Author: Annant Ppangarkar

सोमवार, दिनांक १० जून २०२४ मराठा आंदोलनासाठी शनिवारपासून उपोषण सुरू केलेले मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षण व समाजावर बोलू नये अन्यथा काँग्रेसच्या विधानसभेच्या त्यांच्यासह सर्व जागा पाडेन, असा थेट इशारा दिला आहे. जालन्याच्या आंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठी च्या मनोज जरांगे यांच्या उपोषणास नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांनी आज सोमवारी भेट दिली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना जरांगे यांनी वडेट्टीवार यांना हा थेट इशारा दिला. जरांगे म्हणाले, आमची मुले मोठी झाली पाहिजेत, त्यांच्यासाठी आमचे प्राण पणाला लावत आहोत. सरकारने आम्ही दिलेल्या व्याख्यानुसार सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, असे झाले नाही…

Read More

सोमवार, दिनांक ११ जून २०२४ मोबाईल दुकानात काम करणाऱ्या तरुणाने सहा-सात महिन्यांपूर्वी एका तरुणीशी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संकेत सतीश अंकाराम (रा. दिल्लीगेट, तोफखाना, अहमदनगर) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी समोर आलेली अधिक माहिती अशी, फिर्यादी तरुणी अहमदनगर शहरांमध्ये राहत असून तिच्या मित्राची सावेडीतील प्रोफेसर चौकात मोबाईल शॉपी आहे. तेथे संकेत अंकाराम हा कामास असून त्याची पाच-सहा महिन्यांपूर्वी या फिर्यादी तरुणीशी ओळख झाली होती. या ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यातून त्यांच्या गाठीभेटी होत असत. २० नोव्हेंबर २०२३ रोजी संकेत याने फिर्यादी तरुणीला…

Read More

सोमवार दि. १० जून रविवारी सायंकाळी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासह ७१ खासदारांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. यात देशातील २४ राज्यांना सामावून घेण्यात आले आहे. त्यांच्या मंत्रीमंडळात उत्तरप्रदेशला प्रथम स्थान तर त्यापाठोपाठ बिहार, महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटकला संधी देण्यात आली आहे. मोदींच्या रालोआ सरकारमध्ये सर्वाधीक ९ मंत्री उत्तरप्रदेश, ८ मंत्री बिहार, ६ मंत्री महाराष्ट्र, ५ मंत्री गुजरात, प्रत्येकी ४ मंत्री राजस्थान व मध्यप्रदेश, प्रत्येकी ३ मंत्री आंध्र प्रदेश, ओडीसा व हरियाणा राज्यातील असून याशिवाय हिमाचल १, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तेलंगणा व झारखंड प्रत्येकी २, पंजाब, गोवा, जम्मू काश्मीर, दिल्ली, उत्तराखंड, अरुणाचल, तामिळनाडू व छत्तीसगड मधून प्रत्येकी एका…

Read More

सोमवार दि. १० जून २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी स्थानापन्न झालेल्या तिसऱ्या ‘रालोआ’ सरकारमध्ये महाराष्ट्राला उत्तरप्रदेश, बिहार पाठोपाठ संधी मिळाली आहे. मोंदीच्या नव्या मंत्रीमंडळाता सर्वाधिक नऊ मंत्री उत्तरप्रदेशमधील असून त्यापाठोपाठ बिहारमधूून आठ व महाराष्ट्रातून सहा जणांना संधी देण्यात आली आहे. यात भाजपचे चौघे तर मित्रपक्षाच्या दोघांचा समावेश आहे. मोंदींच्या नव्या मंत्रीमंडळात शपथ घेणाऱ्यात भाजपकडून पीयुष गोयल, नितीन गडकरी, रक्षा खडसे व मुरलीधर मोहोळ, शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव व आरपीआय (आठवले) कडून रामदास आठवले यांचा समावेश आहे. भाजपाचे जेष्ठ नेते नागपुरचे खासदारर नितीन गडकरी, उत्तर मुंबईतून निवडून आलेले खासदार पीयुष गोयल या दोघांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. तर…

