Author: अनंत पांगारकर
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील शेंडेवाडी, साकूर, पिंपळगाव, कौठे मलकापूर आणि कर्जुले पठार भागातील दगडखाणींवर अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत काम करत असलेल्या ३८ वेठबिगार आणि ३१ बालकामगारांची प्रशासनाने आज (गुरुवारी) यशस्वीरित्या सुटका केली. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना सकाळी मिळालेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने तातडीने आणि प्रभावीपणे ही कारवाई केली. मुक्त करण्यात आलेल्या ३८ वेठबिगार कामगारांमध्ये २२ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे. या गंभीर प्रकरणी संबंधित ठेकेदारावर घारगाव पोलीस ठाण्यात वेठबिगार प्रतिबंधक कायद्यासह कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार, संगमनेरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी: श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, राज्याच्या सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी एका प्रशासकीय समितीची नियुक्ती केली आहे. यासंबंधी गुरुवारी (१५ फेब्रुवारी २०२४) विशेष आदेश जारी करण्यात आला. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे विद्यमान पालकमंत्री आणि स्थानिक आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रशासकीय समितीमध्ये प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असून जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख असलेले जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची सहअध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधी यांचाही समितीत समावेश आहे. संगमनेरचे आमदार अमोल खताळ, कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत १३ कोटी ७५ लाख ४१ हजार रुपये किमतीचा तब्बल ४०८ किलो वजनाचा अल्प्राझोलम या अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका टेम्पो चालकाला अटक केली असून पुणे जिल्ह्यातील एका रसायन अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मिनीनाथ विष्णू राशिनकर (वय ३८, रा. धनगरवाडी, राहाता, अहिल्यानगर) या टेम्पो चालकाला अटक केली आहे. तर, विश्वनाथ कारभारी शिपणकर (रा. दौंड, पुणे) याच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात…
शिर्डी: मुंबईतील सोने व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी यांना शिर्डीत मोठा गंडा घालण्यात आला आहे. त्यांच्या हॉटेलच्या खोलीतून तब्बल ३ कोटी २६ लाख रुपये किंमतीचे सुमारे साडेतीन किलो सोन्याचे दागिने आणि ४ लाख रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. या प्रकरणी खिशी यांनी त्यांचा चालक सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित याच्यावर संशय व्यक्त केला असून शिर्डी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजयसिंह खिशी हे मुंबईतील त्यांच्या फर्ममधून सोन्याचे दागिने घेऊन ७ मे रोजी शिर्डीत आले होते. त्यांच्यासोबत कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि चालक सुरेश कुमार होते. त्यांनी हॉटेल साई सुनीतामध्ये खोली क्रमांक २०१ मध्ये मुक्काम केला होता. खिशी हे परिसरातील सराफा दुकानांमध्ये सोने…
भाग – २ संगमनेर | अनंत पांगारकर अधिकृत गर्भपात केंद्र नसताना देखील रुग्णालयातील डॉक्टरने गर्भपातासंदर्भातील कायदा आणि नियम बाजूला ठेवत महिलेचा गर्भपात करण्याचे धाडस कसे दाखविले. महिलेची प्रकृती हाताबाहेर गेल्यानंतर तिला थेट दुसऱ्या तालुक्यातील रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर तेथे या महिलेच्या मृत्यू झाला. याची माहिती शहरात कानोकानी बहुतांश ठिकाणी पसरली. त्यामुळे आता या दुर्दैवी घटनेनंतर संगमनेर शहरातील महिला सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांनी ‘ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या माध्यमातून घडलेल्या प्रकरणावर आवाज उठवला आहे. त्यांनी सलग चार ते पाच दिवस या घटनेची सखोल माहिती मिळवली आणि २ मे २०२५ रोजी अहमदनगर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे एक विस्तृत तक्रार अर्ज दाखल केला. या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – राहाता: शेतात खत टाकण्याचे काम आटोपून जवळच्या ओढ्यावर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या चुलत भावांचा पाय घसरून पाण्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांनाही प्राण गमवावे लागले. ही हृदयद्रावक घटना राहाता तालुक्यातील गोगलगाव येथे घडली. मृत पावलेल्या मुलांची नावे साहिल दत्तात्रय चौधरी (वय १८) आणि किरण नारायण चौधरी (वय १५) असून दोघेही गोगलगावचे रहिवासी होते. किरणने नुकतीच ९ वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती, तर साहिल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, किसन तुकाराम तनपुरे (वय ६०) हे बुधवारी सायंकाळी त्यांच्या शेतात पिकांना पाणी देत होते. त्याचवेळी त्यांच्या शेजारी राहणारे साहिल आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विट व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तयार करण्यासाठी ठेवलेल्या कच्च्या विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने विट उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी विट उत्पादकांनी शासनाकडे अनेक वर्षांपासून मागणी केली आहे, परंतु शासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. शेतमालाला अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास जशी विमा योजना लागू आहे, त्याच धर्तीवर विट व्यवसायासाठी देखील विमा योजना लागू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विट उत्पादकांनी विमा कंपन्यांकडे विमा पॉलिसीनुसार कच्च्या विटांचा विमा उतरवण्याची विचारणा केली असता, विमा कंपन्यांनी मात्र विट व्यवसायासाठी त्यांच्याकडे कोणतेही विशिष्ट धोरण…
महाराष्ट्र संवाद न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात राजशिष्टाचार आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. या प्रकरणी दोन तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सहाय्यक महसूल अधिकारी एस. पी. हांगे आणि ग्राम महसूल अधिकारी व्ही. व्ही. कंठाळे या दोन तलाठ्यांनी मुख्यालयात थांबण्याचे आदेश असूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पूजन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला, ज्यामुळे राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाले. ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केल्याचा आरोप…
संगमनेर – प्रतिनिधी महाराष्ट्र विधानमंडळाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या लोकलेखा समितीवर (Public Accounts Committee) आमदार सत्यजीत तांबे यांची निवड झाली आहे. त्यांच्या अभ्यासू वृत्ती, प्रभावी मांडणी आणि युवा नेतृत्वामुळे ही निवड विशेष लक्षवेधी ठरली आहे. विधानमंडळ सचिवालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, आमदार तांबे यांची लोकलेखा समितीवर अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती राज्य सरकारच्या खर्चावर, आर्थिक निर्णयांवर आणि नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) यांच्या अहवालावर आधारित चौकशी करून शिफारसी करते. विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार हे या समितीचे अध्यक्ष आहेत. युवा नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तांबे यांच्यावर राज्याच्या आर्थिक पारदर्शकतेची मोठी जबाबदारी आली आहे. त्यांनी यापूर्वी विधान परिषदेत कायदा, आरोग्य, शिक्षण, शेती,…
नवी दिल्ली: पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावलेला भारतीय भूभाग त्वरित रिकामा करावा, अशी कठोर भूमिका भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने घेतली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पाकिस्तानला यासंदर्भात स्पष्ट शब्दांत ताकीद दिली. याव्यतिरिक्त, सिंधू पाणी वाटप करार देखील आता स्थगित ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रणधीर जयस्वाल म्हणाले की, जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित कोणतेही प्रश्न भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय स्तरावरच सोडवले पाहिजेत, ही भारताची नेहमीची आणि राष्ट्रीय भूमिका आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही. 10 मे 2025 रोजी दुपारी 3:35 वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेबाबत माहिती देताना जयस्वाल म्हणाले, “पाकिस्तानी उच्चायुक्तालयाकडून दुपारी 12:37 वाजता या…
