Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर शहरात गोवंश हत्या सातत्याने सुरू असून, वेळोवेळी हे प्रकार उघडकीस येत असतानाही यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने सलग दोन दिवस बेकायदेशीर कत्तलखान्यांवर टाकलेल्या छाप्यात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलिसांनी १७ गुन्हे दाखल करत ७३ गोवंश जनावरांना कत्तलीपासून वाचवल्याचे सांगितले. कसायांवर केवळ कागदोपत्री गुन्हे दाखल होत असल्याने व ठोस कारवाई होत नसल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आली आहे. या गंभीर विषयावर यापूर्वी आक्रमक भूमिका घेणारे हिंदुत्ववादी नेते आणि संघटना तसेच सुरुवातीला कत्तलखान्यांविरोधात संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी थेट भूमिका घेतल्यानंतर काही कसायांचे वाडे पाडण्यात आले मात्र, त्यानंतर देखील हा व्यवसाय पूर्ववत सुरू…
मुंबई: रविवारी सकाळी एका ६० वर्षीय पतीने पत्नीची गोळी झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. राजमनोहर नम्पेली (६०) आणि त्यांची पत्नी लता नम्पेली (५५) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना वरळीतील सिद्धार्थनगर परिसरात घडली. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना गोळीबाराची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना हे वृद्ध दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजमनोहर यांनी पहाटे साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान झोपेत असलेल्या पत्नी लता यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर त्यांनी स्वतःवरही गोळी झाडून घेतली. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेवेळी…
मुंबई, दि. ९: गेल्या दोन आठवड्यांपासून प्रतीक्षेत असलेला मान्सून अजूनही रुसला असून, किमान १५ जूनपर्यंत तरी महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावण्याची शक्यता नाही. त्यामुळे १४ जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टीचा अपवाद वगळता उर्वरित राज्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात उष्णतेची लाट! – या काळात विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः पूर्व विदर्भात पारा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, विदर्भाच्या बऱ्याच भागांमध्ये तो ४० अंशांवरच राहील. मराठवाडा आणि खानदेशातही अनेक ठिकाणी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तुरळक पावसाची शक्यता, पण मान्सून नाही- १४ जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक मान्सूनचा…
पुणे – पुणे महानगरपालिकेतील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला मानसिक त्रास देऊन सातत्याने छळ केल्याच्या आरोपानंतर भारतीय जनता पार्टी (भाजप) कामगार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ओंकार कदम आणि त्यांचे सहकारी अक्षय कांबळे यांना पुणे महापालिकेत प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत, ज्यामुळे हे प्रकरण राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. संबंधित महिला अधिकाऱ्याने केलेल्या आरोपानुसार, गेल्या पाच महिन्यांपासून ओंकार कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून तिला सातत्याने त्रास दिला जात होता. यामध्ये जबरदस्तीने तिच्या दालनात प्रवेश करून छायाचित्रण करणे, दरवाजा बंद करून दमदाटी करणे, आणि अपमानास्पद भाषा वापरणे अशा घटनांचा समावेश आहे. विशेष…
महाराष्ट्र संवाद न्यूज – एका पोलीस कर्मचाऱ्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना धमकावून त्यांच्याकडून २८ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ही घटना बोपदेव घाटात ६ जून रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या विद्यार्थ्यांची तक्रार आहे की, पुण्याच्या कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई विक्रम वडतीले आणि त्याचा मित्र केदार जाधव यांनी त्यांना थांबवले. या दोघांनी विद्यार्थ्यांची बँग तपासली आणि हुक्क्याचे साहित्य त्यांच्याजवळ आढळल्याचे सांगितले. या प्रकरणी, गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन वडतीले आणि जाधव यांनी विद्यार्थ्यांकडून ३० हजार रुपयांची खंडणी मागितली. अखेर, मध्यस्थीनंतर, केदार जाधव याच्या गुगल पेवर २८ हजार…
संगमनेर, प्रतिनिधी – राज्यात गोवंश हत्या बंदी असतानाही सर्रासपणे गोवंश कत्तलखाने सुरु असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. संगमनेर शहर पोलिसांनी बेकायदेशीर कत्तलखान्यांवर धडक कारवाई करत ७३ गोवंश जनावरांची कत्तलीतून सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या सतरा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बकरी ईद सणाचे औचित्य साधून अवैध गोमांसाची खरेदी-विक्री व कत्तलीच्या घटना वाढण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कत्तलखान्यांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक…
मोठा गाजावाजा करत नागपूर ते इगतपुरी दरम्यानच्या समृध्दी महामार्गाचं तिसरं उद्घाटन पार पडलं. महामार्गाचा हा अंतिम टप्पा असल्याने या उद्घाटनाला महत्व प्राप्त होणं स्वाभाविक होतं. हा महामार्ग हाती का घेण्यात आला याविषयी आजही कुतुहल आहे. महामार्ग झाला की असंख्य उद्योग विदर्भ आणि मराठवाडा सारख्या मागास भागात येतील, परिणामी शेतकर्यांच्या मुलांना उद्योग आणि नोकर्या उपलब्ध होतील, असा गुळाचा खडा सरकारने तिथल्या जनतेच्या हाताला चिकटवला होता. महामार्गाचा पहिला टप्पा शिर्डीपर्यंत सुरू करण्यात येऊन दीड वर्षांचा अवधी पुढे गेला. ज्या कारणासाठी महामार्गाची उभारणी करण्यात आली त्या विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योग वाढीला चालना मिळालीच नाही. मागास भागाचा विकास होत असेल तर अशा महामार्गाला विरोध…
संगमनेर, प्रतिनिधी पठार भागातील पाण्याची दीर्घकाळ चाललेली समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. येत्या बुधवारी मंत्रालयात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मोरवाडी धरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. वरवंडी येथे आमदार खताळ यांच्या पेढेतुला कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार खताळ म्हणाले की, पठार भागासाठी मोरवाडी धरण व्हावे, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या धरणासाठी पूर्वी जागाही संपादित करण्यात आली होती. मात्र, नंतर मुळा नदीवर राहुरी तालुक्यात मुळा धरण बांधले गेले. सद्यस्थितीत मुळा नदीवर आंबीत व पिंपळगाव खांड ही दोन धरणे आहेत. दुर्दैवाने, पिंपळगाव खांड धरणाच्या…
मुंबई । प्रतिनिधी शासकीय कार्यालयातील ई सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसेच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी १०० अथवा ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी नियमबाह्य असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांकडून स्टॅम्पपेपरची मागणी करण्यात येऊ नये, अशी सक्त ताकीद बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून दिली आहे. बावनकुळे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात विद्यार्थी, पालक, पक्षकार तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन महिन्यापूर्वी जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच न्यायालयासमोर दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर रद्द करण्यात आले आहेत.…
संगमनेर / छत्रपती संभाजीनगर – श्रीमंत घरच्या मुलांची ‘स्थळं’ शोधून त्यांना लग्न करून देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला बीडच्या वडवणी पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रकरणी संगमनेरच्या तीन महिलांसह कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एक बनावट नवरी असून, त्यांच्याकडून एक चारचाकी वाहन आणि एकाच नावाचे विविध आधारकार्ड जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळाली.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वैभवी शेटे (बनावट नवरी), मनीषा ननावरे (नवरीची मैत्रीण), रणजीत अहिरे (कारचालक, तिघेही रा. संगमनेर) आणि यमुनाबाई (मध्यस्थी) यांचा समावेश आहे. या टोळीच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिली. लग्नासाठी मुली मिळत नसलेल्या अनेक गरीब,…