Read More

रविवार दिनांक ९ जून २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी पंतप्रधान पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. तिसऱ्यांदा मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. पंडित नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा शपथ घेणारे मोदी दुसरे पंतप्रधान ठरले आहे. देश विदेशातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. असे आहे मोदींचे नवे मंत्रिमंडळ… नरेंद्र मोदी – पंतप्रधान  यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ… राजनाथ सिंग अमित शहा नितीन गडकरी जगत प्रकाश नड्डा शिवराज सिंग चौहान निर्मला सीतारमन डॉ. सुब्रमण्यम जयशंकर मनोहर लाल खट्टर एच. डी. कुमारस्वामी पियुष गोयल धर्मेंद्र प्रधान जितनराम मांझी राजीव रंजन सिंग सर्वानंद सोनोवाल डॉ. वीरेंद्र कुमार किंजरापू राम मोहन नायडू…

Read More

रविवार, दिनांक ९ जून २०२४ केंद्रात सत्ता स्थापन करण्याची वेळ अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत केंद्रात एनडीएचे (NDA) सरकार स्थापन करत आहे. राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू पंतप्रधान आणि नव्या मंत्र्यांना राजभवनात शपथ देतील. पंतप्रधान मोदींनी बहुमताचा आकडा गाठत आपले संख्याबळ २९३ वर नेले आहे. यात एकट्या भाजपच्या खासदारांची संख्या २४० एवढी असून त्या खालोखाल भाजपाचे मित्र पक्ष असलेल्या टीडीपी आणि जेडीयु खासदारांची संख्या आहे. एक नजर भाजपाच्या मित्र पक्षांच्या खासदार संख्येवर… यांच्या बळावर मोदी पंतप्रधान भाजपा – २४० टीडीपी – १६ जेडीयु – १२ शिवसेना (शिंदे) – ०७ एलजेपी (आर) – ०५…

Read More

रविवार, दिनांक ९ जून २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या पर्वाला आज सुरुवात होत आहे. आज सायंकाळी मोदी रालोआ सरकारमध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेत असून त्यांच्यासोबत अन्य काही मंत्र्यांचा शपथविधी समारंभ होणार आहे. काही तासांवर येऊन ठेपलेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यातील सहा जणांना संधी मिळण्याची चिन्हे असून दोघा मंत्र्यांना डच्चू दिल्याचे बोलले जात आहे.  यांचा पत्ता कट … मोदी सरकार – २ मध्ये लघु आणि सूक्ष्म उद्योग खाते असलेले मंत्री नारायण राणे यांना नव्या सरकारमध्ये संधी मिळणार नसल्याचे समोर येत असल्याने त्यांची मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता मावळली आहे. राणे यांच्यासोबतच अर्थ राज्यमंत्री असलेले भागवत कराड यांना देखील नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चिन्हे…

Read More

रविवार, दिनांक ९ जून २०२४ बारावी पास झाल्याने शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत देण्यासाठी केजच्या रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाला तीन हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. बीडच्या लाचलुचपत शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. धनराज सखाराम सोनवणे असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. तक्रारदाराने बारावी पास शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत मिळण्यासाठी शाळेकडे अर्ज केला होता. या अर्जावरून शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत देण्यासाठी मुख्याध्यापक सोनवणे यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने केलेल्या तक्रारीवरून लाच लुचपत शाखेचे बीडचे पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्या नेतृत्वाखाली सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, हनुमंत…

Read More

रविवार, दिनांक ९ जून २०२४ तक्रारदाराच्या शेताच्या पांदण रस्त्याचे काम करून घेण्यासाठी, काम झाल्यावर बिल मंजूर करण्याकरिता मदत करण्यासाठी व रस्त्याच्या कामात कोणतेही अडचण न येण्यासाठी तब्बल दीड लाख रुपये लाचेची मागणी करत त्यापैकी ७५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका दुकानदाराला ताब्यात घेतले. सरपंच, उपसरपंचासह याप्रकरणी यवतमाळमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरुडखेड पिंपळगाव (यवतमाळ) ग्रामपंचायतचे सरपंच निलेश प्रकाश राऊत, उपसरपंच गजानन तुळशीराम मनवर यांच्यासह खासगी इसम रमेश आनंदराव कुटे पाटील, मुकुल घनश्याम राऊत व घनश्याम बाबाराव राऊत असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. लाचेची रक्कम सरपंच निलेश राऊत यांना देण्यासाठी तक्रारदार…

