Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून २० एप्रिलपासून पाणी सोडले जाणार आहे. तालुक्यातील पाणीटंचाई लक्षात घेता, निळवंडे कालव्याच्या आवर्तनाच्या काळात वीज पुरवठा खंडित होऊ नये, असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिले. पाणीटंचाई आढावा बैठकीत शेतकऱ्यांनी वीज पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी आमदार खताळ यांच्याकडे मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महावितरण कार्यालयात आमदार खताळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीस अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता अनिल थोरात, उपअभियंता धनंजय खैरनार, प्रेमकुमार पाटील, सुनील अहिरे यांच्यासह तालुक्यातील वीज उपकेंद्रांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आमदार खताळ म्हणाले…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून संगमनेरमधील अविष्कार नरेश राणे याने मोठे यश मिळविले आहे. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्याची युनियन बँक ऑफ इंडियामध्ये वर्ग १ या पदावर बँक अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. जिद्द, चिकाटी आणि सातत्याने अभ्यासाच्या बळावर यश मिळविणाऱ्या अविष्कार याच्या वडिलांचा संगमनेरमध्ये प्रिंटिंग प्रेसचा छोटासा व्यवसाय असून आई गृहिणी आहे तर, संगमनेरमधील सराफ विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत राणे व सुनील राणे यांचा आविष्कार हा पुतण्या आहे. एमएससी (मॅथ) करत असताना अविष्कार याने दुसरीकडे स्पर्धा परीक्षांची देखील तयारी सुरू केली होती. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात आता महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अपील प्रकरणांवर ई-सुनावणी प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या या शुभारंभामुळे जमीन व मालमत्तेशी संबंधित वाद, हक्क नोंदणी, फेरफार, उताऱ्यावरील दुरुस्ती आणि मालकी हक्काच्या प्रकरणांची सुनावणी आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या सुविधेमुळे महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. शासनाकडून संपूर्ण महसूल व्यवस्था डिजिटल करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ‘पेपरलेस व पारदर्शक प्रशासन’ देण्यावर भर दिला जात आहे. ई-सुनावणी ही संकल्पना सामान्य नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. यामुळे महसूल प्रकरणांवरील निर्णय लवकर होतील आणि कामकाजात अधिक सुसूत्रता येईल. लवकरच तालुका कार्यालयांमध्येही ही…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर शहरातील हनुमान जयंती मिरवणुकीतील हिंदुत्ववादी युवकांवरील खोटे गुन्हे त्वरित मागे घ्या, शहरात बोकाळलेले अवैध मटका, जुगार आणि दारूचे अड्डे तातडीने बंद करा, मारहाणीच्या बळी ठरलेल्या ललित परदेशी यांच्या तक्रारीची दखल घेऊन गुन्हेगारांना अटक करा अन्यथा, येत्या मंगळवारी (२२ एप्रिल) सायंकाळी ५ वाजता संगमनेरचे युवक रस्त्यावर उतरून महामोर्चा काढतील! असा थेट आणि कडक इशारा काल गुरुवारी शहरातील संतप्त नागरिक आणि युवकांनी पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, संगमनेरात सध्या कायद्याचे राज्य संपले आहे. खुलेआम गुटखा विक्री, मटका, लोटो गेम, पत्त्याचे क्लब आणि अवैध देशी-विदेशी दारू विक्री तसेच बेकायदेशीर वाळू…
महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप आणि खळबळजनक दावे करणारे बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले अखेर पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. बीड पोलिसांनी आज (शुक्रवार) पहाटे पुण्यातील स्वारगेट परिसरातून त्यांना अटक केली. कासले काल दिल्लीहून पुण्यात आले होते आणि स्वारगेटमधील एका हॉटेलमध्ये मुक्काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. काल सायंकाळी आपण पोलिसांना शरण येणार असल्याचा व्हिडीओ कासले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र, त्यापूर्वीच बीड पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. रणजित कासले यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अनेक गंभीर आरोप केले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज – राहाता राहाता तालुक्यातील गणेशनगर येथून एका १९ वर्षीय युवकाचे अपहरण करून, लोखंडी रॉडने अमानुष मारहाण करत त्याचा खून करण्यात आला. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सिन्नर तालुक्यातील मुसळगाव शिवारात स्कोडा गाडीच्या डिकीत टाकून दिला. या घृणास्पद कृत्याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत युवकाचे नाव प्रतीक वसंत सदाफळ (वय १९) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १२) रात्री सुमारे ११ वाजता गणेशनगर येथील निर्मळ रुग्णालयासमोरून त्याचे अपहरण झाले. संशयितांनी त्याला सिल्व्हर रंगाच्या स्कोडा गाडीच्या डिकीत टाकले आणि अज्ञात स्थळी नेऊन लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर | प्रतिनिधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी, शहरातील नामांकित डॉक्टर अमोल कर्पे याच्या पोलीस कोठडीची मुदत संपलेली गुरुवारी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रविवारी (६ एप्रिल) संगमनेरमध्ये रामनवमी उत्सवाची धामधूम सुरू असताना हा संतापजनक प्रकार समोर आला होता. डॉ. कर्पे याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीला पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या टेरेसवर नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. व कोणाला काही सांगू नको, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी गेल्याचे पीडित मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुक्यातील मांडवे येथील तलाठी अक्षय ढोबळे आणि खासगी व्यक्ती पत्रकार रमजान नजीर शेख हे ५० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. या प्रकाराने संगमनेरमध्ये खळबळ उडाली असून एसीबीच्या जाळ्यात सापडलेला शेख नेमका कशाचा पत्रकार आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. खडी वाहतूक करणाऱ्या तक्रारदाराच्या गाड्यांवर कारवाई न करण्यासाठी आणि ती सुरळीत चालू ठेवण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, ७अ व १२ प्रमाणे घारगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीच्या नाशिक युनिटने आणि घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर-अकोले तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना जमीन व गृह तारण कर्ज योजनेअंतर्गत कर्ज देण्याचे आमिष दाखवून मंजूर कर्जापैकी अल्प रक्कम कर्जदारांना देत उर्वरित रक्कम संस्थेचे व्यवस्थापक व संचालक मंडळाने कर्जदारांच्या खात्यातून परस्पर इतरांच्या नावे वर्ग केल्याचा आरोप करत संगमनेर शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला या बेकायदेशीर कर्ज प्रकरणांसंदर्भात कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी संस्थेने काय माहिती दिली हे अद्याप समजू शकले नाही. प्राप्त माहितीनुसार, कर्जदारांनी संस्थेने नियमबाह्य कर्ज व्यवहार करून गैरप्रकार केल्याचा आरोप केला असून, याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा आणि अन्य शासकीय न्यायिक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर परिसरातील उद्योग आणि व्यवसायासाठी आधारस्तंभ ठरलेल्या संगमनेर मर्चंट बँकेने आपल्या हीरक महोत्सवी वर्षामध्ये एक हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले असल्याचे उद्योजक राजेश मालपाणी यांनी म्हटले आहे. बँकेच्या चेअरमनपदी पुन्हा एकदा पाचव्यांदा राजेश मालपाणी यांची एकमताने निवड झाली आहे, तर व्हाईस चेअरमन म्हणून मधुसूदन नावंदर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक संतोष कोरे आणि सहकार अधिकारी राजेंद्र वाकचौरे यांच्या देखरेखेखाली बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात बुधवारी (१६ एप्रिल) चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. दोन्ही पदांसाठी अनुक्रमे राजेश मालपाणी आणि मधुसूदन नावंदर यांचेच अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात…
