक्रम आखाल. आर्थिक बाजू भक्कम राहील. वृषभ : संयम आणि नियोजनाला महत्त्व द्या वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज घाईत निर्णय घेणे टाळावे. कामाच्या ठिकाणी काही आव्हाने उभी राहू शकतात, परंतु तुमच्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही त्यावर मात कराल. रागावर नियंत्रण ठेवणे आज अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा जवळच्या व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. गुंतवणुकीच्या बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाऊ…
संगमनेर | प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड देवस्थान ते देवतळे येथील खंडोबा देवस्थान जोडणारा ऐतिहासिक शिवरस्ता अखेर खुला झाला आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेला हा रस्ता आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि महसूल विभागाच्या तत्परतेमुळे अवघ्या एका वर्षात वाहतुकीसाठी सज्ज झाला असून, आमदारांनी चंपाषष्ठीच्या निमित्ताने दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. हिवरगाव पावसा, निमगाव टेंभी आणि देवगाव या गावांमधून जाणारा हा शिवरस्ता बंद असल्याने खंडोबा भक्तांना दर्शनासाठी मोठा वळसा घालावा लागत होता. गेल्या वर्षी चंपाषष्ठी उत्सवासाठी देवतळे येथे आले असता, रामभाऊ रहाणे, ज्ञानदेव रहाणे, किशोर रहाणे, संजय रहाणे आणि जालिंदर पावसे या भक्तांनी आमदार खताळ यांच्याकडे हा रस्ता…
घारगाव, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये १ लाख ४० हजार रुपयांच्या रोकडसह सोन्याच्या दागिन्यांचा समावेश असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी अप्सरा मोहम्मद शेख (वय ५९, रा. घारगाव) या ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजल्यापासून आपले राहते घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात, अज्ञात चोरट्यांनी संधी साधत घराच्या लोखंडी दरवाजाचा कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील सामानाची उचकापाचक केली आणि लाकडी…
संगमनेर (प्रतिनिधी): संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, सामान्य नागरिकांच्या मालमत्तेची आणि सुरक्षेची पुरती वाट लागली आहे. भरदिवसा महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले जात असून, बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून रोकड आणि दागिने लंपास केले जात आहेत. या मालिका गुन्ह्यांमुळे संगमनेरमध्ये ‘कायद्याचे राज्य’ उरले आहे की ‘गुन्हेगारांचे वर्चस्व’ वाढले आहे, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. पहिली घटना शहरातील गजबजलेल्या बी.एड. कॉलेज रोडवरील ईदगाह मैदानाच्या गेटजवळ घडली. अनिता संतोष पितळे (रा. सह्याद्री कॉलेजच्या मागे) या आपल्या किराणा दुकानाकडे जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जोरात हिसका मारून…
संगमनेर, प्रतिनिधी- डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्या वतीने आयोजित दोन दिवसीय मोफत प्लास्टिक शस्त्रक्रिया शिबिरात परिसरातील सुमारे १५० रुग्णांची तज्ज्ञांमार्फत सखोल तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४७ अत्यंत गरजवंत रुग्णांवर विविध प्रकारच्या प्लास्टिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉ. सुचित गांधी व राणीप्रसाद मुंदडा यांनी दिली. हे शिबीर दि. ११ व १२ जानेवारी २०२६ या कालावधीत धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये पार पडले. गेल्या २६ वर्षांपासून लायन्स क्लब सातत्याने या उपक्रमाचे आयोजन करत आहे. शारीरिक व्यंगामुळे, विशेषतः फाटलेले ओठ, टाळूवरील छिद्रे, तिरळेपणा, चेहऱ्यावरील डाग, गाठी आणि हाता-पायांच्या जन्मजात दोषांमुळे अनेक व्यक्ती न्यूनगंडाने ग्रासलेल्या असतात. अशा व्यक्तींना आत्मविश्वासाने…
नामदेव कहांडळ भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. या युवा पिढीसमोर आज रोजगारापासून ते बदलत्या जीवनशैलीपर्यंत अनेक आव्हाने उभी आहेत. अशा काळात युवकांना केवळ भाषणे ठोकणारा नेता नको, तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालणारा आणि त्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारा मार्गदर्शक हवा असतो. नेमकी हीच भूमिका बजावत जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी समाजकारण, आरोग्य, शिक्षण आणि सहकार क्षेत्रात आपल्या अभ्यासू वृत्तीने स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आज ते उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर जनसामान्यांचे ‘हक्काचे मित्र’ म्हणून ओळखले जातात. डॉ. सुधीर तांबे यांचा प्रवास एका निष्णांत सर्जनपासून…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक ठरेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ: आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस मध्यम राहील. व्यवसायात गुंतवणूक करताना सावध राहा. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनावरचा ताण हलका होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. मिथुन: रखडलेली कामे आज पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. प्रवासाचे योग आहेत, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कर्क: आज तुम्हाला नवीन संधी प्राप्त होऊ शकतात, त्यामुळे सतर्क राहा. पैशांचे नियोजन करणे गरजेचे आहे कारण अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून तुम्हाला अपेक्षित…
संगमनेर, प्रतिनिधी – ग्रामीण भागातील कलागुणांना वाव मिळावा आणि सामाजिक प्रश्नांची सोडवणूक व्हावी या उदात्त उद्देशाने धांदरफळ बुद्रुक येथे आयोजित ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ व ‘स्वदेश कला उत्सव २०२६’ उत्साहात पार पडला. राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाची सांगता माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या उत्सवाचे उद्घाटन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. सांगता समारंभाप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, धांदरफळ बुद्रुक गावाने ग्रामविकासाची वेगळी दिशा दर्शविली असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोकोपयोगी उपक्रम राबवून या गावाने प्रगतीची घोडदौड सुरू ठेवली आहे. श्री…
संगमनेर | प्रतिनिधी राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल हाती येत असतानाच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीला मिळणारे यश आणि विरोधकांना बसलेला फटका या पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी एक सूचक ट्विट करत राज्यातील ‘युवा नेत्यांचे’ कान टोचले आहेत. “केवळ आपल्या मनासारखा निकाल लागला नाही म्हणून निवडणूक प्रक्रियेवर संशय घेणे हे लोकशाहीसाठी घातक आहे,” अशा शब्दांत त्यांनी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. आमदार तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांवर विशेष भर दिला आहे. ते म्हणतात की, महापालिका निवडणुकीचे निकाल समोर येत असताना अनेक पक्षांमधील ‘युवा नेते’ आपल्या अपयशाचे खापर…