Read More

रविवार, दिनांक ९ जून २०२४ बहुचर्चित नगर अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी बडा थकबाकीदार कर्जदार संगमनेरमधील उद्योजक अमित पंडित यांनी जामिनावर मुक्तता होताच १५ दिवसांच्या आत न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत दोन कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट न्यायालयात जमा केल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात संगमनेरमधील कर्जदार आरोपी म्हणून उद्योजक अमित पंडित यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक देखील केली. तब्बल दोन महिन्यानंतर पंडित यांना न्यायालयाने काही अटींवर एक लाख रुपयांचे वैयक्तिक जात नसेल त्यावर तीन महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. जामिनावर मुक्तता होताच पंडित यांनी पंधरा दिवसाच्या आत दोन कोटी रुपये व…

Read More

रविवार, दिनांक ९ जून २०२४ लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहे. मोदी यांच्यासोबत त्यांच्या सहकारी मंत्रिमंडळाचा देखील शपथविधी होत असून या खास सोहळ्याला सुमारे आठ हजार पावणे उपस्थित राहणार आहे यात परदेशी पाहुण्यांचा देखील समावेश आहे. भारताच्या शेजारील आणि हिंद महासागर प्रदेशातील देशाच्या सन्माननीय प्रमुखांना या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. शपथविधी सोहळ्याला श्रीलंकेचे अध्यक्ष रानी विक्रम सिंगे मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मोइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशचे पंतप्रधान प्रविंद कुमार, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल प्रचंडा, भुतानच्या पंतप्रधानांस अन्य काही राष्ट्राच्या प्रमुखांनी शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. त्यामुळे या…

Read More

मतदारांना गृहित धरणं किती घातक असतं हे भाजपच्या नेत्यांना कळलं असेल तर चांगलंच होय. कोणत्याही कर्तुत्वाशिवाय ‘अबकी बार चारसो पार..’चा नारा देताना आपण मतदारांनाही गृहित धरतो आहोत, याची जाण या पक्षाच्या नेत्यांनी ठेवली नाही. डोक्यात गेलेल्या हवेने ते बेफाम झाले होते. मागचा पुढचा विचार करण्याची त्यांची तयारीच नव्हती. सत्ता हे त्यांचं एकमेव साधन आहे. यासाठी संपत्तीचा आणि यंत्रणांचा वापर करत आपण कोणालाही विकत घेऊ शकतो, या मस्तीने त्यांच्या डोक्यात घर केलं होतं. याच मस्तीत भाजपच्या नेत्यांनी देशात नंगानाच सुरू केला होता. त्यांच्या पक्षाचा सामान्य कार्यकर्ताही नेत्यांच्या अशा वागण्याने हैराण झाला होता. जमीन सोडून वागणार्‍या नेत्यांना रस्त्यावर उतरवणं आवश्यक होतं, असं…

Read More

शनिवार, दिनांक ८ जून २०२४ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ठेवलेल्या प्रस्तावावर गौरव गोगोई, के. सुधाकरन, तारीक अन्वर यांनी समर्थन दिल्यानंतर काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची एकमताने निवड करण्यात आली. सोनिया गांधी फेब्रुवारीमध्ये राज्यसभा म्हणून राजस्थानमधून निवडून आल्या आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शनिवारी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. आजच काँग्रेसच्या कार्य समिती बैठकीत राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी घ्यावी असा काँग्रेसच्या नेत्यांचा आग्रह आहे. आज काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी राहुल गांधींना पार पाडण्याची विनंती करणारा ठराव मंजूर करण्यात आला. पण, राहुल गांधी यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला. 

