Author: अनंत पांगारकर
संगमनेर, दि. १९ फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांनी सांगितलेला मानवता धर्म पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचे प्रेरणास्थान असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात आदींनी अभिवादन केले. शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, माजी शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी नगरसेवक गणेश मादास, रामहरी कातोरे, जीवन पंचारिया, धीरज टाक, डॉ. सुचित गांधी, आलोक बर्डे, खंडू सातपुते, अंबादास आडेप, सुमित पवार,…
संगमनेर, दि. १९ फेब्रुवारी – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संगमनेरच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते शिवजयंती रथाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उत्तर नगर जिल्हा सहसंयोजक अवधूत खोल्लम, संगमनेर शहर मंत्री हर्ष खोल्लम, संगमनेर शहर सहमंत्री प्रणव आसने, संगमनेर सहमंत्री मधुरा पोळ, संगमनेर कार्यालय मंत्री अक्षदा गोसावी, तंत्रनिकेतन अभियांत्रिकी प्रकल्प संयोजक वेदांत काळे, जिज्ञासा संयोजक विजय गडाख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक व देशभक्तिपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती देण्यात आली. या वेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा…
अहिल्यानगर, दि. १९- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, जिल्हा प्रशासन अहिल्यानगर आणि जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहिल्यानगरतर्फे शहरात माळीवाडा बसस्टँड शेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ‘जय छत्रपती शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. हलगी-संबळ वादन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित जीवंत देखावे आणि पारंपरिक खेळांच्या चित्तथरारक सादरीकरणाने शिवकाळ उभा केला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेचा शुभारंभ केला. आमदार संग्राम जगताप आणि श्री. सालीमठ यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि शिव प्रतिमेला अभिषेक करून…
अकोले, दि. १९ फेब्रुवारी – अकोले तालुक्याच्या ग्रामीण भागातून धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. ५ वर्षाच्या बालिकेला आपल्या घरी बोलावत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आकाश संतु कासार (रा. शेरणखेल, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) याच्या विरोधात पोस्को कायदा कलम ४, ८, १२, ०९ (एम), अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३(२)(व्ही) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आकाश कासार याने रविवारी (१६ फेब्रुवारी) सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान पीडित पाच वर्षाच्या बालिकेला आईने घरी बोलावले आहे असे सांगून स्वतःच्या घरी नेले. तेथे त्याने या बालिकेवर लैंगिक अत्याचार केले असल्याचे तक्रारीत…
संगमनेर, दि. १८ फेब्रुवारी – संगमनेर तालुक्यातील समनापुर येथे सुरू असलेल्या कादर शहावली संदल दरम्यान दोन गटात झालेल्या दगडफेकीत एक जण जखमी झाला असून सात जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील समनापूर येथे सुरू असलेल्या यात्रे दरम्यान दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास समनापुर येथील मारुती मंदिरासमोरील मोकळ्या पटांगणात घडली. ज्यावेळी दोन्ही गटात दगडफेक करण्यात आली. यासंदर्भात शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गॅरेज व्यवसाय करणारा पंकज गोरक्षनाथ नेहे (वय ३२, रा. चांडे वस्ती, निळवंडे रोड, समनापुर ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) हा तरुण सोमवारी (१७…
मुंबई, दि. १८ फेब्रुवारी – नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने मंगळवारी बदल्या केल्या. यात आहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा समावेश असून त्यांच्यावर पुण्यात आता मोठी जबाबदारी टाकण्यात आली असून ते पुण्याचे नवे साखर आयुक्त असतील. सालीमठ यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी म्हणून अद्याप नवीन नियुक्ती करण्यात आलेली नाही. राज्य सरकारने या अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या… १) डॉ. विजय सुर्यवंशी (IAS: NON-SCS:2006) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई यांची विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २) डॉ. राजेश देशमुख (IAS:SCS:2008) विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई यांना आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. ३)…
अहिल्यानगर, दि. १८ फेब्रुवारी – खांबावर जाहिरात फलक लावल्याप्रकरणी संगमनेरमधील अकॅडमी चालकाविरुद्ध अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावरील जाहिरात फलकांचा (फ्लेक्स) विषय चर्चेत आला आहे. अहिल्यानगर पुणे रस्त्यावर उड्डाणपुलाच्या खांबाला जाहिरातीचा फलक लावल्याप्रकरणी संगमनेर येथील आर्य अकॅडमी चे सुनील खंडेराव फटांगरे (रा. सायखिंडी, ता. संगमनेर) यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरणास प्रतिबंध अधिनियम २९९६ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अहिल्यानगर महापालिकेचे प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी अहिल्यानगर पुणे रस्त्यावरील उड्डाणपुलाखालील रस्त्यावर स्वच्छता करत होते. यावेळी…
संगमनेर, दि. १८ फेब्रुवारी – सकल मराठा समाजाच्यावतीन गेल्या दहा वर्षापासून १९ फेब्रुवारीला संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारापाशी शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. यावर्षी मात्र या उत्सवाला गालबोट लागले आहे. काही मंडळींनी दादागिरी करून हा जयंती उत्सव रद्द करण्यास सकल मराठा समाजाला भाग पाडल्याची माहिती समोर येत आहे. शिवजयंती उत्सवावरून संगमनेरमध्ये राजकारण तापलेले आहे. महायुतीच्यावतीने यावर्षी शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार हा उत्सव संध्याकाळी मिरवणुकीने साजरा होणार होता. दरम्यान सकाळच्या सत्रात सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बसस्थानकाच्या दरम्यान शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार होता. यामध्ये सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, मॅरेथॉन, मर्दानी खेळ, लाईट शो, आरोग्य…
संगमनेर दि. १८ फेब्रुवारी – वेळेत आपल्या कामात सुधारणा करा नाहीतर बदल्या करून घ्या, माझ्या मतदारसंघात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा महावितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा देत येथून पुढे जर विजेचे रोहित्र जळाले तर ग्रामस्थांनी वर्गणी काढायची नाही तसेच तीन दिवसाच्या आत अधिकाऱ्यांनी वीज रोहित्र उपलब्ध करून देण्याचे निर्देश संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. पठार भागातील साकुर उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या साकुर, मांडवे, कर्जुले पठार, डोळसणे, घारगाव, खांबे या महावितरणच्या उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांची आढावा बैठक खताळ यांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडली. या बैठकीत ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभाराविरोधातील तक्रारींचा पाढाच आमदार खताळ यांच्यासमोर मांडला. यावेळी बाबासाहेब…
मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी – नव्या कायद्याअंतर्गत ज्ञानेश कुमार यांची भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. ते सध्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची जागा घेतील. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या केंद्रीय निवडणूक आयोगातील कार्यकाळाला एक वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांना बढती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निवृत्तीनंतर त्यांना १४ मार्च २०२४ ला लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून घेण्यात आलं होतं. ज्ञानेश कुमार यांनी १४ मार्चला पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ मार्चला लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. ज्ञानेश कुमार हे १९८८ बॅचचे केरळ कॅडरचे…
