Author: अनंत पांगारकर
गुरुवार, १४ नोव्हेंबर नाशिक – राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षाचे दिग्गज नेते आपल्या पक्षाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले असताना भारतीय जनता पक्षाच्या गोटातून दुःखद बातमी समोर आली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार असलेले भाजप नेते हरिश्चंद्र चव्हाण यांचे आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कॉलेज रोडवरील पाटील लेन नंबर दोन येथील त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. यामुळे या मतदारसंघात दुःखद वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून चव्हाण यांची प्रकृती बरी नव्हती. अखेर आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कलावती चव्हाण, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. पेठ-सुरगाणा या…
विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआ आणि महायुतीच्या नेत्यांचा प्रचार जोरात सुरु आहेत. दोन्हीही बाजूंनी प्रचारासाठी बड्या नेत्यांची फौज मैदानात उतरलेली आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठे गौप्यस्फोट केले आहेत. यंदा पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये तीन आणि महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष मैदानात आहेत. त्यामुळे जागावाटपाचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. असाच तिढा मुख्यमंत्रिपदाबद्दल होणार का असा प्रश्न निर्माण आहे. मविआचं जर सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण? असा सवाल उद्धव ठाकरे यांना वहिनीने केला असता उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित…
विशेष प्रतिनिधी / मुंबई ऐन निवडणूक काळात गुहागरमध्ये महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रचार थांबवला आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवला आहे. केवळ गुहागरच नाही तर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दापोलीमध्येही शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांचा प्रचार थांबवला आहे. मतदानाला केवळ आठ दिवस बाकी असताना जिल्हाभरात भाजपने प्रचाराचं काम थांबवल्यामुळे महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. रामदास कदम यांनी तात्काळ डॉ. विनय नातू आणि भाजपची माफी मागावी. अन्यथा संध्याकाळपर्यंत आम्ही आमचा निर्णय घेऊ, अशी आक्रमक…
बुधवार १३ नोव्हेंबर संगमनेर – सोमवारी तालुक्यातील साकुर येथे भरदिवसा कान्हा ज्वेलर्सवर दरोडा टाकून संपूर्ण दुकान लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांपैकी दोघांना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले. या दोन्ही आरोपींना बुधवारी पोलीस कोठडी मिळण्यासाठी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना १८ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता अन्य तीन प्रमुख आरोपींसह चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळविण्यासाठी पोलिसांचे कसब पणाला लागणार आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गजबजलेल्या साकुरच्या बस स्टॅन्ड परिसरात असलेल्या कान्हा ज्वेलर्स दुचाकीवरून आलेल्या पाच दरोडेखोरांनी तीनदा हवेत गोळीबार करत दुकानदाराला गावठी कट्ट्याचा धाक दाखवत दरोडा टाकण्याचा प्रकार घडला होता. या दरोड्यात ५० लाखापेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी…
दहशत आणि दडपशाही उध्वस्त करण्याची ताकद मतदारांमध्ये… निळवंडेचे काम बाळासाहेब थोरातांमुळेच – शरद पवार
राहाता – शिर्डी विधानसभा मतदारसंघात प्रचंड दहशत आणि दडपशाही असल्याचे मला सांगितले गेले. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जर कोणी दहशत आणि दडपशाही करत असेल तर ती उध्वस्त करण्याची ताकद तुम्हा मतदारांमध्ये आहे. इथल्या दहशतवादाला घाबरू नका, या दडपशाहीचा बंदोबस्त करावाच लागेल असा इशारा देतानाच निळवंडे धरणाचे काम फक्त बाळासाहेब थोरात यांच्यामुळेच झाले. नगरच्या विकासात जर कोणाचा हात असेल तर तो बाळासाहेब थोरात यांचा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी पवार यांची बुधवारी दुपारी राहाता येथे सभा झाली यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब…