Read More

शनिवार, दिनांक ८ जून २०२४ दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चैन हिसकावत पलायन केल्याची घटना शुक्रवारी संगमनेरमध्ये घडली. याप्रकरणी अज्ञात दोघा चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवण्याच्या घटना संगमनेरमध्ये वारंवार समोर येत आहेत. शुक्रवारी रात्रीदेखील साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास शहरातील नाशिक-पुणे महामार्गालगत असलेल्या कुंथूनाथ सोसायटीमध्ये जैन मंदिराजवळ सुनिता संतोष मेहता या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे तीन तोळे वजनाची चैन ओढून गाडी भरधाव वेगात नेत पळून गेले. सुनिता मेहता यांनी या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघा चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या विविध भागात तसेच बस स्थानकावर सातत्याने महिलांच्या गळ्यातील…

Read More

शनिवार दिनांक ८ जून २०२४ संसदेच्या विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काँग्रेसच्या बैठकीत एकमताने राहुल गांधी यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद देण्याचा ठराव संमत करण्यात आला, अशी माहिती काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. आज शनिवारी (ता. ०८ जून) दिल्लीत काँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत ही निवड करण्यात आली. संसदेत विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधीच नीट जबाबदारी पार पाडू शकतात, असेही वेणुगोपाल म्हणाले. राहुल गांधी यांनी सभागृहात काँग्रेसची धुरा सांभाळावी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते व्हावे, अशी मागणी काँग्रेसमधील खासदारांनी आधीपासूनच केली आहे. त्यामुळे या संदर्भात झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत यावर एकमताने निर्णय घेण्यात आला.…

Read More

शनिवार, दिनांक ८ जून २०२४ मनोज जरांगेंनी आजपासून पुन्हा आंतरवालीत उपोषण सुरू केले असून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जातीधर्माचे २८८ उमेदवार उभे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, तसेच विधानसभेला आम्ही नाव घेऊन पाडणार”, असा थेट इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील शनिवार (दि. ८) पासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. मात्र, त्याआधी आंतरवालीतील काही ग्रामस्थांनी जरांगेंच्या उपोषणाला परवानगी देऊ नये, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर पोलिसांनी जरांगेंच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली होती. मात्र, तरीही जरांगे उपोषणावर…

Read More

शनिवार, दिनांक ८ जून २०२४ संगमनेर शहरातील बेकायदा कत्तलखान्याचे नेटवर्क आता तालुक्याच्या ग्रामीण भागात हातपाय पसरू लागले आहे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या गोवंश जातीच्या ११ वासरांची सुटका करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील कौठे धांदरफळ येथे ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल वनिता चोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष गंगाधर घुले आणि इम्तियाज मोमीन या दोघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरक्षक अविनाश शहा यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते. कौठे धांदरफळ (संगमनेर) येथे संतोष गंगाधर घुले याच्या घरासमोर गोवंश जातीची वासरं कत्तलीच्या उद्देशाने…

Read More

शनिवार, दिनांक ८ जून २०२४  देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तारूढ होत पंतप्रधान पदाचे हॅट्रिक साधणार आहेत. रविवारी सायंकाळी सव्वा सात वाजता मोदींसोबत त्यांच्या मित्र पक्षाचे १८ खासदार मंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्रातील कोणाला संधी मिळते याची उत्सुकता वाढली आहे. या १८ नव्या मंत्र्यांमध्ये ७ जण कॅबिनेट तर उर्वरित ११ खासदार स्वतंत्र मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भाजपकडून दोघांना केंद्रीय मंत्री व दोघांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळू शकते. यासाठी नितीन गडकरी, पियुष गोयल, उदयनराजे भोसले, हेमंत सावरा आणि रक्षा खडसे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मित्र पक्षाचे खासदार देखील त्यांच्या…

Read More

शनिवार, दिनांक ८ जून २०२४ काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांना मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याने लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान आमदार थोरात यांना ताप आणि घशाच्या संसर्गाचा त्रास जाणवत होता, मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करत आपल्या प्रचार सभा सुरूच ठेवल्या. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिक बिघडत गेली. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ जून रोजी त्यांना जास्त त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती सुधारत असून लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार…

Read More