Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कट्टर हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी चिन्हावरुन ठाकरे गटावर निशाणा साधत ‘आपल्याला काय घरांना आग लावायची नाही’ असा उपरोधीक टोला ठाकरेंना लगावला आहे.सध्या ठाकरे-शिंदे यांच्या शिवसेनेत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या टिकेकडे लक्ष न देण्याचा सल्ला आपल्या मंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांना दिला आहे. मात्र त्यांच्याच गटाचे मंत्री असलेल्या सत्तार यांनी हा सल्ला धुडकावत आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे आणि शिंदे यांच्या दोन्ही गटाला निवडणूक आयोगाने परवानगी देत त्यांची नांवे निश्चीत केली आहे.ठाकरे गटाला ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे’ हे तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भारतीय जनता पक्षाचे बीडचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी दुपारी समोर आलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे जिल्हा हादरला आहे.बियाणी यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे बियाणी यांचे हितचिंतक व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात खासदार प्रीतम मुंडे आणि पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी देखील धाव घेतली असून बियाणी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष असलेले बियाणी यांचा जनसंपर्क मोठा आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बियाणी यांनी त्यांच्या राहत्या घरात गोळी झाडून…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कार्यभार येत्या 8 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यांनी पुढील सरन्यायाधीशपदी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. त्यामुळे लळीत यांच्यानंतर चंद्रचूड नवे सरन्यायाधीश असतील.निवृत्त होणारे सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस एक महिना आधी करतात. त्यानुसार लळीत यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. लळित यांचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर २०२२ रोजी संपत असल्याने केंद्र सरकारने त्यांना देशाच्या पुढील सरन्यायाधीशांच्या नावांची शिफारस करण्याविषयी विचारणा केली होती.लळीत यांच्यानंतर चंद्रचूड हे सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती असतील. त्यांचा कार्यकाल 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत म्हणजेच दोन वर्षाचा असेल. ललित यांच्या पाठोपाठ देशाला पुन्हा मराठी सरन्यायाधीश लाभणार आहेत.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ‘वाट चालताना’ या पुस्तकात डॉ. संतोष खेडलेकर यांनी उत्तमचंदजी सरनोत यांचे केलेले व्यक्तिचित्रण म्हणजे एका खऱ्याखुऱ्या कर्मयोगी व्यक्तिमत्वाच्या आयुष्याचा पट आहे. त्यामुळे हे पुस्तक समाजाला दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या ‘वाट चालताना’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होत्या.लोणी (ता. राहाता) येथील उत्तमचंद सरनोत यांच्या आयुष्यावर आधारित ‘वाट चालताना’ हे चरित्रात्मक पुस्तक डॉ. खेडलेकर यांनी नुकतेच लिहिले. एका व्यापारी माणसाच्या आयुष्यातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर जिल्हा परिषदेचे घुलेवाडी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांच्यासह दहा ते पंधरा जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.शहर पोलीस ठाण्यात याबाबत घुलेवाडी येथील कविता संतोष अभंग यांनी फिर्याद दिली आहे. अभंग यांनी आपल्या मालकीच्या रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांना बसावयास परवानगी दिल्याचा राग जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सिताराम राऊत यांना आला. राऊत यांनी गावातील तलाठी कार्यालय येथे अभंग यांचा रस्ता अडवून जातीवाचक शिवीगाळ केली तसेच गैर कायद्याची मंडळी जमीन त्यांच्या घराचे नुकसान केले.या आशयाच्या अभंग यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर-मनमाड या महामार्गांच्या दुरुस्तीच्या कामामुळे १५ ऑक्टोबर पासून अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्गाबाबत नागरिकांच्या हरकती असतील तर त्या १४ ऑक्टोबर २०२२ पूर्वी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. अहमदनगर – मनमाड या महामार्गावरील अवजड वाहतूक विळद घाट व पुणतांबा फाटा येथून खालील पर्यायी मार्गाने वळविण्याचे नियोजन आहे. अहमदनगर-पुणे-सोलापूरकडून मनमाडकडे जाणारी वाहतूक कल्याण बायपास चौक -अहमदनगर कल्याण महामार्गावरून आळेफाटा-संगमनेरमार्गे नाशिककडे किंवा विळद घाट-दूध डेअरी चौक- शेंडी बायपास, अहमदनगर -औरंगाबाद महामार्गावरून कायगाव-गंगापूर- वैजापूर- येवला मार्ग वळविण्यात येणार आहे. शनि शिंगणापुर /सोनई रोडवरुन मनमाड (राहुरीकडे) कडे येणाऱ्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क केंद्रीय निवडणूक आयोगाचा रात्री मोठा निर्णय समोर आला आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे यांच्या गटाच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ठाकरे गटाचे नाव यापुढे ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे असेल. त्यांच्या गटाला ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले असून चिन्हासाठी त्यांच्याकडून पुन्हा पर्याय मागविण्यात आला आहे.शिवसेना फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठविले होते तसेच शिवसेना हे नाव वापरण्यास दोन्ही गटाला परवानगी नाकारली होती त्यामुळे आयोगाने दोन्ही गटाकडून नाव आणि चिन्हाबाबत पर्याय मागविले होते सोमवारी आयोगाने या पर्यायांवर निर्णय घेतला उद्धव ठाकरे यांनी मशाल या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आपल्यावरील टीकेला टीकेने उत्तर देण्याची गरज नसून कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. सरकारला गालबोट लागणार नाही याची काळजी घेताना शंभर दिवसातील आपले निर्णय जनतेसमोर न्या, अशी तंबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या मंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांना दिली आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविल्याने ते आता कोणत्याच गटाला मिळणार नाही. यावरून सध्या ठाकरे-शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन्ही गटाला आता नवे नाव आणि चिन्ह शोधावे लागणार आहे, या पार्श्वभूमीवर आपल्या गटाच्या शिवसेनेचे नवे नाव आणि चिन्ह काय असावे यावर विचार विनिमय करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीत ही नाराजी व्यक्त केली. यावेळी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क निवडणूक चिन्ह गोठविण्यापर्यंत ठीक आहे मात्र पक्षच वापरायला बंदी घालण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अभूतपूर्व म्हटला पाहिजे. देशाच्या इतिहासात असा निर्णय कधीच झाला नाही. शिवसेना संपविण्यासाठी भाजपने कशी पाऊले टाकली हे सर्वांना दिसत आहे. त्यामुळे या निर्णयामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.शिवसेनेवरून ठाकरे शिंदे गटातील वाद दावे प्रति दावे राज्यासह संपूर्ण देश बघत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले असून फक्त शिवसेना हे नाव देखील वापरण्यास दोन्ही गटांना मज्जाव केला आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून पक्षाचे नवे नाव आणि नवे चिन्ह आयोगाला देण्यात आले आहे. याबाबत आयोगाचा निर्णय प्रतीक्षेत आहे.पाथर्डीमध्ये आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे संगमनेर तालुक्यात चार मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला काही तास होत नाही तोच, सांगलीतील बिळूरमध्ये एका तलावात तीन मुलींसह आईचा मृतदेह आढळून आल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह तलावा बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत.सुनिता माळी (वय ३० वर्ष), अमृता (वय १३ वर्ष), अश्विनी (वय १० वर्ष) आणि ऐश्वर्या (वय ७ वर्ष) अशी तलावात बुडून मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. या संदर्भातील नेमकी घटना काय आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी घटनास्थळी आढळलेल्या कपडे आणि कपडे धुण्याच्या साबणावरून प्राथमिक अंदाजानुसार सुनिता आपल्या मुलींसह या तलावावर कपडे धुण्यासाठी आल्या…