बुधवार, १३ नोव्हेंबर शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने निवडणुकीत स्वतंत्र पक्ष म्हणून सामोरं जावं, तसेच शरद पवारांचे फोटो किंवा व्हिडीओ वापरू नये, असे आदेश न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने घड्याळ चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून पाळले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला होता. यानंतर या याचिकेवर ७ नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पडली…
बुधवार १३ नोव्हेंबर संगमनेर मतदार संघात स्वतःला टायगर संबोधणाऱ्यांनी या मतदारसंघातील दहशतीचा मुद्दा समोर आणत परिवर्तनासाठी साद घातली आहे. मात्र त्यांची परिवर्तनाची साद ही केवळ सत्तेच्या लालसेने असून आमची परिवर्तनाची साद सामान्यांच्या, वंचितांच्या हक्कासाठी असल्याचे वंचितचे संगमनेर विधानसभेतील उमेदवार अजीज वोहरा यांनी म्हटले आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उभ्या असलेल्या दोन मोठ्या शक्ती विरोधात, आर्थिक बलाढ्य उमेदवारांविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून अजीज वोहरा निवडणूक लढवत आहे. एकीकडे सहकाराच्या माध्यमातून निर्माण केलेले मोठे साम्राज्य सत्ता कायम राखण्यासाठी तर दुसरीकडे प्रवरेची यंत्रणा तालुक्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुढे सरसावली आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य घरातील उमेदवार देऊन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने…
बुधवार, १३ नोव्हेंबर पुणे – ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर मिळत नसेल, तर नागरीकांना १०० रुपयांचे पाच स्टॅम्प पेपर वापरून आपले काम करणे शक्य आहे. नागरीकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तशा सूचना देखील मुद्रांक विक्रेत्यांना दिल्या आहेत, असे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र अथवा अन्य प्रकाराचे दस्तऐवज करण्यासाठी ५०० रुपयांचाच स्टॅम्पपेपर वापरण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहे. परंतु, बाजारात आता ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे समोर येत आहे. ५०० रुपयांचा स्टॅम्प वापरण्याचा निर्णय सरकारने अचानक पणे घेतल्याने शंभर रुपयांचे स्टॅम्प पेपर बंद झाले आहे. मात्र या स्टॅम्प पेपरची मोठ्या प्रमाणात छपाई झाले असल्याने शिल्लक…
संगमनेरचा वाघ राज्यात गर्जना करतो यांना मतदारसंघाच्या बाहेर पडता येईना आ. थोरात यांना दोन लाखाचे मताधिक्य देण्याची आवाहन संगमनेर – प्रतिनिधी आमदार बाळासाहेब थोरात यांची सुसंस्कृत नेता म्हणून राज्याला ओळख आहे. दडपशाही करणाऱ्यांना आम्ही दक्षिणेत झटका दिला आहे. वाघाची झुल मांजराने अंगावर घेतल्याने कोणी वाघ होत नाही. तो टायगर नव्हता. खरा टायगर हा संगमनेरमध्ये असून येत्या विधानसभेत संगमनेरमधील खबरीलालचा राजकीय कडेलोट करा. थोरात यांना दोन लाखाच्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन खासदार निलेश लंके यांनी केले. युवक काँग्रेस व महाविकास आघाडीच्यावतीने तळेगाव दिघे येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अमित देशमुख, राष्ट्रवादीचे खासदार डॉ.…
मंगळवार १२ नोव्हेंबर संगमनेर – भरदिवसा दीड वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील साकुरच्या गजबजलेल्या बस स्थानक चौकातील कान्हा ज्वेलर्सवर गावठी कट्टाचा भाग दाखवून तसेच हवेत फायर करून दुकानात दरोडा टाकत पन्नास लाखाहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन फरार झालेल्या पाचपैकी दोघा दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. दरोडा प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय बाळासाहेब वावरे, (वय 24 वर्षे, रा. माळेगांव, येळे ढाळे वस्ती, ता. बारामती जि. पुणे) व स्वप्नील किशोर येळे, (वय 22 वर्षे, रा. माळेगांव, येळे ढाळे वस्ती, ता. बारामती जि. पुणे) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे…
