Author: अनंत पांगारकर
शनिवार ३० नोव्हेंबर – पुणे राज्यघटना आणि लोकशाहीच्या सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी, निवडणुकांचा संदर्भ देऊन बाबा लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात असल्याच्या निषेर्धार्थ ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी गुरुवारी आत्मक्लेष उपोषण सुरू केले होते. ठाकरेंनी सोडले आढावांचे उपोषण – महात्मा फुले वाडा येथे सुरू असलेल्या या आत्मक्लेष आंदोलनावेळी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सकाळी आढाव यांची भेट घेतली. त्या पाठोपाठ सायंकाळी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आढाव यांची भेट घेत केलेल्या विनंतीनंतर ठाकरेंच्या हस्ते पाणी पिऊन आढाव यांनी आपले आत्मक्लेष आंदोलन मागे घेतले आहे. बाबा आढाव हे ९४ वर्षाचे आहेत. यांची उपस्थिती -…
शनिवार ३० नोव्हेंबर – संगमनेर संगमनेरमधून महायुतीचे उमेदवार निवडून आले आहे. उमेदवाराचे अभिनंदन करणारे फलक शहरासह तालुक्यात सर्वत्र लागले असून या फलकावर महायुतीचे प्रमुख नेते असलेले रामदास आठवले यांचे छायाचित्र नसल्याने आठवले गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कैलास कासार, आशिष शेळके यांचा सवाल – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ निवडून आले आहे. महायुतीचा धर्म पाळत आम्ही त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले, त्यांच्या विजयात आमचाही महत्त्वाचा वाटा आहे. मात्र शहर आणि तालुक्यात लागणाऱ्या कोणत्याही बॅनरवर आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांचे छायाचित्र नसल्याने महायुतीला आठवले यांचा विसर पडला का असा सवाल रिपब्लिकन…
शनिवार, ३० नोव्हेंबर – मुंबई राज्यात महायुतीसाठी स्पष्ट बहुमत मिळून आठवडा उलटला आहे तरी देखील नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला नाही. यामुळे महायुतीत मोठ्या प्रमाणात धूसपुस सुरू असल्याचे समोर येत आहे. गृहमंत्रीपदावर आडून असलेल्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य चार मंत्र्यांच्या नावाला आता भाजपने विरोध केल्याचे समोर येत आहे. शिंदे गटाकडून कोणाला संधी द्यायची याचा निर्णय देखील भाजपच घेत असल्याचे समोर आल्याने शिंदे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. फडणवीसच मुख्यमंत्री – महायुतीचे मुख्यमंत्रीपद कोणाच्या गळ्यात पडणार? यावरून सत्तेवर येणाऱ्या महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच दिसत आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीतून होणार…
शनिवार, ३० नोव्हेंबर हल्ली निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही मूल्य उद्ध्वस्त होत असल्याची टीका ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केली. तसेच या प्रकाराचा निषेध म्हणून ९५ वर्षीय योद्धा अर्थात डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन पुकारले आहे. शनिवारी तिसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरूच होते. शरद पवारांनी घेतली भेट – दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सकाळी डॉ. बाबा आढाव यांची भेट घेतली. आढाव यांच्या आंदोलनाला राज्यातून पाठिंबा मिळत असून, डॉ. आढाव यांच्या समर्थनार्थ शनिवारी राज्यातील जिल्ह्यांमध्येही असेच आत्मक्लेश आंदोलन करण्यात येत आहे. आज उपोषण थांबविणार – डॉ. आढाव यांच्याबरोबरच सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार,…
विशेष प्रतिनिधी | मुंबई राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तरीही नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होत नसल्याने एकच चर्चा होत आहे. तत्पूर्वी शिवसेना शिंदे गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदावर अडून बसले आहेत. गृहमंत्रिपद मिळालं तरच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार आहेत, अन्यथा उपमुख्यमंत्रिपद हे शिवसेना शिंदे गटातील दुसऱ्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला मात्र गृहमंत्री पदावर दावा – विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं आहे. १३२ जागा जिंकून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तसेच भाजपला आठ अपक्ष आमदारांनी देखील पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे…
विशेष प्रतिनिधी | मुंबई अनेक अडथळे पार करत मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचू पाहणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे नवाच अडथळा निर्माण झाला आहे. फडणवीस यांच्या विरोधात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी शडडू ठोकला आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आपलं आंदोलन पुन्हा सुरु होईल, अशा शब्दात जरांगे यांनी फडणवीस यांच्यापुढे आव्हान उभं केलं आहे. जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यावरून आक्षेप नोंदवला असल्याने मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांच्या नावाची घोषणा व्हायला उशीर होत असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम – राज्यात महायुतीने एकहाती सत्ता स्थापन केली असली तरी मुख्यमंत्रिपदावरून अजूनही पेच कायम आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा…
शुक्रवार २९ नोव्हेंबर – संगमनेर विधानसभा निवडणूक होताच संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत नाराजी समोर येण्यास सुरुवात झाली आहे. पराभवाची मिमांसा करत नव्या जोमाने कामाला लागतानाच निष्क्रिय आणि गद्दारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी करणारा ठराव शिवसैनिकांच्या बैठकीत करण्यात आला आहे. चिंतन बैठक – विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. थोरात यांची पारंपारिक विरोधक असलेली ठाकरेंची शिवसेना यावेळी थोरात यांच्या सोबत असतानादेखील थोरात यांचा पराभव आत्मचिंतन करण्यास लावणारा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष आदेशाशी गद्दारी करत मतदार संघात विरोधी काम केले. या पार्श्वभूमीवर गुरुवारी संगमनेरमध्ये शिवसैनिकांची चिंतन बैठक पार…
शुक्रवार, २९ नोव्हेंबर – संगमनेर देशातील सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला वीज निर्मितीमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल को जनरेशन २००२४ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. सातत्याने उत्कृष्ट कामगिरी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करताना शेतकरी ऊस उत्पादक कामगार यांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण केली आहे. ऊस गाळपाबरोबर कारखान्याने वीज निर्मितीमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेऊन नॅशनल को जनरेशन फेडरेशनच्यावतीने स्पेशल…
विशेष प्रतिनिधी | मुंबई महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या त्यानुषंगाने महाविकास आघाडीच्या झालेल्या दारुण पराभवाची नौतिक जबाबदारी घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस श्रेष्ठीनी फेटाळून लावला आहे. निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानतंर आता नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र याला भाजपची बदमाशी कारण असल्याचं सांगत पटोलेंचा राजीनामा फेटाळण्यात आला. पटोले दिल्लीला – राज्यात एकीकडे सत्तास्थापनेची गडबड सुरु असताना दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला दारूण पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. यानंतर नाना पटोले हे दिल्लीला रवाना झाले. राजीनामा – त्यांनी २४ नोव्हेंबरला काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतली. या भेटीत नाना…
विशेष प्रतिनिधी | मुंबई महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर आणि चिंताजनक प्रकार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झालं, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के कसं झालं असा सवाल प्रदेश काँग्रेसने निवडणूक आयोगाला विचारला आहे. व्हिडिओ फुटेज जाहीर करा – ही वाढ चक्क ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? असा प्रश्न उपस्थित करून निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसने…
